शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर तालुक्यात आठ ग्रामपंचायतींसाठी १४९ उमेदवार निवडणूक रिंगणात, १०७ उमेदवारांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:48 IST

शिरूरकासार : शिरूरकासार तालुक्यात सध्या आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, १४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले भवितव्य अजमावीत ...

शिरूरकासार : शिरूरकासार तालुक्यात सध्या आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, १४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले भवितव्य अजमावीत आहेत. या निवडणुकीसाठी २५० नागरिकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, तर २४६ अर्ज शिल्लक होते. शेवटच्या दिवशी १०७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

तालुक्यातील रायमोहा, हाटकरवाडी, येवलवाडी, टाकळवाडी, सांगळवाडी, भानकवाडी, कान्होबाची वाडी, कोळवाडी या आठ ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे.

रायमोहा ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या अकरा सदस्यसंख्येसाठी ४७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तेथे २३ उमेदवार रिंगणात आहेत. हाटकरवाडीच्या ७ जागांसाठी ३० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १४ जणांनी माघार घेतली. त्यामुळे तेथे १६ उमेदवार आपले भवितव्य अजमावीत आहेत. येवलवाडीच्या ९ सदस्यांसाठी ३४ उमेदवारी अर्ज होते. मात्र, १६ जणांनी माघार घेतल्याने तेथे १८ उमेदवार रिंगणात आहेत. टाकळवाडीच्या ९ जागांसाठी ३८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी १७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तेथे २१ उमेदवार आपले भवितव्य अजमावीत आहेत.

सांगळवाडीच्या ७ जागांसाठी २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तेथे १५ उमेदवार भवितव्य अजमावीत आहेत. भानकवाडीच्या ७ जागांसाठी १९ उमेदवारी अर्ज होते, तेथे ५ जणांनी माघार घेतली. त्यामुळे तेथे आता १४ उमेदवार लढत आहेत. कान्होबाची वाडीच्या ७ जागांसाठी २७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तेथे १४ उमेदवार भवितव्य अजमावीत आहेत.

कोळवाडीच्या ७ जागांसाठी २७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, त्यामुळे तेथे १८ उमेदवार भवितव्य अजमावीत आहेत. अशा एकूण ६४ जागांसाठी २४६ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, आता फक्त १४९ लोक निवडणूक रिंगणात आहेत. १०७ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. निवडणूक प्रक्रियेत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी केले आहे.