शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांच्या यंत्रणेने शेतकऱ्यांना ८५ कोटींना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:29 IST

माजलगाव : बीड जिल्ह्यातील सहकारी व खासगी साखर कारखाने व शेतकी अधिकाऱ्यांनी हेक्टरी १० हजार रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना ...

माजलगाव : बीड जिल्ह्यातील सहकारी व खासगी साखर कारखाने व शेतकी अधिकाऱ्यांनी हेक्टरी १० हजार रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना ८५ कोटींना लुटल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते गंगाभीषण थावरे यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे. या पत्रकात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी मिळून २०२०-२१ या गाळप हंगामात साखर आयुक्तालयाच्या कार्यालयीन आकडेवारीनुसार ८५ हजार ४८५ हेक्टर उसाची नोंद आहे. याविषयी ५ जानेवारी रोजी प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस साखर संचालक योगीराज सुर्वे, शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाभीषण थावरे, कार्यकारी संचालक जयभवानी, के. एल. क्षीरसागर, जमहेश शुगर्स इंडस्ट्रीचे गिरीश लोखंडे, लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याचे एम. डी. घोरपडे, छत्रपती कारखान्याचे वाय. जी. अकरदे व वैद्यनाथ कारखान्याचे व्ही. एम. कुलकर्णी उपस्थित होते. त्यावेळी प्रथम कार्यक्षेत्रातील ऊस कारखान्यांनी घ्यावा. बाहेरचा ऊस आधीच आणू नये, उसाला पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे भाव द्यावा, को. २६५ जातीच्या उसाची नोंद घ्यावी, या मुद्द्यांवर चर्चा झाली तसेच ऊस नोंदणीनुसार तोडणीसाठी ऑनलाईन स्लिप निघत नसेल तर ऑफलाईन स्लिप द्यावी, याबाबत पात्र सर्व ठेकेदारास द्यावे. कारखान्याकडून ऊस उतारा कमी दर्शवला जातो, याकामी समिती नेमण्यासाठी साखर आयुक्तांना अहवाल सादर करावा. ऊस उतारा किती, गाळप किती, कोणत्या जातीचा ऊस गाळपासाठी घेतला? तक्रार करण्याची सूचना इ. बाबतची सूचना फलक कारखान्याच्या दर्शनी भागात लावावी. ऊस तोडणीसाठी रकमेची मागणी केल्यास कारखान्याकडे तक्रार करावी. यापुढे सर्व शेतकऱ्यांची ऊस नोंद घेतल्याची यादी ग्रामपंचायत कार्यालयात लावावी तसेच ऊस बिलाची १४ दिवसांच्या आत एफ. आर. पी. रक्कम द्यावी, अशी मागणीदेखील करण्यात आली.

बैठकीतल्या सूचनांचे पालन नाही.

साखर संचालकांसोबत झालेल्या बैठकीनंतर आजपर्यंत कारखान्यांनी एकाही सूचनेचे पालन केले नाही, यामुळे ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये खर्च झाला. याचा आकडा तब्बल ८५ कोटी रुपये होतो. ही सर्व शेतकऱ्यांच्या खिशातून झालेली लूट कार्यकारी संचालक व शेतकी अधिकारी यांच्या संगनमताने झाली असून, यास सर्वस्वी जबाबदार तेच आहेत, असा आरोप गंगाभीषण थावरे यांनी केला आहे.