शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

'ही' आहेत केसगळतीची मुख्य कारणं; जाणून घ्या त्यावरील उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 17:13 IST

आजच एका येऊ घातलेल्या हिंदी चित्रपटाचं नाव 'उजडा चमन' आहे असं वाचलं. उत्सुकता निर्माण झाली म्हणून आणखी शोधाशोध केली तर कळलं की, या चित्रपटातील हिरोची गोष्ट अकाली टक्कल पडण्याच्या समस्येवर आधारित आहे.

- डॉ नेहा पाटणकर 

आजच एका येऊ घातलेल्या हिंदी चित्रपटाचं नाव 'उजडा चमन' आहे असं वाचलं. उत्सुकता निर्माण झाली म्हणून आणखी शोधाशोध केली तर कळलं की, या चित्रपटातील हिरोची गोष्ट अकाली टक्कल पडण्याच्या समस्येवर आधारित आहे. म्हणजेच आजच्या युगातला हा किती जिव्हाळ्याचा विषय आहे हेच अधोरेखीत होतंय. पूर्वी केसांची जोपासना करणे, त्यांची  नीट काळजी घेणे हे स्त्रियांच्या अखत्यारीत येत होतं. लांब केस असणं एक सौंदर्याचं लक्षण मानले जात असे. त्यामुळे केस गळतात का? असं विचारलं की, अत्यंत काळजीयुक्त स्वरात 90 टक्के स्त्रिया "हो" असंच उत्तर देताना दिसतात. 

खरं तर आपल्या स्काल्प वर असलेल्या 1 लाख हेअर फॉलिकल्स पैकी 50 ते 100 केसांची दररोज गळती होणे हे अगदी नॉर्मलच असते. असे अमेरिकन असोसिएशन ऑफ डर्मटोलॉजिस्ट  यांचं म्हणणं आहे. डोक्याचे केस गळणं किंवा अकाली टक्कल पडणं हे बरचसं अनुवांशिक असतं. पण हल्ली अगदी तिशी, चाळिशीतच टक्कल पडणे, खूप केस गळणे, पातळ होणे हे अकाली वार्धक्याचंही लक्षण असू शकतं. हल्ली तिशी किंवा चाळीशीत antidepressants, हाय बीपी साठी औषधं, हाय यूरिक अॅसिड औषधं हे घेण्याचं प्रमाणही वाढलं आहे. या औषधांचा साईड इफेक्ट म्हणूनसुद्धा केस गळू शकतात. मुख्यत्वे स्त्रियांमध्ये गर्भनिरोधक गोळ्या, पिंपल्ससाठी घेण्यात येणाऱ्या औषधांमधील हाय व्हिटॅमिन ए हेसुद्धा केस गळतीचे कारण असू शकतं.

अचानक सुरू झालेली केस गळती  ही खूप मोठ्या आजारपणानंतर चालू होऊ शकते. आजकाल पटकन वजन कमी करण्यासाठीचे डाएटस करण्याच्या प्रथेनुसार म्हणजेच, अमक्या तमक्या समारंभासाठी बारीक दिसायचं आहे. हे तर खूपच सामान्य झालं आहे. कुठलाही क्रॉनिक स्ट्रेस किंवा मानसिक धक्का हे अचानक केस गळतीचं कारण ठरतं. हिमोग्लोबिनची कमतरता, आहारातील प्रोटीनचे कमी प्रमाण, थायरॉइड हार्मोन्सची कमी किंवा जास्त प्रमाण असेल तर, त्यामुळे नक्की केस गळतात, विरळ होतात. 

आजच्या युगातल्या PCOD चं मुख्य लक्षण केस गळणे, अकाली टक्कल पडणे हेच असतं. डोक्याच्या त्वचेला झालेल्या काही फंगल इन्फेक्शनमुळे केसांची गळती वाढते. केमिकलयुक्त शॅम्पू औषधांच्या दुकानात सर्रास उपलब्ध असतात. परंतु खूप जास्त त्रास असेल तर मात्र skin specialist चा सल्ला नक्की घ्यायला हवा. कॅल्शिअम, मॅग्नेशियम, बायोटिन, झिंक, व्हिटॅमिन बी 12 ही व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स केसांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. आयर्नच्या कमतरतेमुळे कमी होणारे हिमोग्लोबिन  केसांचे पुरेसे पोषण करत नाही. भारतामध्ये हे एक केस गळण्याचं मुख्य कारण आहे. 

आहारामध्ये हिरव्या भाज्या, पालेभाज्या आणि प्रोटिन्स असलेला संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. 

केस किती गळणार, टक्कल किती पडणार हे जरी काही अंशी अनुवंशिकता ठरवत असेल तरी आपणही काही गोष्टी केल्यामुळे आणि काही गोष्टी न केल्यामुळे ही समस्या आपल्यावर ओढवून घेत असतो. म्हणूनच पोषक आहाराने शरीराची काळजी घेणे आणि मेडीटेशन/योगा करून मनाची काळजी घेणे हे केसांचं आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. 

केसांची निगा राखण्यासाठी पाळण्याची पथ्य -

1) केस खूप जोरात विंचरल्याने केसांच्या मुळांना दुखापत होऊ शकते.2) केसांना खूप शॅम्पू लावणे टाळावे. 3) केस ओले असताना खसखसून पुसू नयेत.4) हेअर स्प्रे, हेअर ड्रायर यांचा कमीत कमी वापर करणे.5) केसांना वेगवेगळे रंग चढवणे हानिकारकच.6) केस खूप घट्ट बांधून ठेवण्याने केसांवर ताण येतो

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स