शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Asian Games 2018 : बॅडमिंटनला सुवर्ण झळाळी देण्याची हीच संधी!

By स्वदेश घाणेकर | Updated: August 15, 2018 05:12 IST

आगामी आशियाई स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघ सर्वोत्तम कामगिरी करताना पदकांची लयलूट करेल, मुख्य प्रशिक्षक पुलेल्ला गोपिचंद यांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरो...

आगामी आशियाई स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघ सर्वोत्तम कामगिरी करताना पदकांची लयलूट करेल, मुख्य प्रशिक्षक पुलेल्ला गोपिचंद यांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरो... १८ आॅगस्टपासून भारतीय संघ आशियाई स्पर्धेतील पदकांची मोहीम फत्ते करण्यासाठी स्वत:ला झोकून देणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत विशेष लक्ष असेल ते भारतीय बॅडमिंटनपटूंवर आणि त्याला कारणही तसेच आहे. मागील काही वर्षांत भारताच्या बॅडमिंटनपटूंनी विविध आंतरराष्ट्रीय, जागतिक स्पर्धेत वर्चस्व गाजवले आहे. त्यात सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत, अजय जयराम, एच.एस. प्रणॉय यांचे प्रामुख्याने नाव घ्यायला हवे.जागतिक अजिंक्यपद, सुपर सीरिज, ग्रँड प्रिक्स, ग्रँड प्रिक्स गोल्ड आदी स्पर्धांमध्ये कामगिरीचा आढावा घेतल्यास, भारतीय खेळाडूंच्या प्रगतीचा वेग नक्की लक्षात येईल. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीयांनी २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्य अशा एकूण ६६ पदकांची कमाई केली होती. यात बॅडमिंटनचा वाटा ६ पदकांचा (२ सुवर्ण, ३ रौप्य व १ कांस्य) होता. म्हणजेच दहा टक्के... त्यात विशेष म्हणजे पाच खेळाडूंनी सुवर्णपदकाच्या शर्यतीपर्यंत मजल मारली. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धा यांची तुलना आणि इतिहास लक्षात घेता जकार्तात भारतीय खेळाडू गोल्ड कोस्टसारखी कामगिरी करतील, अशी अपेक्षा करणे म्हणजे थोडे धाडसच होईल.पण ते धाडस करायला खरेच हरकत नाही. २०१४च्या इंचिओन आशियाई स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंना केवळ एकाच (कांस्य) पदकावर समाधान मानावे लागले होते. पण त्यानंतरच्या चार वर्षांत विशेषत: चीन, जपान, कोरिया यांचे वर्चस्व असलेल्या बहुतांश स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आपले नाणे खणखणीत वाजवले. चिनी वर्चस्वाला आव्हान देण्याची शिकवण आपल्याला सायनाने दिली आणि त्यामुळे चीनची मक्तेदारी असलेल्या या खेळात भारताने स्वत:चे एक स्थान निर्माण केले. तिने निर्माण केलेली जिंकण्याची भूक काळानुसार वाढतच गेली आहे.फुलराणी सायनाने रचलेल्या भक्कम पायावर पी. व्ही. सिंधू पदकाचे हळूहळू इमले रचत गेली. आॅलिम्पिकमधील रौप्यपदक आणि जागतिक स्पर्धेतील चार पदकं (दोन रौप्य व दोन कांस्य) ही त्याचीच साक्ष देतात. याशिवाय सिंधूने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या. खऱ्या अर्थाने ती अपल्यासाठी अभेद्य ‘सिंधु’दुर्गच ठरली आहे. अंतिम फेरीतील तणावात होणारा खेळ वगळला तर सिंधूने भल्याभल्यांना पराभूत केले आहे. या प्रवासात सायनाला दुखापतीमुळे मागे राहावे लागले. पण राष्ट्रकुलच्या सुवर्णपदकाने तिने गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवला आणि बॅडमिंटन चाहत्यांना आशियाई स्पर्धेत या दोन खेळाडूंमध्ये सुवर्णपदकाची लढत पाहायला नक्की आवडेल.पुरुषांमध्ये किदाम्बी श्रीकांत आणि एच.एस. प्रणॉय यांच्यावर भिस्त असली तरी खरी मदार किदाम्बीवर आहे. त्याचे सातत्य हेच यशामागचे गमक... २०१७ मध्ये त्याने चार सुपर सीरिज जेतेपदं जिंकली. ली चाँग वेई, लीन डॅन, चेन लाँग या दिग्गजांना नमवण्याचा पराक्रम त्याने केला. त्यामुळे आशियाई स्पर्धेतील त्याची कामगिरी पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. प्रणॉयकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही. श्रीकांतसारखी त्याची कामगिरी उठावदार झाली नसली तरी तो डार्क हॉर्स ठरू शकतो.सात्त्विकराज रंकीरेड्डी - चिराग शेट्टी, मनू अत्री-बी सुमित रेड्डी, एन. सिक्की रेड्डी, प्रणव चोप्रा या युवा खेळाडूंसह अनुभवी अश्विनी पोनप्पा आशियाई स्पर्धेत आपला दबदबा गाजवण्यासाठी सज्ज आहेत. भारताला मागील १४ आशियाई स्पर्धेत एकदाही कांस्यपदकाची वेस ओलांडता आलेली नाही. ती यंदा ओलांडण्यात भारतीय खेळाडू यशस्वी होतील, असा विश्वास गोपिचंद यांच्याप्रमाणे सर्व भारतीयांना वाटत आहे. तो विश्वास नक्कीच सार्थ ठरेल.संकलन : स्वदेश घाणेकर

टॅग्स :Asian Games 2018एशियन गेम्स २०१८BadmintonBadminton