शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

​सकारात्मक विचारांची जादू !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2016 14:19 IST

सकारात्मक विचारांशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे. आपल्या जीवनात आलेले नैराश्य, अंधार आपण सकारात्मक विचारांच्या शक्तीने..............

सकारात्मक विचारांशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे. आपल्या जीवनात आलेले नैराश्य, अंधार आपण सकारात्मक विचारांच्या शक्तीने पून्हा नव्या उमेदीने जीवन जगून आपल्या आयुष्यात आलेला अंधार दूर करु शकतो. आपल्या विचारांवर आपलेच नियंत्रण असल्याने आपल्यालाच ठरवायचे आहे की, सकारात्मक विचार करायचा आहे की नकारात्मक. मात्र तरीही नकारात्मकच विचारच आपण जास्त करतो. आजच्या सदरात आपण नेहमी कसे सकारात्मक विचार करावा याबाबत सीएनएक्सने घेतलेला आढावा. विचार दोन प्रकारचे आपल्या मनातील प्रत्येक विचार हा दोन प्रकारचा असतो. सकारात्मक आणि नकारात्मक. या विचारांवर आपला दृष्टिकोन किंवा व्यवहार अवलंबून असतो. विशेष म्हणजे आपण जसा विचार करतो, तसे बनतो. म्हणूनच म्हटले जाते की, आपला जसा विचार असतो तसेच आपले आचरणदेखील असते. मग आचरण कसे ठेवायचे हे मुळात आपल्यावर अवलंबून असते. आपण कोणत्या रंगाचा चष्मा लावला आहे आपण जर काळ्या रंगाचा चष्मा लावला असेल तर सर्वत्र काळे दिसेल आणि लाल रंगाचा असेल तर लाल दिसेल. याचप्रकारे नकारात्मक विचारांमुळे आपल्याला सर्वत्र नैराश्य, दु:ख आणि असंतोष दिसते आणि सकारात्मक विचारांनी आपल्याला कायम आशा, सुख आणि समाधानच दिसते. आता आपण हे ठरवायचे आहे की, सकारात्मक चष्मा लावून जगाकडे पाहायचे की, नकारात्मक चष्म्याने पाहायचे. जर आपण सकारात्मकतेचा चष्मा लावला असेल तर आपल्याला प्रत्येक व्यक्ति चांगला वाटेल आणि जर नकारात्मक चष्मा लावला असेल तर आपल्याला सर्वत्र वाईटच दिसेल, आणि कालांतराने आपण तसेच बनू. कसे बनाल सकारात्मक ?सकारात्मकतेची सुरूवात आशा आणि विश्वासाने होत असते. कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास हा गमवायचा नाही आणि नेहमी आशावादी राहायचे. एका ठिकाणी चारही बाजूंनी अंधार असेल आणि काहीच दिसत नसेल तर त्याठिकाणी आपण एक लहानसा दिवा लावला तर त्या दिव्यामुळे एका क्षणात सर्वत्र पसरलेला अंधार दूर होईल. याचप्रकारे आशाचे किरण म्हणजेच सकारात्मक विचार सर्व नकारात्मक विचारांना एका क्षणात मिटवून टाकतात.  नकारात्मकतेला नकारात्मक नष्ट करु शकत नाही, नकारात्मकतेला केवळ  सकारात्मकताच नष्ट करू शकते. यासाठी जेव्हाही नकारात्मक विचार मनात येईल, त्याचवेळी सकारात्मक विचारात त्याचे परिवर्तन व्हायला हवे. सकारात्मक बनण्यासाठी काही टिप्स * जीवनात नेहमी चांगलेच शोधा, न्युनगंड बाळगू नका. संकटांच्या बाबतीत विचार न करता आपल्यातील बलस्थानांच्या बाबतीत विचार करा, ज्यांच्या आधारे आपण त्या समस्या सोडवू शकू. * दुसºयांजवळ काय आहे, याबाबत काळजी न करता आपल्याजवळ जे काही त्यात समाधानी रहा. हा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या जीवनातील नकारात्मता संपुष्टात आणेल. * जे काम हाती घेतले आहे, ते पूर्ण करा. प्रत्येक काम अपूर्ण सोडले तर आपल्या जीवनात नकारात्मक विचार प्रवेश करतात. * नेहमी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. जे पण काम आपल्या व्यवसायाशी संबंधीत आहे आणि आपल्याला ते काम येत नसेल तर ते नक्की शिका. असे केल्याने आपण आपल्या कामात परिपूर्ण बनाल आणि आपल्या जीवनात सकारात्मक उर्जा संचारेल. * वेळोवेळी निस्वार्थ भावनेने परक्या व्यक्तिंची मदत करुन पहा. असे केल्याने आपला सामाजिक दृष्टिकोन वाढेल आणि आपल्याबरोबरच समाजात सकारात्मक उर्जेचा प्रवाह संचारेल.  * जे लोक नेहमी नकारात्मक विचार करतात किंवा नेहमी भांडणे, शंका करतात त्यांच्यापासून चार हात लांबच रहा. * सकारात्मकता विचारसरणी बळावण्यासाठी नेहमी ध्यानधारणा करा आणि सकारात्मक विचार करणाºया व्यक्तिंच्या संपर्कात रहा. * प्रत्येक दिवशी एक नवे ध्येय निश्चित करुन कामास सुरूवात करा आणि त्या ध्येयाला नक्की पूर्ण करा. असे केल्याने आपले जीवन सकारात्मकतेकडे वाटचाल करण्यास सुरुवात करेल.  ravindra.more@lokmat.com