शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शाळासिद्धीकडे बीड जिल्ह्यात १२०० शाळांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:25 IST

स्वमूल्यमापनातून शाळेतील भौतिक व गुणवत्तापूर्ण सुधारणेसाठी शासनाने सुरु केलेल्या शाळासिद्धी उपक्रमात बीड जिल्ह्यातील जवळपास १२०५ शाळांनी पाठ फिरविली

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : स्वमूल्यमापनातून शाळेतील भौतिक व गुणवत्तापूर्ण सुधारणेसाठी शासनाने सुरु केलेल्या शाळासिद्धी उपक्रमात बीड जिल्ह्यातील जवळपास १२०५ शाळांनी पाठ फिरविली असून हे प्रमाण ३३ टक्के इतके आहे. आॅनलाईन माहिती भरण्यासाठी ३१ जानेवारी अंतीम दिवस असल्याने कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती भरण्यासाठी विविध शाळांच्या मुख्याध्यापकांची दमछाक होत आहे.शाळांचे शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शासनाने स्वयंमूल्यमापन करण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. स्वयंमूल्यमापनानंतर त्याची विभागीय व राज्य पातळीवर मूल्यमापन केले जाते. त्यावरून शाळांची श्रेणी निश्चित करण्याची ही पध्दत आहे. यासाठी शाळा मानके व मूल्यांकनाचा आराखडा निश्चित करुन दिलेला आहे. शाळेतील अध्यापन कसे आहे? अध्ययन मूल्यांकन, शाळेची प्रगती, विकास, शाळा नेतृत्व, शाळा व्यवस्थापन आदी कामातून शाळांमध्ये सुधारणा व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे.आपल्या शाळेचा आवार, क्रीडांगण व उपकरणे, वर्गखोल्या, विद्युत सुविधा, विद्युत उपकरणे, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक सुविधा, रॅम्प, मध्यान्ह भोजन, स्वयंपाक खोली, भांडी, पाणी, स्वच्छतागृह इ. सुविधांबाबत स्वत: मूल्यांकन करुन आपण कोणत्या पातळीवर आहोत, हे ठरविण्यात येत आहे.शाळासिद्धी उपक्रमात जिल्हयातील शाळांनी ३० जानेवारीपर्यंत आॅनलाईन माहिती भरणे आवश्यक होते. बीड जिल्ह्यात ३७१० शाळा असून ३३ टक्के शाळांनी शाळासिद्धीकडे पाठ फिरविली आहे. तर १५ टक्के शाळा ही माहिती भरण्याच्या प्रक्रियेत वयस्त असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र