शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

कार पुन्हा महागणार? बीएस-६च्या दुसऱ्या टप्प्याची तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 06:10 IST

भारतीय वाहन उद्योग सध्या आपली वाहने भारत स्टेज - ६ (बीएस - ६) उत्सर्जन मानदंडांच्या दुसऱ्या टप्प्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत  आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पुढील वर्षी एप्रिलपासून कठोर उत्सर्जन नियमांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यामुळे वाहन निर्माते त्यांची वाहने अपग्रेड करण्यासाठी गुंतवणूक करत असल्याने प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या किमती पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय वाहन उद्योग सध्या आपली वाहने भारत स्टेज - ६ (बीएस - ६) उत्सर्जन मानदंडांच्या दुसऱ्या टप्प्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. एकदा असे झाले की, उत्सर्जन मानके युरो-६ मानकांच्या बरोबरीने असतील. चारचाकी प्रवासी आणि व्यावसायिक वाहने प्रगत मानकांशी सुसंगत करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असणे आवश्यक आहे. अशा स्थितीत वाहन उत्पादकांचा उत्पादन खर्च वाढू शकतो, त्याचा भार अंतिमतः पुढील आर्थिक वर्षापासून खरेदीदारांनाच सोसावा लागेल, असे वाहन उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे.

कोणत्या भागावर लक्ष? प्रगत उत्सर्जन मानकांची पूर्तता करण्यासाठी, वाहनांना अशा उपकरणासह सुसज्ज करणे आवश्यक आहे. ज्यामुळे चालत्या वाहनाच्या उत्सर्जन पातळीचे परीक्षण शक्य होणार आहे. यासाठी हे उपकरण कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आणि ऑक्सिजन सेन्सरसारख्या अनेक महत्त्वाच्या भागांवर लक्ष ठेवेल.नवीन नियमांच्या अंमलबजावणीमुळे वाहनांच्या एकूण किमतीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. 

नवीन वाहनांमध्ये काय सुविधा?nवाहन उत्सर्जन पातळी निश्चित केलेल्या मानकांपेक्षा जास्त होताय, हे उपकरण वाहनाची योग्य सर्व्हिस करण्याची वेळ आली, हे सांगण्यासाठी इशारा लाईट देईल.nयाशिवाय, वाहनामध्ये खर्च होणाऱ्या इंधन स्तराला नियंत्रित ठेवण्यासाठी वाहनांमध्ये प्रोग्राम केलेले इंधन इंजेक्टर देखील लावण्यात येतील. हे उपकरण पेट्रोल इंजिनला पाठवल्या जाणाऱ्या इंधनाचे प्रमाण आणि वेळेवरही लक्ष ठेवेल.

आणखी बदल काय? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सेमीकंडक्टर चिपलाही इंजिनचे तापमान, ज्वलनासाठी पाठवलेला हवेचा दाब व उत्सर्जनातील कण यांचे निरीक्षण करण्यासाठी देखील अपग्रेड करणे आवश्यक आहे.

वाहन कंपन्या काय म्हणतात?टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले की, कंपनी या परिवर्तनाच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे आणि अभियांत्रिकी क्षमतेचा मोठा हिस्सा या विकासकामात गुंतला आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी अधिकारी (कॉर्पोरेट अफेअर्स) राहुल भारती म्हणाले की, कंपनी बीएस - ६च्या दुसऱ्या टप्प्यासाठी देखील तयारी करत आहे.

कंपनीची सर्व वाहने बीएस - ६ची दुसऱ्या टप्प्यातील मानकांनुसार केली जातील. त्यासाठी इंजिनची क्षमता वाढवण्यावर विशेष भर दिला जाईल, असे प्रमुख वाहन उत्पादक महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष (ऑटोमोटिव्ह सेक्टर) विजय नाकरा यांनी म्हटले आहे.

२०२० १ एप्रिलपासून देशात नवीन उत्सर्जन मानक म्हणून भारतात बीएस-६ चा पहिला टप्पा लागू करण्यात आला होता.

७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक वाहन कंपन्यांना नवीनमानकांशी जुळवून घेण्यासाठी करावी लागली होती.

टॅग्स :carकार