शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याची समस्या अशी करा दूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 11:50 IST

हिवाळ्याच्या वातावरणात वेगवेगळ्या शरीराच्या समस्या उद्भवण्यास सुरूवात होते.  

हिवाळ्याच्या वातावरणात वेगवेगळ्या शरीराच्या समस्या उद्भवण्यास सुरूवात होते. थंडी सहन होत  नसल्यामुळे तुम्हाला  शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्रास व्हायला सुरूवात होते.  चेहरा तसंच हातपाय कोरडे पडणे,  हातांच्या नसा दुखणे , सांधेदूखी, आकडी येणे. यातीलच एक समस्या म्हणजे पायांच्या टाचांना भेगा पडणे. 

काहीजणांना वर्षभर ही समस्या होत असते. पण काहीजणांना हिवाळा आल्यानंतर टांचाच्या भेगांचे दुखणे हे तीव्रतेने जाणवते. तसंच जर तुम्ही कामसाठी बाहेर पडत असाल आणि चप्पल किंवा सॅण्डल घातल्यास  त्यातून जर पायांच्या भेगा दिसल्या तर ते खूपच खराब दिसतं. शिवाय तुम्हाला त्या टाचांमुळे त्रास होत असतो. तो वेगळाच.  जर तुम्हाला सुध्दा अशा समस्येचा सामना  करावा लागत असेल तर  काही घरगूती उपायांचा वापर करून तुम्ही टाचांना व्यवस्थित  करू शकता.

मीठ आणि गरम पाणी

रात्री झोपण्याच्या आधी  गरम पाण्यात मीठ घालून तुम्ही आपले पाय अर्धा तास त्यात भिजवून ठेवा. ज्यामुळे तुमच्या टाचा मऊ आणि मुलायम होतील. त्यानंतर तुम्ही टाचांना अंघोळ करण्यासाठी वापरत असलेल्या स्पजने घासा. त्यामुळे टाचांवरच्या मृतपेशी  निघून जातील. त्यानंतर बॉडीलोशन किंवा क्रिमच्या सहाय्याने मसाज करा. 

नाराळाचे तेल

तुम्ही टाचांवर क्रिमच्या ऐवजी नारळाच्या  तेलाने सुद्धा मालिश करू शकाता. त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी  नारळाच्या तेलाने मसाज  करा. असे केल्यास सकाळी पाय मुलायम झालेले दिसून येतील.  जर तुम्हाला पायांना भेगा पडण्याचा त्रास जास्त होत असेल तर  तुम्ही  रोजरात्री नारळाच्या तेलाने मालिश करा. तसंच  पायांना सुती कपड्याने रात्रभर बांधून झोपा. हा प्रयोग केल्यास सकाळी पाय मऊ झालेले दिसून येतील. तर अधिक वेगाने फरक जाणवण्यासाठी  १ महिना हा प्रयोग करा. 

जर टाचांना भेगा पडल्या असतील तर नारळाचं तेल सगळ्या  केमिकल्सयुक्त औषधांपेक्षा श्रेष्ठ ठरत असतं.  नारळाच्या तेलात एंन्टीइफ्लामेंटरी गुण असतात.  ज्यामुळे त्वचेवर  मऊपणा राहण्यास मदत होते. कोरड्या त्वचेसाठी नारळाचं तेल सगळ्यात उत्तम उपाय आहे. तसंच मृतपेशींना दूर करून पायांना व्यवस्थित करण्याचं काम नारळाच्या तेलामुळे होत असतं. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स