शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

​‘व्हायरल इन्फेक्शन’ होतय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 18:08 IST

पावसासोबतच आजारांचेही आगमन होते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

-रवींद्र मोरे पावसासोबतच आजारांचेही आगमन होते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. यावर्षी तर डेंग्यू आजाराने कहरच केला. मात्र डेंग्यू नंतर लोकांना सर्वात जास्त त्रास होत आहे ते व्हायरल इन्फेक्शनचे. याला जबाबदार अनेक कारणेही आहेतच. मात्र सर्वांनी व्यक्तिगत काळजी घेतली आणि घरेलू उपाययोजना केली तर होणाऱ्या व्हायरल इन्फेक्शनपासून आपला बचाव होऊ शकतो. आजच्या सदरात आपण व्हायरलपासून सुरक्षित राहण्यासाठी काय उपाय आहेत, हे जाणून घेऊया....लक्षणे : व्हायरल दरम्यान विशेषत: चक्कर येणे, खोकला आणि गळ्यात खरखरीतपणासारख्या समस्या निर्माण होतात. या दरम्यान संतुलित आहाराने आपली प्रतिकारशक्तीच वाढत नाही, तर व्हायरलमुळे आलेल्या तापालासुद्धा लांब ठेवते. जाणून घेऊया की, कोणत्या सुपरफूड्समध्ये व्हायरल इन्फेक्शन लांब ठेवण्याची क्षमता आहे. पाणी : जेव्हा आपण कोणत्याही व्हायरल इन्फेक्शनपासून प्रभावित असाल तर सर्वात अगोदर त्याचा समुळ नाश कसा होईल याची काळजी घेतली गेली पाहिजे. आणि यावर सवोत्कृष्ठ पर्याय म्हणजे पाणी. कोणत्याही व्हायलरला लांब ठेवण्यासाठी पाणी हा सर्वांपेक्षा चांगला पर्याय आहे. पाण्याचा अधिक सेवनाने आपण शरीरातील टॉक्सिनला बाहेर काढु शकतात. तुळस : जर आपल्याला व्हायरल ताप आला असेल तर आपण तुळसीचे सेवन आवर्जून करा. सकाळी चहात तुळस टाकून प्या. एवढेच नव्हे तर, तुळसच्या पानांना पिण्याच्या पाण्यात टाकूनही पिऊ शकतात. संत्रीचा ज्यूस : व्हायरल तापात संत्र्याच्या ज्यूसचा खूपच फायदा होतो. शरीर बळकट होण्यासाठी तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ताज्या संत्र्याचा ज्यूसचे नियमित सेवन करा.ब्लॅक टी : व्हायरल दरम्यान ब्लॅक टीमध्ये अद्रकचा रस आणि एक चमचा मध टाका आणि याचे सेवन करा. तसेच  कोमट पाण्यासोबत अद्रकचा रस घेऊ शकतात. यामुळे गळ्यालादेखील आराम मिळेल आणि ताप लवकर बरा होण्यास मदत होईल.   उकळलेली भाजी : व्हायरल दरम्यान हलक्या प्रमाणात उकळलेल्या विना मसाला टाकलेल्या भाज्यादेखील फायदेशिर असतात. काळी मिरची आणि थोडेसे मिठ उकळलेल्या भाज्यांमध्ये टाकून खाल्यास शरीराचे तापमान सामान्य राहते आणि प्रतिकारशक्तीदेखील वाढते.  दाळ : व्हायरल तापाने त्रस्त असाल तर आपण दाळीचे सेवन क रायला हवे. यामुळे शरीरास ताकद मिळून कमजोरी दुर होते.   लसून : डायटमध्ये लसूनचा वापर केल्यास झालेल्या इन्फेक्शनला लवकर मुळासकट नष्ट करु शकता.पुदीना : पुदीनाच्या सेवनानेही ताप लवकर बरा होतो. इन्फेक्शन दरम्यान पुदीनाचे सेवन केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि नैसर्गिकरित्या  इनफेक्शनपासून मुक्तता मिळते. सूप : भाज्यांचे सूप पिल्याने किंवा प्रोटीन आणि विटॅमिनयुक्त फळ खाल्याने  तापापासून आराम मिळतो. अशा पद्धतीने व्हायरल इन्फेक्श्नदरम्यान घरातील पदार्थांचा योग्य वापर केल्यास विविध आजारांपासून आपण मुक्त होऊ शकतो.