शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

कार पुन्हा महागणार? बीएस-६च्या दुसऱ्या टप्प्याची तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 06:10 IST

भारतीय वाहन उद्योग सध्या आपली वाहने भारत स्टेज - ६ (बीएस - ६) उत्सर्जन मानदंडांच्या दुसऱ्या टप्प्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत  आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पुढील वर्षी एप्रिलपासून कठोर उत्सर्जन नियमांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यामुळे वाहन निर्माते त्यांची वाहने अपग्रेड करण्यासाठी गुंतवणूक करत असल्याने प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या किमती पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय वाहन उद्योग सध्या आपली वाहने भारत स्टेज - ६ (बीएस - ६) उत्सर्जन मानदंडांच्या दुसऱ्या टप्प्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. एकदा असे झाले की, उत्सर्जन मानके युरो-६ मानकांच्या बरोबरीने असतील. चारचाकी प्रवासी आणि व्यावसायिक वाहने प्रगत मानकांशी सुसंगत करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असणे आवश्यक आहे. अशा स्थितीत वाहन उत्पादकांचा उत्पादन खर्च वाढू शकतो, त्याचा भार अंतिमतः पुढील आर्थिक वर्षापासून खरेदीदारांनाच सोसावा लागेल, असे वाहन उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे.

कोणत्या भागावर लक्ष? प्रगत उत्सर्जन मानकांची पूर्तता करण्यासाठी, वाहनांना अशा उपकरणासह सुसज्ज करणे आवश्यक आहे. ज्यामुळे चालत्या वाहनाच्या उत्सर्जन पातळीचे परीक्षण शक्य होणार आहे. यासाठी हे उपकरण कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आणि ऑक्सिजन सेन्सरसारख्या अनेक महत्त्वाच्या भागांवर लक्ष ठेवेल.नवीन नियमांच्या अंमलबजावणीमुळे वाहनांच्या एकूण किमतीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. 

नवीन वाहनांमध्ये काय सुविधा?nवाहन उत्सर्जन पातळी निश्चित केलेल्या मानकांपेक्षा जास्त होताय, हे उपकरण वाहनाची योग्य सर्व्हिस करण्याची वेळ आली, हे सांगण्यासाठी इशारा लाईट देईल.nयाशिवाय, वाहनामध्ये खर्च होणाऱ्या इंधन स्तराला नियंत्रित ठेवण्यासाठी वाहनांमध्ये प्रोग्राम केलेले इंधन इंजेक्टर देखील लावण्यात येतील. हे उपकरण पेट्रोल इंजिनला पाठवल्या जाणाऱ्या इंधनाचे प्रमाण आणि वेळेवरही लक्ष ठेवेल.

आणखी बदल काय? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सेमीकंडक्टर चिपलाही इंजिनचे तापमान, ज्वलनासाठी पाठवलेला हवेचा दाब व उत्सर्जनातील कण यांचे निरीक्षण करण्यासाठी देखील अपग्रेड करणे आवश्यक आहे.

वाहन कंपन्या काय म्हणतात?टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले की, कंपनी या परिवर्तनाच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे आणि अभियांत्रिकी क्षमतेचा मोठा हिस्सा या विकासकामात गुंतला आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी अधिकारी (कॉर्पोरेट अफेअर्स) राहुल भारती म्हणाले की, कंपनी बीएस - ६च्या दुसऱ्या टप्प्यासाठी देखील तयारी करत आहे.

कंपनीची सर्व वाहने बीएस - ६ची दुसऱ्या टप्प्यातील मानकांनुसार केली जातील. त्यासाठी इंजिनची क्षमता वाढवण्यावर विशेष भर दिला जाईल, असे प्रमुख वाहन उत्पादक महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष (ऑटोमोटिव्ह सेक्टर) विजय नाकरा यांनी म्हटले आहे.

२०२० १ एप्रिलपासून देशात नवीन उत्सर्जन मानक म्हणून भारतात बीएस-६ चा पहिला टप्पा लागू करण्यात आला होता.

७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक वाहन कंपन्यांना नवीनमानकांशी जुळवून घेण्यासाठी करावी लागली होती.

टॅग्स :carकार