शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

अतिवृष्टीबाधितांच्या मदतीचा दुसरा हप्ता १५३ कोटी ३७ लाख वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:50 IST

बीड : जिल्ह्यासह राज्यात जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधित अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. ...

बीड : जिल्ह्यासह राज्यात जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधित अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे अतिवृष्टीबाधितांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी २९ ऑक्टोबर रोजी घेतला होता. त्यानुसार बीड जिल्ह्यासाठी ३०६ कोटी रुपये मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या हप्त्यासाठी १५३ कोटी ३७ लाख ६९ हजार रुपये मिळाले होते. आता दुसऱ्या हप्त्याची रक्कम १५३ कोटी ३७ लाख ६७ हजार रुपये ७ जानेवारी रोजी वितरित करण्यात आली आहे. ८ जानेवारी रोजी तहसील स्तरावर ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.

जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान ३३ टक्के नुकसान झाले आहे, अशा बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या (जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके) नुकसानीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर या दराने २ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बीड जिल्ह्यासाठी पहिल्या हप्त्याचे १५३ कोटी ३७ लाख ६७ हजार रुपये आले होते. त्याचे वितरण बँकेकडे करण्यात आले आहे. मात्र, अद्याप बहुुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग झालेली नाही.

दुसऱ्या हप्त्याची रक्कम ७ जानेवारी रोजी १५३ कोटी ३७ लाख ६७ हजार रुपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग झाली असून, ८ जानेवारी रोजी तहसील कार्यालयांकडे वर्ग करण्यात येणार आहे. ही रक्कम पुढील काळात बँकेकडे वर्ग करण्यात येणार असून, त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. शासनाने अनुदानाची पूर्ण रक्कम जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

बँकेकडून पहिल्या टप्प्यातील अनुदान वाटप नाहीच

प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यासाठी बँकेच पैसे जमा केले आहेत. मात्र, अद्याप बहुतांश शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल वायकर व राष्ट्रवादीचे शिवाजी चव्हाण यांनी केली आहे.

आयुक्तांनी केल्या सूचना

शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करावी, जमा झालेल्या रखमेतून कोणतीही वसुली बँकेकडून करण्यात येऊ नये, बँकेचे खाते जुळत नाही किंवा इतर कारणास्तव शिल्लक राहिलेली रक्कम बँकेने तात्काळ प्रशासनाकडे वर्ग करणे अपेक्षित आहे; परंतु तसे केले जात नाही. त्या रकमा बँकेत पडू राहतात. त्यामुळे दर आठवड्याला वर्ग करण्यात आलेल्या रकमेचा ताळमेळ अहवाल बँकेकडून प्रशासनाने घ्यावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनास विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केल्या आहेत.