शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

दिंडीत चालताना १२० वारकऱ्यांचे हृदय थांबले; पण वेळीच धावले आरोग्य विभागातील ‘पांडुरंग’

By सोमनाथ खताळ | Updated: July 20, 2024 19:44 IST

आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : आरोग्यातील सात हजार देव माणसांनी केली रुग्णसेवा

बीड : आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना चालताना अनंत अडचणी आल्या. १२० वारकऱ्यांना तर हृदयाचा झटका आला. परंतु, आरोग्य विभागातील देवमाणूस धावले आणि त्यांचे प्राण वाचले. जवळपास १५ दिवस आरोग्य विभागातील सात हजार डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी ‘रुग्णसेवा हीच इश्वरसेवा’ समजून परिश्रम घेतले. या वारीच्या काळात आरोग्य विभागाने तब्बल १४ लाख ६९ हजार वारकऱ्यांना आरोग्य सेवा दिली. या सर्वांच्या मदतीला आराेग्य विभागातील ‘पांडुरंग’ धावल्याचे दिसून आले.

आरोग्य विभागाकडून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ ही मोहीम सलग दुसऱ्या वर्षी राबविली गेली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास एक हजार दिंड्या पंढरीच्या दिशेने जातात. यामध्ये लाखो भाविक सहभागी असतात. त्यांना रस्त्यात आरोग्याविषयी काही त्रास जाणवला की, लगेच उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक आपला दवाखाना तयार केला होता. तसेच ६ हजार ३६८ आरोग्य अधिकारी, कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी नियुक्त केले होते. त्यांना अत्यावश्यकसह प्रथमोपचार सेवा देण्यात आल्या. तसेच पंढरपूर येथील विशेष शिबिरातही उपचार करण्यात आले.

६३५ जणांना कुत्रा तर ४६ जणांना सापाने घेतला चावावारकरी मुक्कामाच्या ठिकाणी अथवा इतरवेळी मिळेल त्याठिकाणी आराम करत असत. याच ठिकाणी ४६ वारकऱ्यांना सापाने चावा घेतला. तसेच ६३५ वारकऱ्यांना कुत्रा चावला. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.

महाआरोग्य शिबिरात पावणे पाच लाख रुग्णांवर उपचारपंढरपूर येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये ४ लाख ८८ हजार ९०८ वारकरी रुग्णांना आरोग्य सेवा देण्यात आली. यासाठी ३ हजार ७१२ एवढे मनुष्यबळ नियुक्त केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, नोडल अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांच्यासह आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या सेवेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कौतुक केले.

या मोहिमेत १४ लाख ६९ हजार वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली. हार्ट अटॅकसह इतर गंभीर आजारांच्या १२७० रुग्णांना इमर्जन्सी सेवा दिली. सर्व टीमने यासाठी खूप परिश्रम घेतले. त्यामुळेच हे शिबिर यशस्वी झाले. आमचाच मागील वर्षीचा विक्रम मोडीत काढला.- डॉ. आर. बी. पवार, नोडल अधिकारी तथा सहसंचालक, आरोग्य सेवा, पुणे

---कोणत्या आजाराचे किती रूग्णओपीडी १४६९६५०आयपीडी ७७०७रेफर ४४१आयएलआय ३०२८३सारी ७८७अतिसार २१४५४हगवण ८६९८ताप ५०९५८हार्ट अटॅक १२०रस्ता अपघात ३७८कुत्रा चावला ६३५साप चावला ४६इतर १३५६२९१

कोणाला दम लागला तर कोणाला हृदयविकाराचा झटकाराधाकिशन राजाभाऊ गवळी (वय ६५, रा. झाडगाव, जि. जालना) यांना पत्राशेड परिसरातील दर्शन रांगेत दम लागला. श्वास घेण्यास त्रास होऊन हृदयाचे ठोके वाढले. त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल केले. माणिक शंकर बारवकर (वय ५५, रा. घनसावंगी, जि. जालना) यांना छातीत दुखून घाम आला. यावेळी तपासणीअंती त्यांना उच्च रक्तदाब (२३०/११०) असल्याचे निदान झाले. ईसीजी केल्यावर तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आल्याचे समजले. त्यांना उपचार करून स्थिर केले. कैसाबाई आसाराम गोरे (वय ८०, रा. सोळेगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) यांना अचानक झटका आला. त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल केले. अशा अनेक वारकरी रुग्णांवर तातडीने उपचार करून आरोग्य विभागातील देवमाणसांनी त्यांना एकप्रकारे जीवदान दिले आहे.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीBeedबीड