शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

Beauty : ​‘या’ एका उपायाने टक्कल होईल दूर, येतील नवे केस !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST

केस गळतीच्या समस्येकडे वेळीच लक्ष दिले नाही तर ऐन तारुण्यात डोक्यावर टक्कल दिसू लागते. जाणून घ्या कोणता आहे हा प्रभावी उपाय !

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीची हेअरस्टाइल पाहून आज प्रत्येक तरुण त्याप्रकारची हेअरस्टाइल अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो, मात्र नेहमीच्या केस गळतीच्या समस्येने आपण अपेक्षित हेअरस्टाइल करु शकत नाही. केस गळतीच्या समस्येकडे वेळीच लक्ष दिले नाही तर ऐन तारुण्यात डोक्यावर टक्कल दिसू लागते. आपणही या समस्येने त्रस्त असाल तर आम्ही आपणास अशा एका उपायाची माहिती देत आहोत, जो फॉलो केल्यास टक्कल तर पडणारच नाही शिवाय नवीन केस येण्यास सुरुवात होऊ शकते. केस गळण्याचे प्रमाण जास्त असेल आणि टक्कल दिसू लागली असेल तर कांद्याचा रस केसांच्या मुळापर्यंत लावावा. यामुळे केस गळणे तर थांबतीलच शिवाय नवीन केस येण्यास सुरुवात होते. हा उपाय आठवड्यातून किमान तीन वेळा करावा. कांद्याच्या रसात सल्फर आणि मिनरल्स असतात. यामुळे केस वेगाने वाढतात आणि टक्कल कमी होते. केस गळतीशिवाय केसांत कोंडा असेल किंवा पांढरे केस असतील तरीही कांद्याचा रस लावल्यास फायदा होतो. यासाठी कांद्याला बारीक वाटून घ्या आणि त्यानंतर हाताच्या मुठीत घेऊन त्यातून रस काढा. हा रस केसांच्या मुळांना लावावा आणि अर्ध्यातासाने शॅँपूने केस स्वच्छ धुवावेत. केसांना लावण्यासाठी काढलेला रस जास्त काळापर्यंत साठवलेला नसावा. तसेच टक्कल कमी करण्यासाठीचे औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. * कांद्याच्या रसात मध मिक्स करु न लावल्यास केस गळतीच्या समस्येत अधिक फायदेशीर ठरते.  * कांद्याच्या रसात आॅलिव्ह आॅईल मिक्स करुन लावल्यास केसांची चमक वाढते शिवाय केस काळे आणि मऊदेखील होतात. * कांद्याच्या रसात खोबरेल तेल मिक्स करुन लावल्यास केस चमकदार होण्यास मदत होते. * कांद्याच्या रसात मेथी दाण्यांची पावडर मिक्स करुन लावल्यास केस पांढरे होण्यापासून बचाव होतो.  Also Read : ​Health : ​का २०-३० वयातच पुरुषांना सतावते केस गळतीची समस्या?                  : ​Beauty : डोक्यावर नवे केस हवे असल्यास या तेलाचा असा करा वापर !