शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

बीडच्या आरोग्य विभागात २९ नवखे डॉक्टर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:56 IST

रिक्त पदांबाबत नेहमीच्या डोकेदुखीमुळे आरोग्य विभागाने आता कंत्राटी पद्धतीवर तब्बल २९ एमबीबीएस डॉक्टरांची ११ महिन्यांसाठी भरती केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : रिक्त पदांबाबत नेहमीच्या डोकेदुखीमुळे आरोग्य विभागाने आता कंत्राटी पद्धतीवर तब्बल २९ एमबीबीएस डॉक्टरांची ११ महिन्यांसाठी भरती केली आहे. सात दिवसांत त्यांना रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. हे सर्व डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण, उपजिल्हा रूग्णालयात सेवा बजावणार आहेत.जिल्हा रूग्णालयासह, उपजिल्हा, ग्रामीण, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ट्रॉमा केअरमध्ये डॉक्टरांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त होती.उपलब्ध डॉक्टरांना रूग्णसेवा बजावताना अडचणी येत होत्या. त्यामुळे आरोग्य विभागाबद्दल सर्वसामान्यांमध्ये तीव्र रोष होता. एखादी दुर्दैवी घटना घडली की थेट हलगर्जीपणा आणि इतर आरोपांमुळे डॉक्टर दबावाखाली काम करत होते. हाच धागा पकडून आरोग्य विभागाने कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची पदे भरण्याचा निर्णय घेतला. १६ जानेवारी रोजी अर्ज मागविले होते. अर्ज केलेल्या ४३ डॉक्टरांच्या जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, डीएचओ डॉ.राधाकिशन पवार, आरएमओ डॉ.सतीश हरीदास यांच्या उपस्थितीत मुलाखती झाल्या. गुणांकन ठरविल्यानंतर सोमवारी त्यांचे समुपदेशन करून त्यांना रिक्त जागी रूजू होण्याचे आदेश मंगळवारी दिल्याचे आरएमओ डॉ.सतीश हरीदास यांनी सांगितले.हलगर्जी केल्यास कारवाईनियुक्त केलेल्या सर्व डॉक्टरांनी मुख्यालयी राहून रूग्णसेवा द्यायची आहे. कामचुकारपणा किंवा हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास येताच थेट कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ही कारवाई नवख्या डॉक्टरांच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे तत्पर कर्तव्य बजावण्याचे आव्हान या डॉक्टरांसमोर आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य