शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

जिल्ह्यात १५०० रिक्षाचालकांना मिळणार दीड हजार रुपयांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:33 IST

बीड : राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यभरात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले. खासगी वाहतूक बंद करण्यात ...

बीड : राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यभरात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले. खासगी वाहतूक बंद करण्यात आली. यात रिक्षाचालकांचाही समावेश आहे. त्यांची उपासमार होऊ नये, यासाठी त्यांना दीड हजार रुपये मदत सरकारने जाहीर केली आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यात जवळपास १,५०० रिक्षांची नोंदणी असल्याचे सांगण्यात आले. परंतु या सर्वांना मदत मिळणार का? इतर रिक्षा चालकांचे काय, तसेच टॅक्सी, जीप चालकांचे काय, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.

सरकारने एक तर मदत वाढवावी, अन्यथा निर्बंध घालून रिक्षा चालविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी चालकांमधून होत आहे. दीड हजारात बँकेचे हप्ता आणि कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा, असा प्रश्न ते विचारत आहेत.

रिक्षाचालकांच्या प्रतिक्रिया

दोन वर्षांपूर्वीच नवा रिक्षा घेतला. काही दिवस सुखाने गेले. नंतर काेरोनामुळे लॉकडाऊन लागले. त्यामुळे रिक्षा जागेवरच थांबला होता. आता हप्ता कसा फेडायचा, असा प्रश्न आहे. शासनाने १,५०० रुपये देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.

- मनोजकुमार शिंदे

१५०० रुपयांत काय होणार आहे? किराणा भरायला गेले तर कमीत कमी ४ हजार रुपये लागतात. आता या दीड हजारात दवाखाना, घरखर्च कसा भागणार? त्यामुळे आम्हाला नियमांचे बंधन घालून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी द्यावी, एवढीच मागणी आहे.

- सय्यद मुनाफ

गतवर्षीच्या लॉकडाऊनमध्ये बसूनच दिवस काढले. त्यामुळे उपासमार झाली. आता तरी १,५०० रुपये देऊन शासनाने थोडीफार मदत केली. परंतु यावर कुटुंब चालत नाहीत. एक तर मदत वाढवावी, किंवा रिक्षा चालविण्यास परवानगी द्यावी. -पांडुरंग काळे