शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

एकाच दिवशी तपासली २०८९ शौचालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 00:18 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत आष्टी तालुक्यातील शौचालय बांधणाऱ्या लाभार्थ्यांच्या अनुदानासंदर्भात तक्रार आल्यानंतर एकाच दिवशी ७ गावातील २०८९ लाभार्थी आणि त्यांनी बांधलेले शौचालय तसेच अनुदानाबाबत चौकशी केली असून अहवाल अंतिम टप्प्यात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत आष्टी तालुक्यातील शौचालय बांधणाऱ्या लाभार्थ्यांच्या अनुदानासंदर्भात तक्रार आल्यानंतर एकाच दिवशी ७ गावातील २०८९ लाभार्थी आणि त्यांनी बांधलेले शौचालय तसेच अनुदानाबाबत चौकशी केली असून अहवाल अंतिम टप्प्यात आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.आष्टी तालुक्यातील क-हेवडगाव येथील राम सूर्यभान खाडे यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. तक्रारीत १ मार्च २०१८ ते ३० जुलै २०१९ या कालावधीमध्ये आष्टी येथील गटविकास अधिका-यांनी स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) मधील शौचालय बांधकामाचे अनुदान गेवराई तालुक्यातील मल्टीस्टेट अर्बन बॅँकेमार्फत वितरण केल्याने चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार उपायुक्त विकास सूर्यकांत हजारे यांनी या प्रकरणाचा अहवाल मागविला होता.या प्रकरणी चौकशी समिती नेमून चौकशीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले होते. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी या समितीचे प्रमुख होते तर स्वच्छता आणि पाणी विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे आदींचा या समितीमध्ये समावेश होता. ६९ कर्मचाºयांची ७ पथके सात गावांतील तक्रारींच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आली. यात पंचायतचे विस्तार अधिकारी पथक प्रमुख, स्वच्छ भारतचे तालुका समन्वयक, नरेगामधील तांत्रिक कर्मचा-यांचा समावेश होता.अशी केली चौकशीपथकाने गावातील लाभार्थ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करुन अनुदान कशा पद्धतीने मिळाले याची चौकशी केली. १ मार्च २०१८ ते ३० जुलै २०१९ या कालावधीतील अनुदान वाटप व शौचालय बांधकामाची माहिती घेण्यात आली.या मुद्यांवर चौकशीकुटुंब प्रमुखाचे नाव, शौचालय बांधकाम आहे अथवा नाही, प्रोत्साहनपर अनुदान मिळाले अथवा नाही, किती निधी प्राप्त झाला? , अनुदान रोख, आरटीजीएस, धनादेश अथवा धनाकर्षद्वारे मिळाले, खात्यावर जमा झालेले अनुदान राष्टÑीयीकृत, सहकारी, पतसंस्था अथवा मल्टीस्टेटद्वारे कसे जमा झाले. राष्टÑीयीकृत बॅँकेत खाते नसल्यास किंवा तालुक्याबाहेर खाते असल्यास त्याचे कारण, स्वत: रक्कम काढली की दुस-याने उचलली? आदी मुद्यांवर ही चौकशी करण्यात आली.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानfraudधोकेबाजी