शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

अंबाजोगाई तालुक्यातील १६ गावे समृद्धीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:35 IST

अंबाजोगाई : पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील १६ गावांनी स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण ...

अंबाजोगाई : पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील १६ गावांनी स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला. गावातील विहीर पाणी पातळी मोजमाप, विहीर बोरवेल गणना, हंगामनिहाय पीक सर्व्हे इत्यादी कामे करून आपल्या गावाला समृद्धीच्या दिशेला घेऊन जाणाऱ्या गावांचा सन्मान करण्यात आला. टी. बी. गिरवलकर तांत्रिक महाविद्यालयाच्या सभागृहात हो सोहळा पार पडला. यावेळी उपस्थितांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोपे देऊन सन्मान करण्यात आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, गटविकास अधिकारी संदीप घोन्सीकर, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, प्रसाद चिक्षे, प्रा. बाबासाहेब ठोंबरे, धनराज सोळंकी, डॉ. निशिकांत पाचेगावकर, भारत पवार, पानी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक संतोष शिनगारे, विनोद ठोंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी सरकारी योजनेची जोड देऊन आपली शेती समृद्ध करण्याचे आवाहन केले. अनिकेत लोहिया म्हणाले, वॉटर कप स्पर्धेत गावांनी पाणलोटाची खूप कामे केली. परंतु आता या कामातून जे पाणी अडवले त्याचे योग्य नियोजन करून गावे समृद्ध करण्याची गरज आहे.

प्रसाद चिक्षे म्हणाले, गावच्या एकीने तालुक्यात गावाला वेगळी ओळख दिली. पण आता महाराष्ट्रामध्ये गावाची वेगळी ओळख होण्यासाठी गावामध्ये समृद्ध गाव स्पर्धेतील सहा स्तंभांवर कामे करून आपले गाव समृद्धीच्या दिशेने घेऊन जावे. दत्तात्रय गिरी म्हणाले, वॉटर कप स्पर्धा आनंद उत्सव म्हणून साजरी केली. गावे पाणीदार केले. पाण्याचा प्रश्न मिटला. आता समृद्ध स्पर्धेच्या माध्यमातून आपली शेती व आपले गाव समृद्ध करून पुन्हा एकदा आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विनोद ठोंबरे यांनी केले. तर महेश गुळभिले यांनी आभार मानले.

अंबाजोगाईचे दिशादर्शक काम

शरद झाडके म्हणाले, २०१६ साली वॉटर कपच्या माध्यमातून अंबाजोगाई तालुक्याने महाराष्ट्रमध्ये आदर्श असे काम केले. महाराष्ट्राला दिशा दिली. आता समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून परत एकदा दिशादर्शक काम करावे. आपले गाव व तालुका समृद्ध करण्यासाठी लागणाऱ्या प्रशासकीय मदतीसाठी प्रशासन सदैव तत्पर आहे.

या गावांचा झाला सन्मान

ऊजनी, खापरटोन, भतानवाडी, साळुंकवाडी, ममदापूर (परळी), मांडवा(पठाण), गिरवली (आपेट), सुगाव, सेलुअंबा, दैठणा, राडी तांडा, कुंबेफळ, धानोरा (खुर्द), कोळकानडी, सनगाव, वरपगाव आदी गावांचा सन्मान करण्यात आला.

020921\img-20210902-wa0082.jpg

पाणी फाऊंडेशन चा कार्यक्रम