शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

टेन्शन घेणं आणि केस पांढरे होणं यांचा संबंध काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 15:17 IST

आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच आनंदासोबतच अनेक दुखाचे क्षणही येतात. अशातच दिवसभराच्या कामाची धावपळ, घरातील प्रॉब्लेम्स, ऑफिसमधील कामाचा ताण यांसारख्या गोष्टींमुळे आयुष्यात अनेक टेन्शन्सचा सामना करावा लागतो.

आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच आनंदासोबतच अनेक दुखाचे क्षणही येतात. अशातच दिवसभराच्या कामाची धावपळ, घरातील प्रॉब्लेम्स, ऑफिसमधील कामाचा ताण यांसारख्या गोष्टींमुळे आयुष्यात अनेक टेन्शन्सचा सामना करावा लागतो. तणावाची कारणं प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असतात. कारण प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. अनेकांचा असा समज असतो की, ताण घेतल्यामुळे व्यक्ती फक्त मानसिकरित्या खचते. पण हा समज चुकीचा आहे. तणावामुळे व्यक्ती शारीरिकरित्याही खचते. तसेच तणावाचा प्रभाव व्यक्तीच्या त्वचेवर आणि केसांवरही होतो. अनेकदा केस गळण्याच्या किंवा केस पांढरे होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. काही लक्षणांबाबत माहीत करून घेतल्यानंतर तुम्ही या समस्या दूर करू शकता. जाणून घेऊया अशा काही लक्षणांबाबत, ज्यांचा उपयोग करून तुम्ही तणावामुळे होणाऱ्या समस्यांपासून सुटका करून घेऊ शकता.

तणावामुळे केसांवर होणारा परिणाम :

  • केस पांढरे होणं
  • केस पातळ होणं
  • केस रूक्ष आणि निर्जीव दिसणं
  • केस गळणं

 

केस पांढरे होणं 

अशा अनेक कारणांमुळे केस पांढरे होण्याची समस्या वाढते. तसेच तणावही केस पांढरे होण्याचं कारण ठरतं. अनेक प्रकरणांमध्ये केस पांढरे होण्याचं कारण तणाव असल्याचं स्पष्ट झालं आहे. ही समस्या तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. 

केस पातळ होणं 

जर तुम्ही सतत तणावात राहत असाल तर, व्यक्ती व्यवस्थित जेवत नाही. जेवणावर परिणाम झाल्यामुळे शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्व मिळत नाहीत. त्यामुळे शरीरात होणाऱ्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केसांची वाढ होत नाही. तसेच शरीराच्या इतर समस्यांचा सामना करावा लागतो. परिणामी केस पातळ होतात. 

केस रूक्ष आणि निर्जीव दिसणं

जेव्हा तुम्ही तणावाने पीडित असता त्यावेळी त्याचा परिणाम शरीरावर होतो. तसेच सर्वात जास्त परिणाम केसांवर झालेला दिसून येतो. तणावामुळे पोषक तत्व केसांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. ज्यामुळे केस रूक्ष दिसू लागतात. 

केस गळणं

तणावामुळे कोर्टिसोल हार्मोन स्त्रवतात. त्यामुळे हेयर फॉलिकल्‍सच्या आजूबाजूला अपशिष्ट पदार्थ उत्सर्जित करतात. ज्यामुळे तुमचे केस पातळ होऊन सुकून जातात. त्यामुळे केस गळण्याची समस्या उद्धभवते. 

केस गळण्याची समस्या दूर करण्यासाठी हे उपाय करा :

- केस गळण्याची समस्या दूर करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला जीवनशैली बदलणं गरजेचं असतं. तणावापासून दूर राहणं गरजेचं असतं. सकाळी लवकर उठा आणि रात्री लवकत झोपा. तसेच टेक्निकल वस्तू म्हणजेच मोबाइल किंवा लॅपटॉपचा वापर कमी करा. 

- जेवण्याची वेळ निश्चित करा, संतुलित आहार घ्या. फळं आणि भाज्यांचे सेवन जास्तीत जास्त करा. कारण यामध्ये ती सर्व तत्व असतात, जी केसांसाठी आवश्यक असतात. 

- सकाळी एक तास व्यायाम किंवा योगासनं करा. रोज सकाळी  मॉर्निंग वॉकसाठी जा. यामुळे मोठ्या प्रमाणावर तणाव दूर होण्यास मदत होईल. 

- केसांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आणि हेल्दी ठेवण्यासाठी तेलाने मसाज करा. आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा मोहरीचं तेल, बदामाचं तेल आणि ऑलिव्ह ऑइलने स्काल्पला मसाज करा. मसाज करण्यासाठी कोमट तेलाचा वापर करा. तसेच केस धुण्यासाठी शॅम्पूचा वापर करा. 

- जर जास्त केस गळत असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. एखाद्या गोष्टीच्या संक्रमणामुळेही हा आजार होऊ शकतो. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स