शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

नारायणगडाच्या विकासावर होणार ४५ कोटी रुपयांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : श्री क्षेत्र नारायणगडाचा विकास आराखडा तयार झाला असून, येत्या दोन वर्षांमध्ये विविध विकास कामे ...

ठळक मुद्देविनायक मेटे यांची पत्रपरिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : श्री क्षेत्र नारायणगडाचा विकास आराखडा तयार झाला असून, येत्या दोन वर्षांमध्ये विविध विकास कामे पूर्ण होतील. २५ कोटी रुपयांच्या निधीसह रस्त्यांच्या कामांसाठी १५ कोटी आणि पाणीपुरवठ्यासाठी जवळपास ४ कोटी रुपये या योजनांवर खर्च होणार आहेत, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा आ. विनायक मेटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

२५ कोटी रुपये निधीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. या दौ-याच्या निमित्ताने पाहणी करण्यासाठी आ. विनायक मेटे, विश्वस्थ माजी आ. राजेंद्र जगताप, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, राजेंद्र मस्के, प्रभाकर कोलंगडे, अनिल घुमरे, तहसीलदार अविनाश शिंगटे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पुणे येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री हेलिकॉप्टरद्वारे थेट नारायणगडावर येतील आणि कार्यक्रम आटोपून रवाना होतील. सध्यातरी या कार्यक्रमाव्यतिरिक्त दुसरा कुठलाही कार्यक्रम नाही. गडावर भक्त निवास, चार कक्षांचे विश्रामगृह, २५ हजार भाविक बसतील एवढे सांस्कृतिक सभागृह, दोन हजार भाविक क्षमतेचे दोन प्रसादालय, एक हजार जनावरांसाठी गोशाळा, पोलीस मदत केंद्र, भोजनालय, विक्री केंद्रे, वस्तू संग्रहालय, सिमेंट क्राँक्रिटचे वाहनतळ, बसस्थानक, जल व्यवस्थापन, पुरुष आणि महिलांसाठी प्रत्येकी २५ सुलभ शौचालय, मंदिर परिसरात दगडी फरशी बांधकाम, चारही दिशांना प्रवेशद्वार आदी कामे होणार आहेत.विकास कामांसदर्भात आ. मेटे म्हणाले, मुख्य रस्ता ते श्री क्षेत्र नारायणगडास जोडणाºया चारही दिशेने रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. नवगण राजुरीकडून येणारा सात किमीचा रस्ता, साक्षाळपिंप्रीकडून येणारा रस्ता (४ किमी), केतुराकडून येणारा जोडरस्ता (४ किमी), पौंडूळ क्र. १, २, ३ कडून येणारा जोडरस्ता (६ किमी), अंतर्गत रस्ते (२ किमी) आणि रिंगरोड (६ किमी) रस्त्याची कामे प्रस्तावित आहेत.

या कामावर १५ कोटी रुपये खर्च होईल. याशिवाय गडावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. १५ फेब्रुवारी रोजी जवळपास ११०० झाडे लावण्यात येतील. उर्वरित १५ हजार झाडे पावसाळ्यात लावण्याचा मानस आहे. ही झाडे जगविण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन केली जाणार आहे. गडावरील भाविकांसाठीही पाणीपुरवठा योजना प्रस्तावित असून, ती ही मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.