शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

आजारी असूनही पी.व्ही. सिंधूने दुबई बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिली कडवी लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 12:26 IST

दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये पी.व्ही.सिंधूचा पराभव झाला असला तरी सिंधू तब्येत बरी नसताना अंतिम फेरीचा सामना खेळत होती.  

ठळक मुद्देदुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानच्या अकाने यामागुचीनं सिंधूचा तीन गेममध्ये 1-2 अशा फरकानं पराभव केला.  गोपीचंद यांनी प्रशिक्षणातील आव्हाने आणि सिंधूची 2018 बॅडमिंटन मोसमासाठी कशी तयारी आहे त्याची माहिती दिली.  

नवी दिल्ली - दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये पी.व्ही.सिंधूचा पराभव झाला असला तरी सिंधू तब्येत बरी नसताना अंतिम फेरीचा सामना खेळत होती.  या संपूर्ण स्पर्धेदरम्यान सिंधू आजारी होती. ती सर्दीने हैराण झाली होती. पण तरीही तिने अंतिम फेरीत उत्तम लढत दिली असे सिंधूचे प्रशिक्षक पुललेला गोपीचंद यांनी सांगितले.  टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना गोपीचंद यांनी प्रशिक्षणातील आव्हाने आणि सिंधूची 2018 बॅडमिंटन मोसमासाठी कशी तयारी आहे त्याची माहिती दिली.  

दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानच्या अकाने यामागुचीनं सिंधूचा तीन गेममध्ये 1-2 अशा फरकानं पराभव केला.  अकाने यामागुचीनं जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर आहे. पहिला सेट जिंकल्यानंतर  दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये यामागुचीच्या आक्रमक खेळीपुढे सिंधूचा पराभव झाला. यामागुचीनं 21-15, 12-21, 21-19 असा सिंधूचा पराभव करत चषकावर नाव कोरलं. 

जिंकण्यासाठी तुम्हाला शेवटचा पराभव विसरुन वेगाने पुढे जावं लागतं असे गोपीचंद म्हणाले.  प्रशिक्षक म्हणून काम करताना खेळाडू त्याच्या पराभवावर जास्त विचार करणार नाही याकडे तुमचे लक्ष असले पाहिजे. खेळाडूला पुढच्या लढतीसाठी मानसिक दृष्टया तयार ठेवण्याची जबाबदारी आव्हानात्मक असते. पराभवातून पुन्हा उभे राहण्यासाठी खेळाडूला मदत करण्याची प्रशिक्षक म्हणून माझी जबाबदारी आहे असे गोपीचंद म्हणाले. 

बॅडमिंटन वेळापत्रक व्यस्त; पण पर्याय नाहीभारतीय खेळाडू व्यस्त वेळापत्रकाचा सातत्याने सामना करीत असल्याची कबुली देत राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद यांनी व्यस्त वेळापत्रकाशी ताळमेळ साधण्याशिवाय खेळाडूंपुढे पर्याय नसल्याचे म्हटले आहे.   भारतीय खेळाडू गरजेपेक्षा अधिक स्पर्धा खेळत असल्याचे विधान दिग्गज खेळाडू प्रकाश पदुकोण यांनी नुकतेच केले. त्यांच्या वक्तव्यानंतर देशात बॅडमिंटनपटूंच्या व्यस्त वेळापत्रकाचीच चर्चा सुरू झाली. एका कार्यक्रमात बोलताना गोपीचंद म्हणाले,‘व्यस्त वेळापत्रकाचा फटका केवळ भारतीय खेळाडूंनाच नव्हे तर जगातील खेळाडूंना बसतो आहे. महत्त्वपूर्ण असलेल्या आशियाई आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांमध्ये खेळणे गरजेचे असल्यामुळे भारतीय खेळाडूंसाठी पाठोपाठ स्पर्धा खेळणे ही मोठी डोकेदुखी ठरत आहे.’

युरोपातील खेळाडू राष्ट्रकुल किंवा आशियाई खेळात खेळत नाहीत पण आमच्या खेळाडूंपुढे पर्याय नाही. आमच्या खेळाडूंना परिस्थितीशी ताळमेळ साधावाच लागेल. प्रवास करताना देखील सरावाकडे पाठ फिरवून चालणार नाही.’ भारताच्या अव्वल खेळाडूंना विश्रांती देत राष्ट्रकुलमध्ये दुय्यम दर्जाचा संघ पाठविणे योग्य राहील का, असा सवाल करताच गोपीचंद म्हणाले, ‘नाही. राष्ट्रकुल ही महत्त्वाची स्पर्धा असल्याने आम्हाला दुय्यम दर्जाचे खेळाडू पाठविता येणार नाही. 

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू