शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

जिल्ह्यात १५०० रिक्षाचालकांना मिळणार दीड हजार रुपयांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:33 IST

बीड : राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यभरात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले. खासगी वाहतूक बंद करण्यात ...

बीड : राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यभरात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले. खासगी वाहतूक बंद करण्यात आली. यात रिक्षाचालकांचाही समावेश आहे. त्यांची उपासमार होऊ नये, यासाठी त्यांना दीड हजार रुपये मदत सरकारने जाहीर केली आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यात जवळपास १,५०० रिक्षांची नोंदणी असल्याचे सांगण्यात आले. परंतु या सर्वांना मदत मिळणार का? इतर रिक्षा चालकांचे काय, तसेच टॅक्सी, जीप चालकांचे काय, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.

सरकारने एक तर मदत वाढवावी, अन्यथा निर्बंध घालून रिक्षा चालविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी चालकांमधून होत आहे. दीड हजारात बँकेचे हप्ता आणि कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा, असा प्रश्न ते विचारत आहेत.

रिक्षाचालकांच्या प्रतिक्रिया

दोन वर्षांपूर्वीच नवा रिक्षा घेतला. काही दिवस सुखाने गेले. नंतर काेरोनामुळे लॉकडाऊन लागले. त्यामुळे रिक्षा जागेवरच थांबला होता. आता हप्ता कसा फेडायचा, असा प्रश्न आहे. शासनाने १,५०० रुपये देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.

- मनोजकुमार शिंदे

१५०० रुपयांत काय होणार आहे? किराणा भरायला गेले तर कमीत कमी ४ हजार रुपये लागतात. आता या दीड हजारात दवाखाना, घरखर्च कसा भागणार? त्यामुळे आम्हाला नियमांचे बंधन घालून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी द्यावी, एवढीच मागणी आहे.

- सय्यद मुनाफ

गतवर्षीच्या लॉकडाऊनमध्ये बसूनच दिवस काढले. त्यामुळे उपासमार झाली. आता तरी १,५०० रुपये देऊन शासनाने थोडीफार मदत केली. परंतु यावर कुटुंब चालत नाहीत. एक तर मदत वाढवावी, किंवा रिक्षा चालविण्यास परवानगी द्यावी. -पांडुरंग काळे