शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

महावितरणचा शॉक; सोलार पंपासाठी पैसे भरूनही ४०५५ शेतकरी प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 18:59 IST

१३ कंपन्यांकडून जिल्ह्यात सौर कृषिपंप बसविण्याचे काम केले जात आहे

ठळक मुद्देलाॅकडाऊन व इतर कारणे सांगत शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळमहावितरणकडून केवळ काम सुरू असल्याचा बोभाटा केला जात आहे.

बीड : शेतकऱ्याला सिंचन करणे शक्य व्हावे, राज्य शासनाची पारंपरिक  पद्धतीने कृषिपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे, याकरिता पारेषणविरहित सौर कृषिपंप बसविण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना राबविण्यात आली होती; परंतु बीड जिल्ह्यात याचे तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे. ७ हजार २३५ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आणि पैसे भरूनही अद्याप ४ हजार ५५ शेतकरी यापासून वंचित आहेत. महावितरणकडून केवळ काम सुरू असल्याचा बोभाटा केला जात आहे.

कंपन्यांवर नियंत्रण नसल्याने कामे रखडली१३ कंपन्यांकडून जिल्ह्यात सौर कृषिपंप बसविण्याचे काम केले जात आहे; परंतु या कंपन्यांना कसलेच उद्दिष्ट दिलेले नाही. या कपंन्यांवर महावितरणचे नियंत्रण नसल्याने मनमानी कारभार सुरू आहे. याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित असतानाही वरिष्ठांकडू ते निकाली काढण्यासाठी उपाययोजना केल्या जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

सोलार पंप योजनेंतर्गत आतापर्यंत ७२३५ अर्ज आले आहेत. त्यापैकी १९७ विविध त्रुटींमुळे रद्द केले आहेत. २९८३ पंपांचे काम पूर्ण झालेले आहे. राहिलेले पंप बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे.  लॉकडाऊन व इतर अडचणींमुळे ते बसविण्यास वेळ लागला. १३ कंपन्या हे काम करीत आहेत.  -रवींद्र कोळप, अधीक्षक अभियंता, महावितरण, बीड

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती