शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भूविकास बॅँकेतील बीडच्या ९४ कर्मचाऱ्यांचे साडेनऊ कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:56 IST

अवसायनात काढलेल्या भूविकास बॅँकेतील ९४ कर्मचा-यांचे जवळपास ९ कोटी ५० लाख रुपये थकले असून कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने या कर्मचा-यांनी राज्याच्या सहकार आयुक्तांकडे सामुहिक आत्महत्येची मागणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अवसायनात काढलेल्या भूविकास बॅँकेतील ९४ कर्मचा-यांचे जवळपास ९ कोटी ५० लाख रुपये थकले असून कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने या कर्मचा-यांनी राज्याच्या सहकार आयुक्तांकडे सामुहिक आत्महत्येची मागणी केली आहे.२४ जुलै २०१५ रोजी राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन सर्व भू विकास बॅँक अवसायनात काढून बंद केल्या. कर्मचा-यांचे देणे भागविण्यासाठी राज्यातील बॅँकांच्या मालमत्ता विक्री करणे व हस्तांतरीत करण्यासाठी मंत्री गट समिती नियुक्त केली होती. बॅँकेची मालमत्ती विक्री करताना ई - टेंडरला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे १९ नोव्हेंबर २०१७ रोजी उपसमितीने कर्मचा-यांची देणी अदा करण्यासाठी बाजारदरानुसार मूल्यांकन करुन भूविकास बॅँकेकडून येणे असणा-या रकमा समायोजित न करता सदरची रक्कम भूविकास बॅँक कर्मचा-यांची देणी अदा करण्यासाठी ती उपलब्ध करुन देण्याचा निर्णय झाला होता. यासही एक वर्षाचा कालावधी होऊनही ठोस अंमलबजावणी झालेली नाही.बीड जिल्हा भूविकास बॅँकेतील ९४ कर्मचा-यांची थकित पगार, ग्रॅच्युटी, रजेचा पगार व नुकसान भरपाई अशी एकूण ९ कोटी ५० लाख रुपये येणे आहे. ९४ पैकर १० ते १५ कर्मचारी मयत झाले असून त्यांच्या विधवा पत्नीकडे उपजीविकेसाठी कुठलेही साधन नसल्याने मोलमजुरी करुन आपल्या पाल्यांचा सांभाळ करावा लागत आहे. काही कर्मचा-यांना औषधोपचार न करता आल्याने प्राण गमवावे लागले. बीड जिल्हा कायम दुष्काळी असून रोजगारही मिळत नाही. शासनाने या बॅँकेचा निर्णय घेऊन ४ वर्षांचा कालावधी लोटला असून कर्मचाºयांना अद्याप काहीही मिळालेले नाही. त्यामुळे शासनाने ३१ जानेवारीपूर्वी ठोस निर्णय घ्यावा नसता कर्मचा-यांना सामूहिक आत्महत्येची परवानगरी द्यावी अशी मागणी तारामती सिरसट, सुभद्राबाई परबळे, रजिया बेगम जावेद नवाज, दैवशाला गोरे, वंदना वाघमारे, शे. सलीम, अशोक नागथई, शहादेव मिसाळ, भिवसेन जोगदंड, बाबासाहेब परजणे, ज्ञानोबा घोबाळे, शिवाजी राठोड, उत्तम केदार, भागवत मुरलीधर करडुले, ज्ञानदेव विधाते, अरुण लांडे, अनिल चौधरी, बाळनाथ घुमरे, व्ही. पी. परदेशी, जी. डी. नेलवाडकर, एस. बी. आवढाळ, एस. एस. खरात, जे. ई. नेटके, आर. एम. साळुंके आदींनी केली आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रState Governmentराज्य सरकारEmployeeकर्मचारी