शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
3
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
4
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
5
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
6
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
7
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
8
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
9
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
10
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
11
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
12
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
13
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
16
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
17
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
18
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
19
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
20
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...

१० लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:04 IST

खरीप हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना २०८-१९ लागू झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून ४ लाख ३२ हजार ७०३ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. मात्र, जवळापास ९ लाख ७८ हजार९१३ शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहिले आहेत.

ठळक मुद्देखरीप हंगाम विमा मंजूर : ‘आपले सरकार’ पोर्टलवरून भरलेले विम्याचे पैसे गेले कुठे?

बीड: खरीप हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना २०८-१९ लागू झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून ४ लाख ३२ हजार ७०३ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. मात्र, जवळापास ९ लाख ७८ हजार९१३ शेतकरीपीक विमा योजनेपासून वंचित राहिले आहेत. परंतु, वाटप सुरु असलेला विमा हा कापूस, सोयबिन, तूर, कांदा या पिकांना वगळून दिला जात असल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. पुढील काळात इतर शेतकºयांना देखील विमा योजनेचा लाभ मिळेल. आपले सरकार वेब पोर्टलवरुन विमा भरुन देखील यादीत नाव नसल्यामुळे अनेक शेतकºयांनी कृषी विभागाकडे निवेदनाद्वारे तक्रारी देखील केल्या आहेत.मागील वर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्यामुळे जिल्हा प्रशासनाचा पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. शेतकºयांना देखील मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ मिळाला होता. २०१८-१९ या वर्षासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे या योजनेचे कंत्राट देण्यात आले आहे. पीक विम्याची रक्कम भरताना शेतकºयांनी बँकेच्या माध्यमातून तर अनेक शेतकºयांनी आपले सरकार या पोर्टलद्वारे भरली आहे. मात्र, पोर्टलवरुन विमा भरलेला असताना देखील विम्यापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यामुळे भरलेले पैसे गेले कुठे असा सवाल शेतकºयांमधून विचारला जात आहे. याचसंदर्भात काही शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देखील केली आहे. शेतकºयांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातील अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. तसेच जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून सर्व पात्र शेतकºयांना विमा मिळवून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शेतकºयांच्या वतीने देण्यात आला आहे.विमा कंपनीने नेमले प्रतिनिधीविमा योजनेच्या संदर्भातील तक्रारी निवारण करण्यासाठी किंवा शेतकºयांच्या समस्या सोडवण्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी तालुका कृषी कार्यालयात बसणार आहेत. त्या ठिकाणी शेतकºयांनी आपल्या काही तक्रारी असतील तर तेथे संपर्क साधावा असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांना दिलासा४खरीप हंगामातील काही पिकांसाठी विमा मंजुर आहे. मात्र, यावर्षी एक ठोक रक्कम जिल्ह्याला मंजुर झाल्याचे कंपनीकडून जाहीर झाले नाही.४मुख्य पिके सोडून ४ लाख ३२ हजार ७०३ शेतकºयांना जवळपास ११४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.४विम्याचे पैसे तात्काळ शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात यावे. तसेच कापूस, सोयबीन, तूर यांसह इतर पिकांचा विमा देखील मंजूर करण्यात यावा अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा