शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
3
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
4
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
5
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
6
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
7
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
8
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
9
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
10
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
11
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
12
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
13
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
14
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
15
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
16
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

मुंबईकर मानसी पदक मिळवण्यासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 03:29 IST

कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानता अखेरपर्यंत आपले लक्ष्य साध्य करण्याची जिद्द प्रत्येक खेळाडूमध्ये दिसून येते.

मुंबई : कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानता अखेरपर्यंत आपले लक्ष्य साध्य करण्याची जिद्द प्रत्येक खेळाडूमध्ये दिसून येते. भले यश मिळो अथवा नको, पण शेवटपर्यंत लढत राहण्याचा निश्चय पत्येक खेळाडूमध्ये पाहायला मिळतो. अशीच जिद्द मुंबईकर बॅडमिंटनपटू मानसी जोशीमध्ये दिसून येत आहे. अपघातामध्ये एक पाय गमावल्यानंतरही न डगमगता ती आगामी पॅरा आशियाई स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावण्यास सज्ज झाली आहे.एका भीषण रस्ता अपघातामध्ये एक पाय गमावल्यानंतर २९ वर्षीय मानसीचा आत्मविश्वास जराही कमी झाला नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न तिने कधीही सोडले नाही आणि आता तिने बॅडमिंटन गुरु पुलेल्ला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:ला आगामी पॅरा आशियाई स्पर्धेसाठी सज्ज केले आहे. मुळची मुंबईची असलेली मानसी गेल्या एक महिन्यापासून गोपीचंद अकादमीमध्ये सराव करीत असून जकार्तामध्ये आॅक्टोबर महिन्यात होत असलेल्या पॅरा आशियाई स्पर्धेत ती सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार मानली जात आहे.डिसेंबर २०११ साली झालेल्या एका भीषण रस्ता अपघातामध्ये मानसीने आपला एक पाय गमावला. यानंतर ती पुन्हा कोर्टवर उतरेल की नाही अशी शंका होती. मात्र, मानसीही हार न मानता मोठ्या जिद्दिने पुनरागमन केले आहे. तिने आपल्या खेळावर कोणताही परिणाम होऊ न देता सराव कायम राखला. मानसी म्हणाली की, ‘मी लहानपणापासून बॅडमिंटन खेळते. अपघात झाल्यानंतरही मी हार मानली नाही आणि माझ खेळ सुरु ठेवला.’ दखल घेण्याची बाब म्हणजे कृत्रिम पायाच्या सहाय्याने खेळत असलेल्या मानसीने अनेक स्पर्धांमध्ये आपली छाप पाडली आहे. २०१५ पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व केलेल्या मानसीने अनेक पदकांची कमाईही केली आहे.मानसीने पुढे म्हटले की, ‘मुंबईत रिहॅबिलिटेशन क्लिनिकमध्ये सर्वप्रथम कृत्रिम पाय लावला. ज्या कृत्रिम पायाचा मी वापर करते त्यात सेंसर लावण्यात आहेत.’ मानसीची कठोर मेहनत पाहून प्रशिक्षक गोपीचंदही प्रभावित झाले. ती सर्वच लोकांसाठी एक प्रेरणास्थान असल्याचे वक्तव्य गोपीचंद यांनी केले आहे. गोपीचंद म्हणाले की, ‘पॅरा बॅडमिंटनमध्ये पदक जिंकण्यासाठी अनेक संधी असतात. ती अत्यंत महेनती आहे. तीचा झुंजार खेळ पाहून खूप चांगले वाटते. अनेक सक्षम लोकांसाठी ती प्रेरणास्थान आहे. ती स्पर्धेत नक्कीच यशस्वी कामगिरी करेल.’>सरकारकडून अपेक्षामानसीला कृत्रिम पायाच्या खर्चाचे ओझे वाहून खेळावे लागत आहे. तिने सांगितले की, ‘मी जो कृत्रिम पाय वापरते तो खूप महाग आहे. मला आशा आहे की, यामध्ये मला सरकारकडून काहीप्रमाणात सूट मिळेल. कृत्रिम अवयवांमध्ये नुकताच ५ टक्के जीएसटी जोडण्यात आला आहे. कृत्रिम पायाची किंमत २० लाख रुपये असून दर पाच वर्षांनी हा पाय बदलावा लागतो. त्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या कितीही सक्षम असाल, तरी हे एक ओझेच आहे.’