शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
6
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
7
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
8
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
10
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
11
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
12
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
13
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
14
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
15
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
16
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
17
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
18
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
19
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
20
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?

थंडीत त्वचेची काळजी घ्या, पण 'या' चुका करु नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 10:51 IST

थंडीचे दिवस आले की लोकांच्या सवयींमध्येही फरक बघायला मिळतो. थंडीत खासकरुन त्वचेची काळजी नेहमीपेक्षा जास्त घ्यावी लागते.

(Image Credit : smokeypointskin.com)

थंडीचे दिवस आले की लोकांच्या सवयींमध्येही फरक बघायला मिळतो. थंडीत खासकरुन त्वचेची काळजी नेहमीपेक्षा जास्त घ्यावी लागते. पण लोक काळजी घेण्याच्या अशा काही गोष्टी करतात ज्याने आरोग्याला नुकसान होऊ शकतं. कधी कधी काही गोष्टींची काळजी तुमच्यासाठी समस्याही निर्माण करु शकतात. अशाच काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत, ज्या थंडीच्या दिवसात टाळायला पाहिजे. 

पायांना नेहमी झाकून ठेवणे - थंडीच्या दिवसात सर्वांनाच थंडी लागते. पण काही लोकांना थंडी जरा जास्तच जाणवते. हे लोक दिवस-रात्र हात आणि पाय झाकून ठेवतात. पण असे केल्याने त्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याने त्वचेचं नुकसान होऊ शकतं. अशात हात आणि पाय सतत झाकून ठेवण्याऐवजी काही वेळासाठी मोकळे ठेवा.

पाणी कमी पिणे - थंडीच्या दिवसात इतर ऋतुंच्या तुलनेत कमी तहाण लागते. पण याचा अर्थ हा नाही की, पाणी पिऊच नये. शरीराची क्रिया व्यवस्थित होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या तहाण नसली तरी या दिवसात पाणी पिणे गरजेचे आहे. कमी पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली होणार नाही.

जास्त गरम पदार्थ खाणे - थंडीच्या दिवसात गरमीसाठी वेगवेगळे गरमागरम पदार्थ खाल्ले जातात. अनेकांना याची सवयही असते. काही लोक गरम पराठे, गोड पदार्थ खातात, पण सतत हे पदार्थ खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोका असतो. सोबतच कोलेस्ट्रॉलचा स्तरही वाढतो, जे शरीरासाठी घातक ठरु शकतं. 

त्वचेवर नेहमी नेहमी क्रीम लावणे - थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी होण्याची समस्या अधिक प्रमाणात होते. त्यामुळे त्वचेची काळजी घेणे गरजेचेच आहे. पण काही लोक हे त्वचा मुलायम ठेवण्यासाठी त्वचेवर सतत चिकट क्रीम लावतात, याने त्वचेवर धुळ, माती आणि किटाणू चिकटतात. याने त्वचेचं अधिक नुकसान होऊ शकतं. 

हे वापरू नका

बेकिंग सोडा  – गरमीच्या दिवसांपेक्षा थंडीच्या दिवसात बेकिंग सोडा वापरणे नुकसानदायक ठरु शकतं. याने त्वचेवर काळे डाग पडतात. याने तुमची त्वचा सावळी होऊ शकते.

लिंबू  – वेगवेगळ्या फेस पॅकमध्ये लिंबाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. पण लिंबामध्ये भरपूर प्रमाणात सायट्रिक अॅसिड असतं. याने त्वचा अधिक रखरखीत होऊ शकते.   

पुदीना – थंडीच्या दिवसात त्वचेवर पुदीना वापरल्यास याने डार्कनेस वाढते. कारण या मेंथोल अधिक प्रमाणात असतं. याने चेहऱ्याचा ओलावा शोषून घेतला जातो. 

वेगवेगळ्या सालींपासून फेस पॅक - वेगवेगळ्या घरगुती उपायांमध्ये फळांच्या सालींपासून तयार केलेले फेस पॅक लावले जातात. पण थंडीच्या दिवसात याचा वापर करणे घातक ठरु शकतं. याने चेहऱ्याच्या त्वचेवरील तेल कमी होतं. याने त्वचेचा कोरडेपणा वाढू लागतो. 

संत्री - तसे तर थंडीच्या दिवसात संत्री खाणे फार फायदेशीर असतात. पण याच्या फेस पॅकचा वापर करणे समस्या निर्माण करु शकतो. कारण यात सायट्रिक अॅसिडचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे त्वचा अधिक कोरडी होते. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स