शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दुष्काळी ते ३० कोटींची उलाढाल; छोट्याशा रुई गावाने रेशीम व्यवसायातून केला कायापालट

By शिरीष शिंदे | Updated: August 17, 2022 12:10 IST

१२०० एकरवर तुती लागवड करुन देशात ठरले अव्वल

- शिरीष शिंदेबीड: गेवराई तालुक्यातील रुई गावात तब्बल १२०० एकर क्षेत्रावर तुती लागवड झाल्याने हे गाव देशात पहिल्या क्रमांकावर आले आहे. एवढेच नव्हे तर रुई गावात दर्जेदार रेशीम उत्पादित होत असून त्यातून महिन्याकाठी तब्बल तीन कोटीं रुपयांची तर वर्षाकाठी जवळपास ३० कोटींहून अधिक उलाढाल होत आहे.

दहा वर्षापूर्वी रूई गावामध्ये पाणीटंचाई खूप होती, आजही पाण्याची समस्या आहे. गावातील शेतकरी कापूस, गहू व तूर या पिकांशिवाय इतर पिके घेत नव्हते. काही शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचे प्रशिक्षण घेतले. शेती उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांनी रेशीम उद्याेगाचा ध्यास धरला. पाहता पाहता रई गावात रेशीम व्यवसाय वाढला असून आजघडीला या गावात जवळपास ४५० ते ५०० शेतकरी या व्यवसायात उतरले आहेत. गावातील ३५० शेतकऱ्यांनी पोखरा योजनेतर्गंत तर मनरेगा योजनेतर्गंत १०५ शेतकऱ्यांनी तुती लागवड केली आहे.

हिवाळ्यात असतो अधिक भावएक क्विंटल रेशीम कोषाला ८० ते ९० हजार रुपयांपर्यंतचा भाव शेतकऱ्यांना मिळालेला आहे. वातावरणानुसार कमी अधिक भाव असतो. सध्या दमट व ओलसर वातावरण असल्याने सध्या ५० ते ५५ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. रेशीम कोष खरेदीचा भावात चढ-उतार चालूच असते, असे सांगण्यात आले.

३०० मजुरांच्या हाताला कामकापसाच्या जिनिंगला मजूर पुरवणारे गाव म्हणून रूई गावाची ओळख होती. आता गावातील शेतकरी रेशीम व्यवसायातून सधन झाले असल्याने अनेकांसाठी रोजगार उपलब्ध झाला आहे. गावात आजच्या घडीला २५० ते ३०० मजूर कामाला असून पुरुषाला ६०० तर महिलेस ३५० रुपये मजुरी दिली जाते.

आता व्यापारीच येतात गावातपूर्वी गावातील शेतकरी बंगलोर येथे जाऊन रेशीम कोष विक्री करत असत, मात्र आता गावात उत्पादित होणारे रेशीम कोष उत्कृष्ट असल्याने बाहेर राज्यातून व्यापारी गावात येऊन रेशीम कोष खरेदी करत आहेत. शेतकऱ्यांना बाहेर जिल्हा किंवा राज्यात रेशीम कोष नेऊन विकण्याचा त्रासही कमी झाला अन् जागेवर कोषाची खरेदी होत असल्याचा दुहेरी फायदा ग्रामस्थांचा होऊ लागला आहे.

आधी राज्यात , आता देशात पहिला क्रमांकगावाजवळ मोठे तळे नसल्याने पाणी समस्या कायम होती. ग्रामपंचायत ताब्यात आल्यानंतर प्रथमतः मनरेगातर्गंत कामे हाती घेतली. गावात टँकर चालायचे म्हणून मनरेगा योजनेतून आतापर्यंत ४८ शेततळ्यांची कामे झालेली आहे. आजच्या घडीला जवळपास ४५० ते ५०० शेतकरी रेशीम व्यवसाय करत असून सधन झाले आहेत. तुती लागवडीत माझे गाव राज्यात एक नंबर होते आता देशात पहिल्या क्रमाकांवर पोहोचले आहे. सध्या गावात १२०० एकरांवर तुतीची लागवड झाली असून रेशीम व्यवसायातून प्रतिमहिना तीन कोटींची उलाढाल होत आहे.- कालिदास नवले, सरपंच, रूई, ता. गेवराई.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीBeedबीड