शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत ग्रा.पं.च्या ५६६ उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : तालुक्यात काही महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत ५६६ उमेवारांना नोटीसा देऊनही निवडणूक खर्चाचा हिशेब सादर ...

ठळक मुद्देतहसीलदारांकडून जिल्हाधिकाºयांकडे प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : तालुक्यात काही महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत ५६६ उमेवारांना नोटीसा देऊनही निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नाही. या उमेदवारांविरूध्द कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.

तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात पार पडल्या होत्या. ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार निवडणुकीस उभे असलेल्या उमेदवाराने रोज व शेवटी संपूर्ण निवडणूक खर्चाच्या हिशेबाचा अहवाल सादर करणे बंधनकारक असते. तालुक्यात पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या ८३ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत सरपंचपदासाठी ४३२ उमेदवारांनी निवडणूक लढविली त्यापैकी ३०० उमेदवारांनी खर्चाचा हिशेब सादर केला तर १३२ उमेदवारांनी हिशेब सादर केला नाही.

ग्रामपंचायत सदस्यासाठी २११६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते यापैकी १६८१ उमेदवारांनी हिशेब सादर केला तर ४३४ जणांनी हिशेब सादर केलाच नाही. सरपंच व सदस्य पदासाठी उभे असलेल्या ५६६ उमेदवारांनी खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याने तहसीलदार संतोष रुईकर यांनी नोटीसा देऊन त्वरीत हिशेब देण्याचे सांगितले होते. परंतु नोटीसा देऊनही हिशेब सादर केला नसल्याने या उमेदवारांविरूद्ध निवडणूक नियम भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्तावित करण्यात आले आहे.

  • अपात्रता किंवा निवडणुकीस बंदी

निवडून आलेल्या, बिनविरोध विजयी झालेल्या व पराभूत उमेदवारास निकालानंतर एक महिन्याच्या कालावधीत आपल्या निवडणूक खर्चाचा संपूर्ण हिशेब निवडणूक आयोगाला सादर कारणे बंधनकारक असते. नोटीसा देऊनही हिशेब सादर न करणाºया उमेदवारांवर जिल्हाधिकारी कारवाई करु शकतात. निवडूण आलेल्या उमेदवार अपात्र ठरु शकतो तर पराभूत उमेदवारास पुढील निवडणूक लढविण्यास बंदी केली जाऊ शकते.

वरिष्ठांकडे अहवाल पाठवला

नोटीस देऊनही उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च सादर केला नाही. हा निवडणूक नियमाचा भंग केल्याने या उमेदवारांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.-संतोष रूईकर,तहसीलदार, अंबाजोगाई