शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

१० लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:04 IST

खरीप हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना २०८-१९ लागू झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून ४ लाख ३२ हजार ७०३ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. मात्र, जवळापास ९ लाख ७८ हजार९१३ शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहिले आहेत.

ठळक मुद्देखरीप हंगाम विमा मंजूर : ‘आपले सरकार’ पोर्टलवरून भरलेले विम्याचे पैसे गेले कुठे?

बीड: खरीप हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना २०८-१९ लागू झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून ४ लाख ३२ हजार ७०३ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. मात्र, जवळापास ९ लाख ७८ हजार९१३ शेतकरीपीक विमा योजनेपासून वंचित राहिले आहेत. परंतु, वाटप सुरु असलेला विमा हा कापूस, सोयबिन, तूर, कांदा या पिकांना वगळून दिला जात असल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. पुढील काळात इतर शेतकºयांना देखील विमा योजनेचा लाभ मिळेल. आपले सरकार वेब पोर्टलवरुन विमा भरुन देखील यादीत नाव नसल्यामुळे अनेक शेतकºयांनी कृषी विभागाकडे निवेदनाद्वारे तक्रारी देखील केल्या आहेत.मागील वर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्यामुळे जिल्हा प्रशासनाचा पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. शेतकºयांना देखील मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ मिळाला होता. २०१८-१९ या वर्षासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे या योजनेचे कंत्राट देण्यात आले आहे. पीक विम्याची रक्कम भरताना शेतकºयांनी बँकेच्या माध्यमातून तर अनेक शेतकºयांनी आपले सरकार या पोर्टलद्वारे भरली आहे. मात्र, पोर्टलवरुन विमा भरलेला असताना देखील विम्यापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यामुळे भरलेले पैसे गेले कुठे असा सवाल शेतकºयांमधून विचारला जात आहे. याचसंदर्भात काही शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देखील केली आहे. शेतकºयांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातील अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. तसेच जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून सर्व पात्र शेतकºयांना विमा मिळवून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शेतकºयांच्या वतीने देण्यात आला आहे.विमा कंपनीने नेमले प्रतिनिधीविमा योजनेच्या संदर्भातील तक्रारी निवारण करण्यासाठी किंवा शेतकºयांच्या समस्या सोडवण्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी तालुका कृषी कार्यालयात बसणार आहेत. त्या ठिकाणी शेतकºयांनी आपल्या काही तक्रारी असतील तर तेथे संपर्क साधावा असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांना दिलासा४खरीप हंगामातील काही पिकांसाठी विमा मंजुर आहे. मात्र, यावर्षी एक ठोक रक्कम जिल्ह्याला मंजुर झाल्याचे कंपनीकडून जाहीर झाले नाही.४मुख्य पिके सोडून ४ लाख ३२ हजार ७०३ शेतकºयांना जवळपास ११४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.४विम्याचे पैसे तात्काळ शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात यावे. तसेच कापूस, सोयबीन, तूर यांसह इतर पिकांचा विमा देखील मंजूर करण्यात यावा अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा