शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय क्रीडाक्षेत्राच्या नव्या यशोस्तंभाच्या जिद्दीची ही कहाणी, किदांबी श्रीकांतने मैदानाबाहेर कोणत्या दोन संकटांना दिली मात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 13:22 IST

केवळ प्रतिस्पर्धी खेळाडूंनाच मात दिलेली नाही तर साधारण तीन वर्षापूर्वी अक्षरशः मृत्युलासुध्दा मात दिली आहे. त्यातून सावरल्यावर गेल्याच वर्षी कठोर परिक्षा घेणाऱ्या भयंकर दुखण्यावरसुध्दा विजय मिळवला

ललित झांबरे/ ऑनलाईन लोकमत

मुंबई- भारतीय क्रीडा क्षेत्राचा नवा सुपरस्टार, सुपर कूल बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने यंदा भल्याभल्यांना मात दिली. लीन दान व ली चौंग वेईसारख्या मातब्बर खेळाडूंचे बॅडमिंटनमधील वर्चस्वाचे दिवस संपले असल्याची भाषा तो करु लागलाय. वर्षभरात चार-चार सुपर सिरिज अजिंक्यपदं पटकावून तो लीन दान, ली चोंग वेई आणि चेन लाँग यांच्यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसलाय. मात्र असे करताना त्याने केवळ प्रतिस्पर्धी खेळाडूंनाच मात दिलेली नाही तर साधारण तीन वर्षापूर्वी अक्षरशः मृत्युलासुध्दा मात दिली आहे. त्यातून सावरल्यावर गेल्याच वर्षी कठोर परिक्षा घेणाऱ्या भयंकर दुखण्यावरसुध्दा विजय मिळवला आहे. या दोन्ही संकटांवेळी कच खाल्ली असती तर त्याला खेळच सोडावा लागला असता परंतु मोठ्या हिमतीने त्याने या संकटांचा मुकाबला केला, तो जिद्दीने पुन्हा कोर्टवर परतला आणि वर्षभरातच सर्वात सफल बॅडमिंटनपटूंच्या पंक्तीत जाऊन बसला. वर्षाला चार-चार सुपर सिरिज स्पर्धा जिंकणारा तो केवळ चौथाच खेळाडू आहे. अवघ्या 24 वर्षे वयाच्या गुंटुरच्या या खेळाडूच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत आलेली ही दोन महाभयानक संकट कोणती होती? आणि त्याने त्यावर कशी मात केली? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 2014 मध्ये जावे लागले. त्यावर्षीच्या जुलैमध्ये नेमक्या राष्ट्रकुल सामन्यांच्या तोंडावर त्याला डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला आणि एका दिवशी त्याचे थोरले बंधू, के. ननगोपाळ यांना तो बाथरुममध्ये बेशुध्दावस्थेत आढळून आला. त्यांनी तातडीने श्रीकांतला दवाखान्यात हलवले. त्याला अतिदक्षता विभागात अॅडमिट करण्यात आले आणि चाचण्यांअंती श्रीकांतला मेंदूज्वर असल्याचे निदान झाले. दोन आठवडे त्याच्यावर औषधोपचार चालले परंतु राष्ट्रकुल सामने तोंडावर असल्याने त्याला अँटीबायोटीक्स घेण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे या आजारातून पूर्ण सावरलेला नसतानासुध्दा राष्ट्रकुल सामन्यांमध्ये खेळताना त्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. यानंतर काही दिवसातच चीन ओपन स्पर्धा जिंकताना लीन दान याला 21-19, 21-17अशी मात देत त्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. या यशाबद्दल ननगोपाळ सांगतात,"ज्या स्थितीतून तो गेला होता ते पाहता आम्ही या विजेतेपदाची अजिबात अपेक्षा केलेली नव्हती पण या विजयाने तो मानसिकदृष्ट्या किती खंबीर आहे ते दाखवून दिले." यानंतर रियो अॉलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत कडवा संघर्ष केल्यानंतरही त्याला लिन दानकडू हार पत्करावी लागली. या पराभवाने त्याला खूप निराशा आली आणि काही काळासाठी ब्रेक घेत त्याने घरी राहणेच पसंत केले. त्या निराशेतून बाहेर आल्यावर पुन्हा खेळायला सुरुवात केली तर जपान ओपनवेळी त्याच्या टाचेला दुखापत झाली. उजव्या पायाला प्लास्टर बांधावे लागले आणि श्रीकांत पुन्हा इच्छा नसताना मैदानाबाहेर बसला. मात्र तो नुसता बसून नाही राहिला तर त्या स्थितीत पायाला प्लास्टर असतानासुध्दा तो स्टूलवर बसल्या बसल्या वेगवेगळ्या फटक्यांचा सराव करताना दिसला. त्याचा व्हिडिओसुध्दा व्हायरल झाला. या दिवसांबद्दल माहिती देताना स्वतः बॅडमिंटनपटू असलेले श्रीकांतचे थोरले बंधू ननगोपाल सांगतात, "श्रीकांतसाठी कदाचित हा सर्वात कठीण काळ असावा. अॉलिम्पिकमधील कामगिरीने, विशेषतः लीन दानला तिसऱ्या गेमपर्यंत खेचल्यावरसुध्दा आलेल्या पराभवाने आधीच तो निराश होता, त्यानंतर या दुखण्याने त्याला तब्बल चार महिने मैदानाबाहेर बसवले. महिनाभर तर त्याला हलतासुध्दा येत नव्हते. त्यानंतर त्याने स्वतःच हिंमत बांधली आणि फिटनेसच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. तो केवळ बसल्या बसल्याच काही फटके मारु शकत होता आणि शरीराच्या वरच्या भागाचेच व्यायाम करु शकत होता. अशा स्थितीत गोपीभैय्यांनी (पी. गोपीचंद) त्याला फार साथ दिली. मला वाटते या प्रसंगानेच त्याला संयम राखण्यास शिकवले. परंतु त्याही स्थितीत तो आम्हाला सांगायचा, बघा, माझेही दिवस येतील." आणि बघा...श्रीकांतच्या म्हणण्याप्रमाणे वर्षभरातच त्याचे दिवससुध्दा आले. वर्षभरात चार चार सुपर सिरीज स्पर्धा जिंकणारा जगातील केवळ चौथा आणि ग्रँड प्रिक्स, सुपर सिरिज आणि सुपर सिरिज प्रिमियर आसा तिहेरी मुकूट जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला.

टॅग्स :Kidambi Srikanthकिदम्बी श्रीकांतBadmintonBadminton