शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

प्रशिक्षकांसाठी शिबिर आयोजिण्याची गरज - प्रकाश पदुकोण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 01:46 IST

भारतीय बॅडमिंटनपटूंमध्ये खूप मोठी गुणवत्ता आहे. आज भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीयस्तरावर खूप मोठी मजल मारत आहेत. पण असे असले, तरी सध्या भारताला मोठ्या प्रमाणात गुणवान प्रशिक्षक घडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

मुंबई : भारतीय बॅडमिंटनपटूंमध्ये खूप मोठी गुणवत्ता आहे. आज भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीयस्तरावर खूप मोठी मजल मारत आहेत. पण असे असले, तरी सध्या भारताला मोठ्या प्रमाणात गुणवान प्रशिक्षक घडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आपल्याकडे सध्या उच्च दर्जाच्या प्रशिक्षकांची संख्या कमी असून, असे प्रशिक्षक घडविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याची आवश्यकता आहे,’ असे स्पष्टमत भारताचे माजी दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी व्यक्त केले.मुंबईतील क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे मंगळवारी पदुकोण यांच्या वतीने इंडिया इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेची घोषणा करण्यात आली. या वेळी प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिर आयोजिण्याचे आवश्यक असल्याचे सांगताना पदुकोण म्हणाले, ‘‘आज आपल्याकडे खूप कमी प्रशिक्षित किंवा उच्च दर्जाचे प्रशिक्षक आहेत. यासाठी आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे, परंतु राष्ट्रीय संघटनेच्या वतीने यावर काम सुरू आहे. तसेच, आपल्याकडे खूप चांगले प्रशिक्षक आहेत, पण त्यांना आवश्यक संधी मिळत नसल्याने त्यांचे नुकसान भारतीय बॅडमिंटनला होत आहे. मात्र, भविष्यामध्ये हे चित्र नक्कीच बदलेल, याची मला खात्री आहे.’’खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा विचार करता नुकताच किदाम्बी श्रीकांतने घेतलेला निर्णय खूप अचूक होता. त्याने आगामी दुबई स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी इतर सुपर सिरीज स्पर्धेतून माघार घेत अतिरिक्त सामने खेळण्यापासून स्वत:ला दूर ठेवले. तो दुबई स्पर्धेत जिंकेल की नाही, हे मी सांगू शकत नाही; पण एक मात्र नक्की, की या स्पर्धेत पूर्णपणे सज्ज होण्यासाठी त्याने पुरेसा वेळ मिळवला. शिवाय महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्यानंतर तुम्ही आपोआप अव्वल स्थानी पोहोचता. त्यामुळे खेळाडूंनी महत्त्वाच्या स्पर्धेत केवळ सहभागी न होता त्या स्पर्धा जिंकाव्यात. - प्रकाश पदुकोण

टॅग्स :BadmintonBadmintonIndiaभारत