शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान अनुदानाचे ३८३ कोटी जमा, २३९ बाकी

By शिरीष शिंदे | Updated: September 27, 2023 19:14 IST

ई-केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम होतेय जमा

बीड : मागच्या वर्षी अतिवृष्टी व सततचा पाऊस तर मार्च व एप्रिल २०२३मधील अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेती पिकांचे नुकसान झाले होते. सदरील चार ही नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शासन निर्णयाद्वारे ८ लाख १४ हजार ३६ शेतकऱ्यांना ६२२ कोटी रुपये देण्याचे निश्चित झाले होते. त्यापैकी आतापर्यंत ३८३ कोटी अनुदान ४ लाख ४६ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले असून, २३९ कोटी रुपये बाकी आहेत. शासनाकडे अनुदानाची रक्कम उपलब्ध आहे; परंतु अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याने अनुदान वाटपाची गती मंदावली आहे.

पूर्वी जिल्हा स्तरावरून बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप केले जात असे, परंतु यावर्षीपासून राज्य स्तरावरून अनुदान वाटपास सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने सॉफ्टवेअर तयार केले असून, त्याद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होत आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी तहसील स्तरावरून याद्या मागविल्या जातात. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या याद्या पुढे सदरील सॉफ्टवेअर अपलोड केल्या जातात; परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने ई-केवायसी असणे बंधनकारक केले आहे. दरम्यान, मागच्या तीन महिन्यांच्या कालावधीत ५ लाख ७८ हजार ३६४ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ३८३ कोटी ५ लाख रुपये अनुदान जमा झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना समाधान मिळाले आहे.

व्हिके लिस्ट तलाठ्यांकडे उपलब्धव्हिके लिस्ट व अनुदान दिलेल्या शेतकऱ्यांची यादी तलाठ्यांकडे उपलब्ध आहे. ज्यांचे ई-केवायसी झालेले आहे त्यांचे नाव यादी नाही. मात्र, ज्या शेतकऱ्याच्या नावापुढे व्हिके नंबर पडला आहे त्यांनाच ई-केवायसी करून घ्यायची आहे. ज्यांची ई-केवायसी राहिले आहे त्यांनी ती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नैसर्गिक आपत्ती अनुदान स्थितीकालावधी-बाधित शेतकरी-नुकसान रक्कम (कोटीत)-खात्यावर जमा रक्कमअतिवृष्टी २०२२-३५१६३४-४१०.२२-२८७.५५सततचा पाऊस २०२२-४३७६८८-१९५.०३-८९.६१अवकाळी पाऊस मार्च २०२३-८५०३-५.९९-१.८०अवकाळी पाऊस एप्रिल २०२३-१६२११-११.३२-४.०९एकूण-८१४०३६-६२२.५८-३८३.०५

देर आये दुरुस्त आयेमागच्या वर्षी शासनाने जीआर काढून मंजूर केलेली अनुदानाची रक्कम आत बँक खात्यावर जमा केली जात आहे. वास्तविकत: ही मदत शासनाने खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच देणे अपेक्षित होते. परंतु शासनाने उशिरा अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू केली. मागच्या तीन महिन्यांत पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातुर होते. अशी बिकट स्थिती असताना अनुदानाची रक्कम अनेकांच्या बँक खात्यावर जमा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. अद्याप निम्मी रक्कम जमा होणे बाकी आहे, शेतकऱ्यांनी ई-केवायसी केल्यानंतर उर्वरित रक्कम खात्यावर जमा होईल. यासोबतच किती रक्कम शासनाकडून येणे बाकी आहे हे सुद्धा समजून येईल. ई-केवायसीमुळे किती रक्कम शासनाकडे प्रलंबित आहे याचा उलगडा होईल.

टॅग्स :BeedबीडState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी