शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

मुंबईकर मानसी पदक मिळवण्यासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 03:29 IST

कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानता अखेरपर्यंत आपले लक्ष्य साध्य करण्याची जिद्द प्रत्येक खेळाडूमध्ये दिसून येते.

मुंबई : कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानता अखेरपर्यंत आपले लक्ष्य साध्य करण्याची जिद्द प्रत्येक खेळाडूमध्ये दिसून येते. भले यश मिळो अथवा नको, पण शेवटपर्यंत लढत राहण्याचा निश्चय पत्येक खेळाडूमध्ये पाहायला मिळतो. अशीच जिद्द मुंबईकर बॅडमिंटनपटू मानसी जोशीमध्ये दिसून येत आहे. अपघातामध्ये एक पाय गमावल्यानंतरही न डगमगता ती आगामी पॅरा आशियाई स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावण्यास सज्ज झाली आहे.एका भीषण रस्ता अपघातामध्ये एक पाय गमावल्यानंतर २९ वर्षीय मानसीचा आत्मविश्वास जराही कमी झाला नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न तिने कधीही सोडले नाही आणि आता तिने बॅडमिंटन गुरु पुलेल्ला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:ला आगामी पॅरा आशियाई स्पर्धेसाठी सज्ज केले आहे. मुळची मुंबईची असलेली मानसी गेल्या एक महिन्यापासून गोपीचंद अकादमीमध्ये सराव करीत असून जकार्तामध्ये आॅक्टोबर महिन्यात होत असलेल्या पॅरा आशियाई स्पर्धेत ती सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार मानली जात आहे.डिसेंबर २०११ साली झालेल्या एका भीषण रस्ता अपघातामध्ये मानसीने आपला एक पाय गमावला. यानंतर ती पुन्हा कोर्टवर उतरेल की नाही अशी शंका होती. मात्र, मानसीही हार न मानता मोठ्या जिद्दिने पुनरागमन केले आहे. तिने आपल्या खेळावर कोणताही परिणाम होऊ न देता सराव कायम राखला. मानसी म्हणाली की, ‘मी लहानपणापासून बॅडमिंटन खेळते. अपघात झाल्यानंतरही मी हार मानली नाही आणि माझ खेळ सुरु ठेवला.’ दखल घेण्याची बाब म्हणजे कृत्रिम पायाच्या सहाय्याने खेळत असलेल्या मानसीने अनेक स्पर्धांमध्ये आपली छाप पाडली आहे. २०१५ पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व केलेल्या मानसीने अनेक पदकांची कमाईही केली आहे.मानसीने पुढे म्हटले की, ‘मुंबईत रिहॅबिलिटेशन क्लिनिकमध्ये सर्वप्रथम कृत्रिम पाय लावला. ज्या कृत्रिम पायाचा मी वापर करते त्यात सेंसर लावण्यात आहेत.’ मानसीची कठोर मेहनत पाहून प्रशिक्षक गोपीचंदही प्रभावित झाले. ती सर्वच लोकांसाठी एक प्रेरणास्थान असल्याचे वक्तव्य गोपीचंद यांनी केले आहे. गोपीचंद म्हणाले की, ‘पॅरा बॅडमिंटनमध्ये पदक जिंकण्यासाठी अनेक संधी असतात. ती अत्यंत महेनती आहे. तीचा झुंजार खेळ पाहून खूप चांगले वाटते. अनेक सक्षम लोकांसाठी ती प्रेरणास्थान आहे. ती स्पर्धेत नक्कीच यशस्वी कामगिरी करेल.’>सरकारकडून अपेक्षामानसीला कृत्रिम पायाच्या खर्चाचे ओझे वाहून खेळावे लागत आहे. तिने सांगितले की, ‘मी जो कृत्रिम पाय वापरते तो खूप महाग आहे. मला आशा आहे की, यामध्ये मला सरकारकडून काहीप्रमाणात सूट मिळेल. कृत्रिम अवयवांमध्ये नुकताच ५ टक्के जीएसटी जोडण्यात आला आहे. कृत्रिम पायाची किंमत २० लाख रुपये असून दर पाच वर्षांनी हा पाय बदलावा लागतो. त्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या कितीही सक्षम असाल, तरी हे एक ओझेच आहे.’