शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

वॉटरकप स्पर्धेत राज्यातील १६ गावे पात्र; मराठवाड्यातील पाच गावांचा समावेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 18:08 IST

पाणी फांउडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत राज्यस्तरीय तपासणीसाठी राज्यातील १६ गावे पात्र झाली असून यात मराठवाड्यातील पाच गावांचा समावेश आहे.

- अनिल महाजन

धारूर ( बीड) : पाणी फांउडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत राज्यस्तरीय तपासणीसाठी राज्यातील १६ गावे पात्र झाली असून यात मराठवाड्यातील पाच गावांचा समावेश आहे. लवकरच या गावाची राज्यस्तरीय स्पर्धेच्या पथकाकडून तपासणी होणार असून यामधूनच पाणीदार गावाची निवड होईल.

पाणी फांउडेशनच्या तिसऱ्या वॉटरकप स्पर्धेत ७५ तालुक्यांचा व राज्यातील दोन हजारांपेक्षा जास्त गावांचा समावेश होता. या गावांनी  ८ एप्रील ते २२ मे या कालावधीत जलबचतीचे काम केले. स्पर्धा सुरू होताच १३ मुद्यांचे गुणांकन व मोजमाप करण्यात आले. नंतर तपासणी करण्यात आली.त्यानंतर तालुकास्तरीय पथकाकडून दोनशेच्या आसपास गावांची तपासणी झाली. यामधून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी १६ गावांची निवड झाली असून यामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येकी पाच तर उत्तर महाराष्ट्रातील एक गावांची निवड झाली होती.

मराठवाड्यातील निवड झालेल्या पाच गावांत बीड  जिल्ह्यातील तीन गावांचा समावेश आहे. यामध्ये आष्टी तालुक्यातील करंजी व आनंदवाडी, केज तालुक्यातील दीपेवडगावचा समावेश आहे.  उर्वरित दोन गावांत औसा तालुक्यातील एकंबेवाडी आणि परंडा तालुक्यातील लंगोटवाडी या गावाचा समावेश आहे. राज्यस्तरीय तीन सदस्यीय तपासणी पथकाकडून लवकरच या गावांची तपासणी होणार आहे. 

मराठवाडा पाणीदार होणारवॉटरकपच्या तिसऱ्या स्पर्धेत मराठवाड्यात उत्कृष्ट काम झाले असून ही जलबचतीची  लोकचळवळ होत आहे. मराठवाडा हा दुष्काळावर मात करत असून अनेक  गावे पाणीदार होत आहेत, अशी माहिती पाणी फांउडेशनचे मराठवाडा समन्वयक संतोष शिनगारे यांनी दिली. 

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाWaterपाणीBeedबीड