शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

ऊर्ध्व कुंडलिका मध्य प्रकल्पात ९० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST

राम लंगे वडवणी : ऊर्ध्व कुंडलिका धरणाची पाणी पातळी ५३६.१० मीटर झाली असून धरणातील उपयुक्त साठा ८४ टक्के इतका ...

राम लंगे

वडवणी : ऊर्ध्व कुंडलिका धरणाची पाणी पातळी ५३६.१० मीटर झाली असून धरणातील उपयुक्त साठा ८४ टक्के इतका झालेला आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा धरणाच्या ऊर्ध्व भागातील पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या तीव्रतेनुसार धरणात येणाऱ्या पाण्याच्या येव्याच्या अनुषंगाने ठरविण्यात येणार आहे. कुंडलिका नदीकाठावरील शेतकरी, नदीकाठावर वस्ती करून राहिलेले नागरिक यांना सावधतेचा इशारा दिला असून जेणेकरून जीवित अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे.

तालुक्यात असलेल्या, वरदान ठरलेल्या ऊर्ध्व कुंडलिका धरणात गेल्या आठ दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. धरणात २० जुलै रोजी ९० टक्के पाणीसाठा असून पावसाचा जोर वाढत असल्यामुळे हे धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरत असल्यामुळे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने कोणत्याहीक्षणी या धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार असल्यामुळे नदीकाठच्या गावांना व शेतकऱ्यांना आणि नदीशेजारी वस्ती करून राहणाऱ्या लोकांना जिल्हा प्रशासनाने व तालुका प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. वडवणी तालुका हा कायम दुष्काळाच्या खाईत असायचा. मात्र अप्पर ऊर्ध्व कुंडलिका धरणामुळे या तालुक्याचे नंदनवन झाले आहे .या प्रकल्पातील प्रकल्पीय पूर्ण साठा क्षमता १८.७७ द.श.घ.मी. असून जलाशयाची पूर्ण पाणी पातळी ५३७ मीटर आहे. या प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा १५.५७ असून २० जुलै रोजी या धरणात ५३६.४६ पाणीसाठा आहे.

तालुक्यातील जवळपास २ हजार ८०० हेक्टर शेती या धरणाच्या पाण्यामुळे ओलिताखाली आल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हा तलाव पूर्ण क्षमतेने भरत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येते. २० जुलैला या धरणात ५३६.४५ मीटर इतका पाणीसाठा झाला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून या धरणात पाण्याची वेगाने वाढ होत असल्यामुळे येणारे पाणी हे कुंडलिका नदीपात्रात सोडावे लागणार आहे.

याबाबत बीड पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता अजय गुजर म्हणाले की, हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) अतिवृष्टी होण्याची शक्यता असून धरणात येणाऱ्या येव्यामुळे (Inflow) धरण निर्धारित पातळीत भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर येणारा येवा कुंडलिका नदीपात्रात सोडावा लागणार आहे. धरणात येणारा येवा पाहता, आजच्या ५३६.४५ मीटर या पातळीनंतर येणाऱ्या येव्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे.

याबाबत तहसीलदार प्रकाश सिरसेवाड म्हणाले की, काल तलावाची पाहणी केली असून ते जवळपास ९० टक्के भरलेले आहेत. ९० टक्के धरणाची पातळी ५३६.४५ असून कधीही पाऊस पडला की धरणातून पाणी सोडले जाईल. नदीकाठावरील गावांतील नागरिकांना याबाबत कळविले आहे

200721\img-20210720-wa0023.jpg

ऊर्ध्व कुंडलिका मध्य प्रकल्पात 89.95% पाणीसाठा पाणी पातळीत वाढ होत असल्याने प्रकल्पाचे छायाचित्र