शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नारायणगडाच्या विकासावर होणार ४५ कोटी रुपयांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : श्री क्षेत्र नारायणगडाचा विकास आराखडा तयार झाला असून, येत्या दोन वर्षांमध्ये विविध विकास कामे ...

ठळक मुद्देविनायक मेटे यांची पत्रपरिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : श्री क्षेत्र नारायणगडाचा विकास आराखडा तयार झाला असून, येत्या दोन वर्षांमध्ये विविध विकास कामे पूर्ण होतील. २५ कोटी रुपयांच्या निधीसह रस्त्यांच्या कामांसाठी १५ कोटी आणि पाणीपुरवठ्यासाठी जवळपास ४ कोटी रुपये या योजनांवर खर्च होणार आहेत, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा आ. विनायक मेटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

२५ कोटी रुपये निधीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. या दौ-याच्या निमित्ताने पाहणी करण्यासाठी आ. विनायक मेटे, विश्वस्थ माजी आ. राजेंद्र जगताप, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, राजेंद्र मस्के, प्रभाकर कोलंगडे, अनिल घुमरे, तहसीलदार अविनाश शिंगटे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पुणे येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री हेलिकॉप्टरद्वारे थेट नारायणगडावर येतील आणि कार्यक्रम आटोपून रवाना होतील. सध्यातरी या कार्यक्रमाव्यतिरिक्त दुसरा कुठलाही कार्यक्रम नाही. गडावर भक्त निवास, चार कक्षांचे विश्रामगृह, २५ हजार भाविक बसतील एवढे सांस्कृतिक सभागृह, दोन हजार भाविक क्षमतेचे दोन प्रसादालय, एक हजार जनावरांसाठी गोशाळा, पोलीस मदत केंद्र, भोजनालय, विक्री केंद्रे, वस्तू संग्रहालय, सिमेंट क्राँक्रिटचे वाहनतळ, बसस्थानक, जल व्यवस्थापन, पुरुष आणि महिलांसाठी प्रत्येकी २५ सुलभ शौचालय, मंदिर परिसरात दगडी फरशी बांधकाम, चारही दिशांना प्रवेशद्वार आदी कामे होणार आहेत.विकास कामांसदर्भात आ. मेटे म्हणाले, मुख्य रस्ता ते श्री क्षेत्र नारायणगडास जोडणाºया चारही दिशेने रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. नवगण राजुरीकडून येणारा सात किमीचा रस्ता, साक्षाळपिंप्रीकडून येणारा रस्ता (४ किमी), केतुराकडून येणारा जोडरस्ता (४ किमी), पौंडूळ क्र. १, २, ३ कडून येणारा जोडरस्ता (६ किमी), अंतर्गत रस्ते (२ किमी) आणि रिंगरोड (६ किमी) रस्त्याची कामे प्रस्तावित आहेत.

या कामावर १५ कोटी रुपये खर्च होईल. याशिवाय गडावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. १५ फेब्रुवारी रोजी जवळपास ११०० झाडे लावण्यात येतील. उर्वरित १५ हजार झाडे पावसाळ्यात लावण्याचा मानस आहे. ही झाडे जगविण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन केली जाणार आहे. गडावरील भाविकांसाठीही पाणीपुरवठा योजना प्रस्तावित असून, ती ही मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.