शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान अनुदानाचे ३८३ कोटी जमा, २३९ बाकी

By शिरीष शिंदे | Updated: September 27, 2023 19:14 IST

ई-केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम होतेय जमा

बीड : मागच्या वर्षी अतिवृष्टी व सततचा पाऊस तर मार्च व एप्रिल २०२३मधील अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेती पिकांचे नुकसान झाले होते. सदरील चार ही नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शासन निर्णयाद्वारे ८ लाख १४ हजार ३६ शेतकऱ्यांना ६२२ कोटी रुपये देण्याचे निश्चित झाले होते. त्यापैकी आतापर्यंत ३८३ कोटी अनुदान ४ लाख ४६ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले असून, २३९ कोटी रुपये बाकी आहेत. शासनाकडे अनुदानाची रक्कम उपलब्ध आहे; परंतु अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याने अनुदान वाटपाची गती मंदावली आहे.

पूर्वी जिल्हा स्तरावरून बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप केले जात असे, परंतु यावर्षीपासून राज्य स्तरावरून अनुदान वाटपास सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने सॉफ्टवेअर तयार केले असून, त्याद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होत आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी तहसील स्तरावरून याद्या मागविल्या जातात. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या याद्या पुढे सदरील सॉफ्टवेअर अपलोड केल्या जातात; परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने ई-केवायसी असणे बंधनकारक केले आहे. दरम्यान, मागच्या तीन महिन्यांच्या कालावधीत ५ लाख ७८ हजार ३६४ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ३८३ कोटी ५ लाख रुपये अनुदान जमा झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना समाधान मिळाले आहे.

व्हिके लिस्ट तलाठ्यांकडे उपलब्धव्हिके लिस्ट व अनुदान दिलेल्या शेतकऱ्यांची यादी तलाठ्यांकडे उपलब्ध आहे. ज्यांचे ई-केवायसी झालेले आहे त्यांचे नाव यादी नाही. मात्र, ज्या शेतकऱ्याच्या नावापुढे व्हिके नंबर पडला आहे त्यांनाच ई-केवायसी करून घ्यायची आहे. ज्यांची ई-केवायसी राहिले आहे त्यांनी ती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नैसर्गिक आपत्ती अनुदान स्थितीकालावधी-बाधित शेतकरी-नुकसान रक्कम (कोटीत)-खात्यावर जमा रक्कमअतिवृष्टी २०२२-३५१६३४-४१०.२२-२८७.५५सततचा पाऊस २०२२-४३७६८८-१९५.०३-८९.६१अवकाळी पाऊस मार्च २०२३-८५०३-५.९९-१.८०अवकाळी पाऊस एप्रिल २०२३-१६२११-११.३२-४.०९एकूण-८१४०३६-६२२.५८-३८३.०५

देर आये दुरुस्त आयेमागच्या वर्षी शासनाने जीआर काढून मंजूर केलेली अनुदानाची रक्कम आत बँक खात्यावर जमा केली जात आहे. वास्तविकत: ही मदत शासनाने खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच देणे अपेक्षित होते. परंतु शासनाने उशिरा अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू केली. मागच्या तीन महिन्यांत पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातुर होते. अशी बिकट स्थिती असताना अनुदानाची रक्कम अनेकांच्या बँक खात्यावर जमा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. अद्याप निम्मी रक्कम जमा होणे बाकी आहे, शेतकऱ्यांनी ई-केवायसी केल्यानंतर उर्वरित रक्कम खात्यावर जमा होईल. यासोबतच किती रक्कम शासनाकडून येणे बाकी आहे हे सुद्धा समजून येईल. ई-केवायसीमुळे किती रक्कम शासनाकडे प्रलंबित आहे याचा उलगडा होईल.

टॅग्स :BeedबीडState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी