शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान अनुदानाचे ३८३ कोटी जमा, २३९ बाकी

By शिरीष शिंदे | Updated: September 27, 2023 19:14 IST

ई-केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम होतेय जमा

बीड : मागच्या वर्षी अतिवृष्टी व सततचा पाऊस तर मार्च व एप्रिल २०२३मधील अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेती पिकांचे नुकसान झाले होते. सदरील चार ही नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शासन निर्णयाद्वारे ८ लाख १४ हजार ३६ शेतकऱ्यांना ६२२ कोटी रुपये देण्याचे निश्चित झाले होते. त्यापैकी आतापर्यंत ३८३ कोटी अनुदान ४ लाख ४६ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले असून, २३९ कोटी रुपये बाकी आहेत. शासनाकडे अनुदानाची रक्कम उपलब्ध आहे; परंतु अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याने अनुदान वाटपाची गती मंदावली आहे.

पूर्वी जिल्हा स्तरावरून बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप केले जात असे, परंतु यावर्षीपासून राज्य स्तरावरून अनुदान वाटपास सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने सॉफ्टवेअर तयार केले असून, त्याद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होत आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी तहसील स्तरावरून याद्या मागविल्या जातात. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या याद्या पुढे सदरील सॉफ्टवेअर अपलोड केल्या जातात; परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने ई-केवायसी असणे बंधनकारक केले आहे. दरम्यान, मागच्या तीन महिन्यांच्या कालावधीत ५ लाख ७८ हजार ३६४ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ३८३ कोटी ५ लाख रुपये अनुदान जमा झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना समाधान मिळाले आहे.

व्हिके लिस्ट तलाठ्यांकडे उपलब्धव्हिके लिस्ट व अनुदान दिलेल्या शेतकऱ्यांची यादी तलाठ्यांकडे उपलब्ध आहे. ज्यांचे ई-केवायसी झालेले आहे त्यांचे नाव यादी नाही. मात्र, ज्या शेतकऱ्याच्या नावापुढे व्हिके नंबर पडला आहे त्यांनाच ई-केवायसी करून घ्यायची आहे. ज्यांची ई-केवायसी राहिले आहे त्यांनी ती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नैसर्गिक आपत्ती अनुदान स्थितीकालावधी-बाधित शेतकरी-नुकसान रक्कम (कोटीत)-खात्यावर जमा रक्कमअतिवृष्टी २०२२-३५१६३४-४१०.२२-२८७.५५सततचा पाऊस २०२२-४३७६८८-१९५.०३-८९.६१अवकाळी पाऊस मार्च २०२३-८५०३-५.९९-१.८०अवकाळी पाऊस एप्रिल २०२३-१६२११-११.३२-४.०९एकूण-८१४०३६-६२२.५८-३८३.०५

देर आये दुरुस्त आयेमागच्या वर्षी शासनाने जीआर काढून मंजूर केलेली अनुदानाची रक्कम आत बँक खात्यावर जमा केली जात आहे. वास्तविकत: ही मदत शासनाने खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच देणे अपेक्षित होते. परंतु शासनाने उशिरा अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू केली. मागच्या तीन महिन्यांत पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातुर होते. अशी बिकट स्थिती असताना अनुदानाची रक्कम अनेकांच्या बँक खात्यावर जमा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. अद्याप निम्मी रक्कम जमा होणे बाकी आहे, शेतकऱ्यांनी ई-केवायसी केल्यानंतर उर्वरित रक्कम खात्यावर जमा होईल. यासोबतच किती रक्कम शासनाकडून येणे बाकी आहे हे सुद्धा समजून येईल. ई-केवायसीमुळे किती रक्कम शासनाकडे प्रलंबित आहे याचा उलगडा होईल.

टॅग्स :BeedबीडState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी