शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

गेवराईच्या शास्त्री चौकातील ३३ दुकाने अखेर नगर परिषदेने पाडली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 14:49 IST

न्यायालयात प्रकरण सुरु असतानाही नगर परिषदेने पाडापाडी कशी केली? असा सवाल व्यापाऱ्यांनी केला आहे

गेवराई : शहरातील शास्त्री चौकातील ३३ दुकानांवर अखेर आज नगर परिषदेचा हातोडा पडला. सकाळी ६ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी व नगर परिषदेचे मुख्यधिकारी यांच्या आदेशाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही दुकाने  पाडण्यात आली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील शास्त्री चौकात नगर परिषदेने १९८० साली ३३ दुकाने उभारली. काही व्यापाऱ्यांनी भाडेतत्वावर दुकाने घेतली. दरम्यान, या दुकानांच्या मागे नगरपरिषदेने २००४ व २०१० मध्ये तब्बल १८ गाळ्यांचे बांधकाम केले. नवीन दुकानांचा लिलाव देखील  झाला आहे. त्यानंतर समोरील जुनी दुकाने पडण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. मात्र, जुन्या दुकानांतील व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेत पाडापाडीच्या आदेशाला स्थगिती मिळवली. 

अनेकवेळा नगरपरिषदेने ही दुकाने पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यापारी न्यायालयाचा दरवाजा ठोठावत. मात्र जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्या आदेशाने सकाळी ६ च्या सुमारास नगर परिषद, पोलिस प्रशासन, महसूल अधिकार व कर्मचारी यांच्या पथकाने जुनी ३३ दुकाने जमिनदोस्त केली. यामुळे शास्त्री चौकाने अखेर मोकळा श्वास घेतला आहे. मात्र, न्यायालयात प्रकरण सुरु असतानाही नगर परिषदेने पाडापाडी कशी केली? असा सवाल करत व्यापाऱ्यांनी रोष व्यक्त केला. 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणBeedबीड