शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शकक्तिशाली सॅटेलाईट
3
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
4
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
5
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
6
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
7
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
8
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
9
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
10
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
11
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
12
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
13
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
14
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
15
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
16
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
17
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
18
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
19
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
20
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 

दुष्काळी ते ३० कोटींची उलाढाल; छोट्याशा रुई गावाने रेशीम व्यवसायातून केला कायापालट

By शिरीष शिंदे | Updated: August 17, 2022 12:10 IST

१२०० एकरवर तुती लागवड करुन देशात ठरले अव्वल

- शिरीष शिंदेबीड: गेवराई तालुक्यातील रुई गावात तब्बल १२०० एकर क्षेत्रावर तुती लागवड झाल्याने हे गाव देशात पहिल्या क्रमांकावर आले आहे. एवढेच नव्हे तर रुई गावात दर्जेदार रेशीम उत्पादित होत असून त्यातून महिन्याकाठी तब्बल तीन कोटीं रुपयांची तर वर्षाकाठी जवळपास ३० कोटींहून अधिक उलाढाल होत आहे.

दहा वर्षापूर्वी रूई गावामध्ये पाणीटंचाई खूप होती, आजही पाण्याची समस्या आहे. गावातील शेतकरी कापूस, गहू व तूर या पिकांशिवाय इतर पिके घेत नव्हते. काही शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचे प्रशिक्षण घेतले. शेती उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांनी रेशीम उद्याेगाचा ध्यास धरला. पाहता पाहता रई गावात रेशीम व्यवसाय वाढला असून आजघडीला या गावात जवळपास ४५० ते ५०० शेतकरी या व्यवसायात उतरले आहेत. गावातील ३५० शेतकऱ्यांनी पोखरा योजनेतर्गंत तर मनरेगा योजनेतर्गंत १०५ शेतकऱ्यांनी तुती लागवड केली आहे.

हिवाळ्यात असतो अधिक भावएक क्विंटल रेशीम कोषाला ८० ते ९० हजार रुपयांपर्यंतचा भाव शेतकऱ्यांना मिळालेला आहे. वातावरणानुसार कमी अधिक भाव असतो. सध्या दमट व ओलसर वातावरण असल्याने सध्या ५० ते ५५ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. रेशीम कोष खरेदीचा भावात चढ-उतार चालूच असते, असे सांगण्यात आले.

३०० मजुरांच्या हाताला कामकापसाच्या जिनिंगला मजूर पुरवणारे गाव म्हणून रूई गावाची ओळख होती. आता गावातील शेतकरी रेशीम व्यवसायातून सधन झाले असल्याने अनेकांसाठी रोजगार उपलब्ध झाला आहे. गावात आजच्या घडीला २५० ते ३०० मजूर कामाला असून पुरुषाला ६०० तर महिलेस ३५० रुपये मजुरी दिली जाते.

आता व्यापारीच येतात गावातपूर्वी गावातील शेतकरी बंगलोर येथे जाऊन रेशीम कोष विक्री करत असत, मात्र आता गावात उत्पादित होणारे रेशीम कोष उत्कृष्ट असल्याने बाहेर राज्यातून व्यापारी गावात येऊन रेशीम कोष खरेदी करत आहेत. शेतकऱ्यांना बाहेर जिल्हा किंवा राज्यात रेशीम कोष नेऊन विकण्याचा त्रासही कमी झाला अन् जागेवर कोषाची खरेदी होत असल्याचा दुहेरी फायदा ग्रामस्थांचा होऊ लागला आहे.

आधी राज्यात , आता देशात पहिला क्रमांकगावाजवळ मोठे तळे नसल्याने पाणी समस्या कायम होती. ग्रामपंचायत ताब्यात आल्यानंतर प्रथमतः मनरेगातर्गंत कामे हाती घेतली. गावात टँकर चालायचे म्हणून मनरेगा योजनेतून आतापर्यंत ४८ शेततळ्यांची कामे झालेली आहे. आजच्या घडीला जवळपास ४५० ते ५०० शेतकरी रेशीम व्यवसाय करत असून सधन झाले आहेत. तुती लागवडीत माझे गाव राज्यात एक नंबर होते आता देशात पहिल्या क्रमाकांवर पोहोचले आहे. सध्या गावात १२०० एकरांवर तुतीची लागवड झाली असून रेशीम व्यवसायातून प्रतिमहिना तीन कोटींची उलाढाल होत आहे.- कालिदास नवले, सरपंच, रूई, ता. गेवराई.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीBeedबीड