शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

१० लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:04 IST

खरीप हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना २०८-१९ लागू झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून ४ लाख ३२ हजार ७०३ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. मात्र, जवळापास ९ लाख ७८ हजार९१३ शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहिले आहेत.

ठळक मुद्देखरीप हंगाम विमा मंजूर : ‘आपले सरकार’ पोर्टलवरून भरलेले विम्याचे पैसे गेले कुठे?

बीड: खरीप हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना २०८-१९ लागू झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून ४ लाख ३२ हजार ७०३ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. मात्र, जवळापास ९ लाख ७८ हजार९१३ शेतकरीपीक विमा योजनेपासून वंचित राहिले आहेत. परंतु, वाटप सुरु असलेला विमा हा कापूस, सोयबिन, तूर, कांदा या पिकांना वगळून दिला जात असल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. पुढील काळात इतर शेतकºयांना देखील विमा योजनेचा लाभ मिळेल. आपले सरकार वेब पोर्टलवरुन विमा भरुन देखील यादीत नाव नसल्यामुळे अनेक शेतकºयांनी कृषी विभागाकडे निवेदनाद्वारे तक्रारी देखील केल्या आहेत.मागील वर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्यामुळे जिल्हा प्रशासनाचा पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. शेतकºयांना देखील मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ मिळाला होता. २०१८-१९ या वर्षासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे या योजनेचे कंत्राट देण्यात आले आहे. पीक विम्याची रक्कम भरताना शेतकºयांनी बँकेच्या माध्यमातून तर अनेक शेतकºयांनी आपले सरकार या पोर्टलद्वारे भरली आहे. मात्र, पोर्टलवरुन विमा भरलेला असताना देखील विम्यापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यामुळे भरलेले पैसे गेले कुठे असा सवाल शेतकºयांमधून विचारला जात आहे. याचसंदर्भात काही शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देखील केली आहे. शेतकºयांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातील अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. तसेच जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून सर्व पात्र शेतकºयांना विमा मिळवून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शेतकºयांच्या वतीने देण्यात आला आहे.विमा कंपनीने नेमले प्रतिनिधीविमा योजनेच्या संदर्भातील तक्रारी निवारण करण्यासाठी किंवा शेतकºयांच्या समस्या सोडवण्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी तालुका कृषी कार्यालयात बसणार आहेत. त्या ठिकाणी शेतकºयांनी आपल्या काही तक्रारी असतील तर तेथे संपर्क साधावा असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांना दिलासा४खरीप हंगामातील काही पिकांसाठी विमा मंजुर आहे. मात्र, यावर्षी एक ठोक रक्कम जिल्ह्याला मंजुर झाल्याचे कंपनीकडून जाहीर झाले नाही.४मुख्य पिके सोडून ४ लाख ३२ हजार ७०३ शेतकºयांना जवळपास ११४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.४विम्याचे पैसे तात्काळ शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात यावे. तसेच कापूस, सोयबीन, तूर यांसह इतर पिकांचा विमा देखील मंजूर करण्यात यावा अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा