शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

दुसऱ्या टप्प्यात १२ कोटी ४८ लाख ५० हजारांची मदत - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST

वडवणी : मागील वर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ...

वडवणी : मागील वर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी सरकारने दुसऱ्या टप्प्यात १२ कोटी ४८ लाख ५० हजार रुपये निधी तहसीलदारांच्या खात्यावर जमा केला आहे. तहसीलदारांकडून दुसऱ्या टप्प्यात ३६ गावांतील २३ हजार ९८९ शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करण्यात आली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करण्यात येणार आहे.

तालुक्यात २४ हजार ९७० हेक्टर जमीनवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून ३१ हजार ५५१ शेतकरी संकटात सापडले आहेत. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील मामला, साळींबा, चिचोटी, बाहेगव्हाण, सोन्ना, देवडी, तिगाव, लक्ष्मीपूर, कवडगाव, खापरवाडी, खडकी, बाबी, लोनवळ, दुकडेगाव, कुप्पा, ढोरवाडी, लिमगाव, काडीवडगाव, देवगाव,पिंपळटक्का, वडवणी, चिखलबीड, देवळा, पिंपरी, चिंचवडगाव, रूई, पिपळा, डावरगाव, कोठारबण, चिंचवण, टोकेवाडी, हिरवगव्हाण, मोरवड, उपळी, पिपरखेड या भागातील २३ हजार ९८९ शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करण्यात आली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी वडवणी प्रशासनाने २४ कोटी रुपयांची मागणी प्रशासनाकडे केली होती. मात्र शेतकऱ्यांना १० हजार रुपये हेक्टरप्रमाणे २ हेक्टर मर्यादेपर्यंत मदत वाटप होणार आहे. तर फळबागेसाठी २५ हजार रुपये हेक्टर मदत होणार आहे. तालुक्यातील ३१ हजार ५५१ लाभार्थ्यांसाठी पहिल्या टप्प्यात १२ कोटी ४८ लाख ५० हजार रुपये निधी प्राप्त झाला होता. तो वाटप करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात तहसील प्रशासनाने निधी उपलब्ध करून प्रत्यक्षात मदत वाटप सुरू केली आहे.

तहसीलदार सय्यद कलीम यांनी तालुक्यातील सर्व तलाठ्यांची बुधवारी सकाळी कार्यालयात बैठक घेऊन दोन दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर मदत जमा करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. अनुदान वितरित करताना बाधित गावांची वर्णमालेनुसार यादी तयार करावी. एकही शेतकरी वंचित राहणार नाही यांची खबरदारी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

याबाबत तहसीलदार सय्यद कलीम म्हणाले की अतिवृष्टी नुकसानभरपाई पोटी दुसऱ्या टप्प्यात १२ कोटी ४८ लाख ५० हजार रुपये निधी प्राप्त झालेला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करण्यात येत आहेत. नायब तहसीलदार प्रकाश सिरसेवाड, अव्वल कारकून रवींद्र शहाणे, महसूल साह्यक विष्णू आव्हाड प्रयत्न करत आहेत.