शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

प्रशिक्षक व फिजिओ यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार - पुल्लेला गोपीचंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:36 IST

‘राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमुळे यंदाचे सत्र खेळाडूंसाठी अत्यंत व्यस्त आहे. यासाठी खेळाडूंची तंदुरुस्ती कायम राखण्यासाठी प्रशिक्षक आणि फिजिओ यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे मत भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : ‘राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमुळे यंदाचे सत्र खेळाडूंसाठी अत्यंत व्यस्त आहे. यासाठी खेळाडूंची तंदुरुस्ती कायम राखण्यासाठी प्रशिक्षक आणि फिजिओ यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे मत भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले.इंडिया ओपन स्पर्धेच्या उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गोपीचंद यांनी म्हटले की, ‘व्यस्त कार्यक्रमाविषयी बोलण्यासाठी हा योग्य मंच नाही. खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रशिक्षकांचे काम खूप वाढले असून, ते कठीण बनले आहे. अव्वल खेळाडूंकडून खूप अपेक्षा असून त्यांच्यापुढे आव्हाने वाढली आहेत. त्यांना नव्या आव्हानांपुढे चांगले ताळमेळ साधावे लागेल.’ गोपीचंद यांनी पुढे म्हटले की, ‘किदाम्बी श्रीकांतने अनेक मोठ्या स्पर्धा होणार असून तंदुरुस्त राहावे लागेल असे सांगितले, तर अशा परिस्थितीमध्ये खेळाडूच्या खाण्यापिण्यासह त्याच्या सरावाचे वेळापत्रक ठरविण्यापर्यंत प्रशिक्षक व फिजिओ यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते.गेल्या काही काळापासून दुखापतींना सामोरे गेलेल्या श्रीकांतने या वेळी सांगितले की, ‘नोव्हेंबरमध्ये दुखापतग्रस्त झाल्याने मला चायना ओपनमधून माघार घ्यावी लागली. यामुळे मला सुपर सीरिज फायनल स्पर्धेपूर्वी सावरण्यासाठी वेळ मिळणार होता. सुपर सीरिजनंतर पीबीएल दरम्यानही मी दुखापतग्रस्त झालो आणि त्यामुळे इंडोनेशिया ओपन स्पर्धेत खेळू शकलो नाही.’ नुकताच झालेल्या इंडोनेशिया ओपन स्पर्धेत उपविजेती ठरलेल्या सायना नेहवालने व्यस्त कार्यक्रमाविषयी म्हटले की, ‘मी कोणत्याही विशिष्ट स्पर्धेमध्ये खेळण्याविषयी विचार केलेला नाही. प्रत्येक स्पर्धेविषयी मी उत्सुक असून माझे लक्ष तंदुरुस्त राहण्यावर केंद्रीत आहे.’ (वृत्तसंस्था)‘खेलो इंडिया’ शालेय क्रीडा योजना खूप चांगली संकल्पना आहे. देशात खेळांवर अधिक लक्ष दिले जात असल्याचे पाहून खूप चांगले वाटते.- पुल्लेला गोपीचंद 

टॅग्स :BadmintonBadmintonSportsक्रीडा