शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
4
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
5
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
6
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
7
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
8
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
9
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
10
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
11
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
12
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
13
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
14
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
15
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
16
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
17
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
18
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
19
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
20
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी

शाळासिद्धीकडे बीड जिल्ह्यात १२०० शाळांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:25 IST

स्वमूल्यमापनातून शाळेतील भौतिक व गुणवत्तापूर्ण सुधारणेसाठी शासनाने सुरु केलेल्या शाळासिद्धी उपक्रमात बीड जिल्ह्यातील जवळपास १२०५ शाळांनी पाठ फिरविली

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : स्वमूल्यमापनातून शाळेतील भौतिक व गुणवत्तापूर्ण सुधारणेसाठी शासनाने सुरु केलेल्या शाळासिद्धी उपक्रमात बीड जिल्ह्यातील जवळपास १२०५ शाळांनी पाठ फिरविली असून हे प्रमाण ३३ टक्के इतके आहे. आॅनलाईन माहिती भरण्यासाठी ३१ जानेवारी अंतीम दिवस असल्याने कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती भरण्यासाठी विविध शाळांच्या मुख्याध्यापकांची दमछाक होत आहे.शाळांचे शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शासनाने स्वयंमूल्यमापन करण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. स्वयंमूल्यमापनानंतर त्याची विभागीय व राज्य पातळीवर मूल्यमापन केले जाते. त्यावरून शाळांची श्रेणी निश्चित करण्याची ही पध्दत आहे. यासाठी शाळा मानके व मूल्यांकनाचा आराखडा निश्चित करुन दिलेला आहे. शाळेतील अध्यापन कसे आहे? अध्ययन मूल्यांकन, शाळेची प्रगती, विकास, शाळा नेतृत्व, शाळा व्यवस्थापन आदी कामातून शाळांमध्ये सुधारणा व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे.आपल्या शाळेचा आवार, क्रीडांगण व उपकरणे, वर्गखोल्या, विद्युत सुविधा, विद्युत उपकरणे, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक सुविधा, रॅम्प, मध्यान्ह भोजन, स्वयंपाक खोली, भांडी, पाणी, स्वच्छतागृह इ. सुविधांबाबत स्वत: मूल्यांकन करुन आपण कोणत्या पातळीवर आहोत, हे ठरविण्यात येत आहे.शाळासिद्धी उपक्रमात जिल्हयातील शाळांनी ३० जानेवारीपर्यंत आॅनलाईन माहिती भरणे आवश्यक होते. बीड जिल्ह्यात ३७१० शाळा असून ३३ टक्के शाळांनी शाळासिद्धीकडे पाठ फिरविली आहे. तर १५ टक्के शाळा ही माहिती भरण्याच्या प्रक्रियेत वयस्त असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र