शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

६५६ गावात स्मशानभूमीच नाही; बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:चेच रचले सरण

By शिरीष शिंदे | Updated: June 12, 2023 19:38 IST

सामाजिक कार्यकर्ते एकवटले; पावसाळ्यातील अंत्यसंस्काराच्यावेळी होणारी हेळसांड थांबविण्याची मागणी

बीड: जिल्ह्यातील १३९४ पैकी ६५६ लहान मोठ्या गावात स्मशानभूमीची सोय नसल्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार दरम्यान मृतदेहाची हेळसांड होते. जिल्हा प्रशासनासाने स्मशानभुमीचा प्रश्न निकाली काढवा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वत:चे सरण रचून सोमवारी आंदोलन केले. या आंदोलनात इतर सामाजिक कार्यकर्तेही सहभागी होत जोरदार घोषणाबाजी केली.

जिल्ह्यातील ६५६ गावामध्ये स्मशानभुमी नाही. अस्तित्वात असलेल्या स्मशानभूमीची सुद्धा दुरावस्था झाली असून अंत्यसंस्कार दरम्यान काही गावांमध्ये ग्रामस्थांमध्ये वादविवाद होऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. काही गावात स्मशानभूमीसाठी ग्रामपंचायतच्या मालकी हक्काची जागा नसते, त्यामुळे उघड्यावर अंत्यसंस्काराची वेळ येते. अशा ठिकाणी शासनाने गायरान जमिनीतुन जागा उपलब्ध करून द्यावी. काही गावात स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण केल्यामुळे रस्ता अडवला गेला आहे. त्यामुळे वादविवाद निर्माण होतात. असे वादविवाद टाळण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात यावीत अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. तसेच काही गावांमध्ये विशिष्ट समाजासाठी स्मशानभूमी असते. त्याशिवाय काही गावात शेतालगत अंत्यसंस्कार केले जातात. परंतु तेथील शेतकऱ्यांचा विरोध असतो. केज तालुक्यातील सोनेसांगवी (सुर्डी) या ठिकाणी ३ महिन्यात ३ मागासवर्गीय समाजाचे अंत्यविधी रोखण्याचा प्रकार घडला होता तर परळी तालुक्यातील वडखेल या गावात स्मशानभूमीवर अतिक्रमण असल्याने प्रेत शेतात जाळण्याची वेळ आली होती. जिल्हा प्रशासनाला गांभीर्य नाही.

यांनी केले आंदोलनस्मशानभुमीचा प्रश्न निकाली काढावा या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदने दिली मात्र कोणतीच कारवाई न केल्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरण रचुन ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनात रामनाथ खोड, शेख युनुस, बलभीम उबाळे, मुबीन शेख, मुस्ताक शेख, अशोक येडे, बाळासाहेब मुळे आदी सहभागी होते. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना दिले.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीड