शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

बीड जिल्ह्यात तीन महिन्यात ५२ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:27 IST

बीड : जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यात शासन व प्रशासन दोन्ही अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी ...

ठळक मुद्देमदत तोकडी : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब मदतीपासून वंचित, ‘उभारी’ ची बैठक नाही

बीड : जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यात शासन व प्रशासन दोन्ही अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी एप्रिल महिना अखेरपर्यंत ५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामधील बहुतांश शेतकऱ्यांनी दुष्काळी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे कारण पुढे आले आहे.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थती व प्रशासनाची उदासिनता यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजना कमी पडत आहेत. मागील दोन वर्ष सलग कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच कापसावर बोंडअळीचा प्रदुर्भाव झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचीत सापडले आहेत. तसेच कर्ज माफ केल्याची घोषणा शासनाने केली. मात्र, अद्यापपर्यंत अनेक शेतकरी पात्र असूनही त्यांच्या नावे शेतीसाठी कर्ज दिसत आहे. तसेच नवीन कर्ज देण्यास बँकांकडून अडवणूक केली जात आहे. त्यामुळे आर्थिक अडचण व सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीची झालेली अवस्था तसेच हाताला काम नसल्यामुळे शेतकºयांमध्ये नैराश्य असल्याचे दिसून येत आहे. ते दूर करण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणारे प्रयत्न तोकडे पडत आहेत.आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या कुटुंबाला विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाच्या वतीने ‘उभारी’ योजना सुरु केलेली आहे. यामधून आत्मत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला विहीर, घरकुल, शेतीसाठीच्या विविध योजना देण्यात येतात. मात्र, दोन महिन्यांपासून उभारीची बैठक झाली नसल्याची देखील सूत्रांची माहिती आहे.मागील वर्षी १९१ शेतकरी आत्महत्यामगील वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत १९१ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यापैकी १५० शेतकरी मदतीसाठी पात्र झाले होते तसेच त्यांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे.तसेच उभारी अतंर्गत विविध योजना देखील दिल्याचे दिसून येत आहे. मात्र, अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील अधिकाºयांकडून कागदपत्रे देण्यासाठी योग्य सहकार्य केले जात नाही.सदरील कारणास्तव अनेक जण योजनांच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांकडून सांगण्यात आले.अनुदानाचे तात्काळ वाटप करण्याची मागणीदुष्काळी अनुदानाची रक्कम व शासनाकडून पाठवण्यात आलेले विविध अनुदानाची रक्कम जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने वाटप केली जात नाही.ही गंभीर बाब असून प्रशासनाकडून डीडीसी बँकेवर कारवाई करुन तात्काळ अनुदानाचे वाटप करावे अशी मागणी शेतकºयांमधून करण्यात येत आहे.

टॅग्स :Beedबीडfarmer suicideशेतकरी आत्महत्या