शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

प्रशिक्षकांसाठी शिबिर आयोजिण्याची गरज - प्रकाश पदुकोण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 01:46 IST

भारतीय बॅडमिंटनपटूंमध्ये खूप मोठी गुणवत्ता आहे. आज भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीयस्तरावर खूप मोठी मजल मारत आहेत. पण असे असले, तरी सध्या भारताला मोठ्या प्रमाणात गुणवान प्रशिक्षक घडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

मुंबई : भारतीय बॅडमिंटनपटूंमध्ये खूप मोठी गुणवत्ता आहे. आज भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीयस्तरावर खूप मोठी मजल मारत आहेत. पण असे असले, तरी सध्या भारताला मोठ्या प्रमाणात गुणवान प्रशिक्षक घडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आपल्याकडे सध्या उच्च दर्जाच्या प्रशिक्षकांची संख्या कमी असून, असे प्रशिक्षक घडविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याची आवश्यकता आहे,’ असे स्पष्टमत भारताचे माजी दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी व्यक्त केले.मुंबईतील क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे मंगळवारी पदुकोण यांच्या वतीने इंडिया इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेची घोषणा करण्यात आली. या वेळी प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिर आयोजिण्याचे आवश्यक असल्याचे सांगताना पदुकोण म्हणाले, ‘‘आज आपल्याकडे खूप कमी प्रशिक्षित किंवा उच्च दर्जाचे प्रशिक्षक आहेत. यासाठी आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे, परंतु राष्ट्रीय संघटनेच्या वतीने यावर काम सुरू आहे. तसेच, आपल्याकडे खूप चांगले प्रशिक्षक आहेत, पण त्यांना आवश्यक संधी मिळत नसल्याने त्यांचे नुकसान भारतीय बॅडमिंटनला होत आहे. मात्र, भविष्यामध्ये हे चित्र नक्कीच बदलेल, याची मला खात्री आहे.’’खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा विचार करता नुकताच किदाम्बी श्रीकांतने घेतलेला निर्णय खूप अचूक होता. त्याने आगामी दुबई स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी इतर सुपर सिरीज स्पर्धेतून माघार घेत अतिरिक्त सामने खेळण्यापासून स्वत:ला दूर ठेवले. तो दुबई स्पर्धेत जिंकेल की नाही, हे मी सांगू शकत नाही; पण एक मात्र नक्की, की या स्पर्धेत पूर्णपणे सज्ज होण्यासाठी त्याने पुरेसा वेळ मिळवला. शिवाय महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्यानंतर तुम्ही आपोआप अव्वल स्थानी पोहोचता. त्यामुळे खेळाडूंनी महत्त्वाच्या स्पर्धेत केवळ सहभागी न होता त्या स्पर्धा जिंकाव्यात. - प्रकाश पदुकोण

टॅग्स :BadmintonBadmintonIndiaभारत