शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

अंबाजोगाई तालुक्यातील १६ गावे समृद्धीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:35 IST

अंबाजोगाई : पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील १६ गावांनी स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण ...

अंबाजोगाई : पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील १६ गावांनी स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला. गावातील विहीर पाणी पातळी मोजमाप, विहीर बोरवेल गणना, हंगामनिहाय पीक सर्व्हे इत्यादी कामे करून आपल्या गावाला समृद्धीच्या दिशेला घेऊन जाणाऱ्या गावांचा सन्मान करण्यात आला. टी. बी. गिरवलकर तांत्रिक महाविद्यालयाच्या सभागृहात हो सोहळा पार पडला. यावेळी उपस्थितांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोपे देऊन सन्मान करण्यात आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, गटविकास अधिकारी संदीप घोन्सीकर, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, प्रसाद चिक्षे, प्रा. बाबासाहेब ठोंबरे, धनराज सोळंकी, डॉ. निशिकांत पाचेगावकर, भारत पवार, पानी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक संतोष शिनगारे, विनोद ठोंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी सरकारी योजनेची जोड देऊन आपली शेती समृद्ध करण्याचे आवाहन केले. अनिकेत लोहिया म्हणाले, वॉटर कप स्पर्धेत गावांनी पाणलोटाची खूप कामे केली. परंतु आता या कामातून जे पाणी अडवले त्याचे योग्य नियोजन करून गावे समृद्ध करण्याची गरज आहे.

प्रसाद चिक्षे म्हणाले, गावच्या एकीने तालुक्यात गावाला वेगळी ओळख दिली. पण आता महाराष्ट्रामध्ये गावाची वेगळी ओळख होण्यासाठी गावामध्ये समृद्ध गाव स्पर्धेतील सहा स्तंभांवर कामे करून आपले गाव समृद्धीच्या दिशेने घेऊन जावे. दत्तात्रय गिरी म्हणाले, वॉटर कप स्पर्धा आनंद उत्सव म्हणून साजरी केली. गावे पाणीदार केले. पाण्याचा प्रश्न मिटला. आता समृद्ध स्पर्धेच्या माध्यमातून आपली शेती व आपले गाव समृद्ध करून पुन्हा एकदा आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विनोद ठोंबरे यांनी केले. तर महेश गुळभिले यांनी आभार मानले.

अंबाजोगाईचे दिशादर्शक काम

शरद झाडके म्हणाले, २०१६ साली वॉटर कपच्या माध्यमातून अंबाजोगाई तालुक्याने महाराष्ट्रमध्ये आदर्श असे काम केले. महाराष्ट्राला दिशा दिली. आता समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून परत एकदा दिशादर्शक काम करावे. आपले गाव व तालुका समृद्ध करण्यासाठी लागणाऱ्या प्रशासकीय मदतीसाठी प्रशासन सदैव तत्पर आहे.

या गावांचा झाला सन्मान

ऊजनी, खापरटोन, भतानवाडी, साळुंकवाडी, ममदापूर (परळी), मांडवा(पठाण), गिरवली (आपेट), सुगाव, सेलुअंबा, दैठणा, राडी तांडा, कुंबेफळ, धानोरा (खुर्द), कोळकानडी, सनगाव, वरपगाव आदी गावांचा सन्मान करण्यात आला.

020921\img-20210902-wa0082.jpg

पाणी फाऊंडेशन चा कार्यक्रम