शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

...तर नक्कीच बलाढ्य संघांवर वर्चस्व गाजवू - सिंधू, सायना व्यक्त केले मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 03:59 IST

आम्हाला सातत्याने मदत केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. भारतीय खेळाडूंनी जर स्वत:च्या क्षमतेवर विश्वास कायम ठेवला, तर नक्कीच त्यांना चीन, कोरिया आणि जपान या देशांतील खेळाडूंवर दबदबा राखण्यात यश येईल

नवी दिल्ली : आम्हाला सातत्याने मदत केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. भारतीय खेळाडूंनी जर स्वत:च्या क्षमतेवर विश्वास कायम ठेवला, तर नक्कीच त्यांना चीन, कोरिया आणि जपान या देशांतील खेळाडूंवर दबदबा राखण्यात यश येईल,’ असे मत भारताचे स्टार शटलर सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी व्यक्त केले.केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांच्या निवासस्थानी झालेल्या एका समारंभामध्ये या दोन्ही खेळाडूंनी मत व्यक्त केले. नुकताच झालेल्या ग्लासगो जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर सायनाने कांस्यपदक मिळवले. या दोघींमुळे स्पर्धेत भारताला दोन पदके पटकावता आली.सायनाने या वेळी म्हटले की, ‘सातत्याने मिळालेल्या पाठिंब्यासाठी आम्ही भारतीय सरकार आणि क्रीडामंत्र्यांचे आभार मानतो. सरकारने घेतलेल्या पुढाकारामुळेच विविध खेळ भारतात लोकप्रिय होत आहेत. आज देशात क्रीडा सुविधांमध्ये खूप सुधारणा होत असून, खेळाडूंनी स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. या जोरावरच आपण अधिक मजबूत बनू शकतो आणि चीन, जपान, कोरियासारख्या बलाढ्य संघांवर वर्चस्व गाजवू शकतो.’त्याचप्रमाणे, ‘भारतात बॅडमिंटनच्या लोकप्रियतेमध्ये खूप वाढ झाली आहे. अनेक उदयोन्मुख खेळाडू पुढे येत आहेत. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत रोमांचक झाला आणि हा सामना माझ्या कारकिर्दीतील सर्वांत लांबलचक सामना ठरला,’ असे सिंधूने या वेळी म्हटले.या वेळी, किदाम्बी श्रीकांतही उपस्थित होता. ‘खेळाडूंना देशात सन्मान मिळणे आवश्यक आहे,’ असे मत त्याने या वेळी मांडले. तसेच, राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद आणि सायनाचे वैयक्तिक प्रशिक्षक विमल कुमार हेही या वेळी उपस्थित होते. (वृत्तसंस्था)विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य जिंकणे विशेष: सायना नेहवालदेशातील अव्वल बॅडमिंटन तारका सायना नेहवाल हिने दुखापतीतून सावरल्यानंतर ग्लास्गो विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणे हे आपल्यासाठी विशेष ठरल्याचे म्हटले आहे.सायना म्हणाली, ‘पदक जिंकणे नेहमीच विशेष आहे. जर हे पदक आॅलिम्पिक अथवा विश्व चॅम्पियनशिपमधील असेल, तर ते खूपच विशेष असते. २0१५ मध्ये रौप्य आणि २0१७ मध्ये कांस्यपदक जिंकल्याने मी खूप सुदैवी आहे.’रिओ आॅलिम्पिकनंतर गुडघ्यावर शस्त्रक्रिया झालेली ही २७ वर्षीय खेळाडू म्हणाली, ‘माझ्यासाठी हे पदक खूप महत्त्वाचे आहे. कारण मला अशी दुखापत झाली होती की, ज्यामुळे माझ्या कारकिर्दीवर त्याचा परिणाम होऊ शकला असता.’ तिने फिजियो आणि प्रशिक्षक विमल कुमार यांची प्रशंसा केली. त्यांच्या मदतीने ती कोर्टवर पुनरागमन करू शकली.सायना म्हणाली, ‘गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या या शस्त्रक्रियेनंतर फिजियो चंदन पोद्दार आणि अरविंद निगम यानी मला मदत केली. त्यानंतर माझे प्रशिक्षक विमल यांनी हळूहळू जेथे मी आता आहे तेथे पोहोचवण्यास मदत केली.’ पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही गेल्यावर्षी चायना ओपनमध्ये सायनाला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. ती म्हणाली, ‘मी चीनमधील स्पर्धेत सहभाग घेतला आणि पहिल्याच फेरीत पराभूत झाली; परंतु मी एका आठवड्यानंतर मुसंडी मारत मकाऊ ओपन आणि हाँगकाँग ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. मी मलेशिया ओपन जिंकली आणि इंडिया ओपन, इंडोनेशिया ओपन तसेच आॅस्ट्रेलिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. आता विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणे खूप समाधानकारक राहिले.’लंडन आॅलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकणाºया या खेळाडूने म्हटले, ‘मी ग्लास्गोमध्ये पदक जिंकण्याविषयी आश्वस्त होती. सुंग जी ह्यूूनविरुद्ध माझा रेकॉर्ड ७-२ आहे. स्थानिक खेळाडू क्रिस्ट गिलमोरला उपांत्यपूर्व फेरीत नमवल्यानंतर मला ओकुहारा हिच्याविरुद्धच्या उपांत्यफेरीआधी विश्रांती मिळाली असती तर मी तिला पराभूत करू शकली असते. तीन सेटपर्यंत चाललेल्या या सामन्यात कमी विश्रांती मिळाल्यामुळे मला पराभवाचा सामना करावा लागला; परंतु मी पदक जिंकल्याने आनंदित आहे.’