शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

२० पैकी ८ रेल्वे गाड्या सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST

परळी -येथील रेल्वे स्थानकातून नऊ महिन्यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या एकूण २० रेल्वे गाड्यांपैकी आठ रेल्वे गाड्या सुरू ...

परळी -येथील रेल्वे स्थानकातून नऊ महिन्यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या एकूण २० रेल्वे गाड्यांपैकी आठ रेल्वे गाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत तथापि १२ रेल्वे गाड्या अद्यापही धावत नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय होत असून खिशाला फटका बसत आहे. पॅसेंजर रेल्वे गाड्या अद्याप ही सुरू केले नसल्याने स्पेशल रेल्वेने तिप्पट भाडे मोजावे लागत आहे.

परळी रेल्वेस्थानकातून नांदेड- बंगळूरू, बंगळूरू-नांदेड, काकीनाडा-शिर्डी, शिर्डी- काकीनाडा, नांदेड-पनवेल, पनवेल-नांदेड, औरंगाबाद-हैदराबाद , हैदराबाद- औरंगाबाद या स्पेशल एक्सप्रेस रेल्वे गाड्या परळी रेल्वे रुळावरून सुरळीत धावत आहेत. या रेल्वेगाड्यांना आरक्षणाशिवाय प्रवास नाही. प्रवाशांना आरक्षण तिकीट घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे व नऊ महिन्यानंतरही पॅसेंजर गाड्या अद्यापही सुरू झाल्या नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे. काही प्रवाशांना दुपारच्या वेळी परभणी, नांदेडकडे रेल्वे नसल्याने बसने जाण्याची वेळ आली आहे . पूर्णा-हैदराबाद ,हैदराबाद -पूर्णा ,मिरज- परळी, परळी- मिरज, अकोला-परळी, परळी-अकोला, आदिलाबाद -परळी, परळी आदिलाबाद, निझामाबाद- पंढरपूर, पंढरपूर- निझामाबाद, पूर्णा-परळी, परळी -पूर्णा पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून आर्थिक फटका बसत आहे.

मोठ्या अंतरासाठी परळीहून हैदराबादला जाण्यासाठी नऊ महिन्यापूर्वी जनरलने १४५ रुपये लागायचे आता स्पेशल रेल्वेने रिझर्वेशन करून ३८५ रुपये द्यावे लागत आहेत. परळीहून पुण्याला जाण्यासाठी रेल्वेने जनरल स्लीपरचे २६० रुपये तिकीट होते तर आता ३५५ रुपये झाले आहे.

छोट्या अंतरासाठी रेल्वेने परळीहून परभणीला पूर्वी पंचवीस रुपये तिकीट लागत होते. आता एक्सप्रेस रेल्वेला पन्नास रुपये तिकीट द्यावं लागतं आहे. छोट्या अंतरावरील गावांना थांबा आता नसल्याने रेल्वे प्रवाशांची गैरसोय झाली असून छोट्या अंतरावरील गावांना आटो रिक्षाने येणे-जाणे करावें लागत आहे.

सर्वसामान्य प्रवासी पॅसेंजर रेल्वे बंद असल्या कारणाने त्रस्त आहेत. परभणी, गंगाखेड पॅसेंजर रेल्वे गाड्या चालू नसल्या कारणाने बस प्रवासामुळे खिशाला जास्त भुर्दंड बसत आहे. हैदराबादसारख्या लांब पल्याच्या पॅसेंजर चालू नसल्यामुळे सर्वसामान्य प्रवासी हैराण आहेत. परळी स्टेशनवरून पूर्वीप्रमाणे रेल्वेसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी. अश्विन मोगरकर, व्यवसायिक परळी.

गेल्या नऊ महिन्यांपासून पॅसेंजर रेल्वे गाड्या चालू नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेने प्रवास करणे अशक्य झाले आहे, एक्सप्रेस रेल्वे गाड्यामुळे तिकीट जास्त लागत आहे, याचा रेल्वे प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला आहे, पॅसेंजर रेल्वे गाड्या त्वरित चालू करणे आवश्यक आहे.

-जयंत वेताळ ,

कोरोना पूर्वी परळी रेल्वे स्थानकातून २० रेल्वे धावायच्या, आता ८ रेल्वे धावतात.