शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

केसांना तेल लावण्याचा काही उपयोग नाही! जर तुम्ही 'या' चुका करत असाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 15:22 IST

सुंदर लांबसडक केस सगळ्यांनाच हवे असतात. त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात.

सुंदर लांबसडक केस सगळ्यांनाच हवे असतात. त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. केसांना पोषण मिळण्यासाठी तेल लावण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. नारळाचं तेलं, बदामाचं तेलं, राईचं तेलं अशा वेगवेगळ्या तेलांचा वापर केसांवर करून स्त्रिया केसांची काळजी घेतात. तसंच काहीवेळा तेल कोमट करून त्यात  काही वनस्पती घालून सुध्दा महिला आपल्या केसांना लावत असतात. पण हे लावत असताना काही चुका केल्यास महागात पडू शकतं.  केसांना तेल लावत असताना जर काही चुका केल्या तर तेल लावून काही उपयोग होत नाही. 

बदलत्या वातावरणामुळे आणि प्रदुषणामुळे तसंच पोषक घटकांच्या कमतरतेमुळे   केस गळण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवते. तसंच कोंडा झाल्यामुळे खाज  येते. कारण केसांना तेल लावताना जर तुम्ही काही चुका केल्या तर तुम्हाला समस्या जाणवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या चुका केल्यास तुम्हाला महागात पडू शकतं.

एकाचवेळी जास्त तेल लावणे

 सध्याच्या काळात महिला कामामुळे स्वतःसाठी वेळ काढू  शकत नाहीत. त्यामुळे त्यांना बसून केसांना तेल लावणं, केसांची मालीश करणं  शक्य होत नाही. म्हणून काही महिला आठवड्यातून एक दिवस जेव्हा वेळ मिळत असतो तेव्हा जास्त तेल लावतात. असं केल्यास  केस शॅम्पूने  धुताना तेल व्यवस्थित निघत नाही.  तसंच शॅम्पूचा जास्त वापर केल्याने केसांचा चमकदारपणा निघून जातो आणि केस कोरडे दिसू लागतात. 

केस घट्ट बांधणे

केसांना तेल लावल्यानंतर केसांची मुळं नाजूक आणि सैल झालेली असतात जर अशा वेळी केसांना तुम्ही घट्ट बांधून ठेवले तर केस मोठ्या प्रमाणावर गळण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांना घट्ट बांधण्याऐवजी जर तुम्ही केसांची वेणी घातली किंवा केस मोकळे सोडले तर फायदेशीर ठरेल. 

तेल लावल्यानंतर केस जास्त वेळ तसेच ठेवणे

अनेक महिलांचा असा समज आहेत  की तेल लावल्यानंतर बराच वेळ किंवा अनेक दिवस केस तसेच राहू दिले तर पोषण मिळतं पण असं नसून जर केसांना तेल लावल्यानंतर काही तासांच्या आत धुतले नाही तर  केंसावर आणि केसांच्या मुळांवर  धुळीचे कण बसण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचे केस खराब व्हायला वेळ लागणर नाही. त्यामुळे तेल लावल्यानंतर २ ते ३  तासांनी  केस धुवून टाका.

तेल लावल्यानंतर कंगवा फिरवणे

(image credit- beautycentralmelta.com)

जर तुम्ही तेल लावल्यानंतर लगेच कंगवा फिरवत असाल तर  केसांच्या मुळांना त्रास होऊन केस गळू शकतात. कारण तेल लावल्यानंतर  केसांची मुळं नाजूक झालेली असतात. कंगवा  फिरवल्यानंतर केस तुटण्याची शक्यता असते.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स