शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मोटारसायकल वापरता ना, मग हेडलॅम्प, इंडिकेटर्स, टेललॅम्प चालू असल्याचीही नेहमी दक्षता घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 00:13 IST

अनेकजण दुचाकी घेतात खरे पण दुचाकीच्या हेडलॅम्प, टेललॅम्प, इंडिकेटर्स चालू आहेत की नाहीत, त्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. या गोष्टी नेहमीच नीट असणे सुरक्षिततेसाठी गरजेचे आहे.

दुचाकी ही अनेक सर्वसामान्यांचे व विशेष करून शहरी व निमग्रामीण भागातील चाकरमान्यांचे नित्याचे दळणवळणाचे साधन झाले आहे. कोणे एकेकाळी स्कूटर वा मोटारसायकल रात्रीच्यावेळी चालवू नका, असे घरचे लोक सांगत. आता मात्र तशी वेळ येत नाही, एकंदर लोकांची बदललेली जीवनशैली, मोठे रस्ते,कामासाठी दिवस रात्र जावे लागण्याची गरज, दुचाकीचे चांगले हेडलॅम्प, दुचाकी चालकांचेही वाढलेले प्रमाण यामुळे एकूण दुचाकी वापरण्यासाठी दिवस व रात्र असे काही राहिलेले नाही. मात्र या सर्व बाबी जरी उपयुक्त वाटत असल्या तरी अनेक दुचाकी स्वार विशेष करून शहर, ग्रामीण व निमग्रामीण भागात आपल्या दुचाकीच्या टेललॅम्पबाबत खूपच बेफिकिर असतात, असे दिसते. रात्रीच्यावेळी दुचाकी रस्त्यातून जात आहे, हे मागील वाहनाला समजण्याचा एकमेव संकेत, म्हणजे त्या दुचाकीच्या मागील लॅम्प. या टेललॅम्पमध्ये टेललॅम्प व ब्रेकलाइट हे दोन महत्त्वाचे संकेत असतात. मागील वाहनाला त्यामुळे अनेक बाबींचे संकेत दिले जातात.टेललॅम्पप्रमाणेच साइड इंडिकेटरही अनेकांकडून दुर्लक्षित असतात. खरे म्हणजे आरटी नियम वगैरे बाजूला ठेवा. पण किमान स्वतःच्या प्राणाची तरी काळजी करा असे सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. अलीकडेच एक कोटी दुचाकींची विक्री भारतात झाल्याने दुचाकी उत्पादकांच्या खुशीत भर पडली आहे. मात्र या दुचाकी घेणाऱ्यांना केवळ सायकलीच्याऐवजी स्कूटर वा मोटारसायकल घेत आहोत, असे वाटत असावे. किंबहुना स्कूटर वा मोटारसायकल रस्त्यावर तुम्ही जेव्हा आणता, तेव्हा आरटीओचे नियम त्याला लागू असतात. त्यापेक्षा जास्त महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही रस्त्यावरून जाताना मागून येणाऱ्या वाहनाला तुमच्या दुचाकीचा अंदाज येणे,संकेत मिळणे गरजेचे असते. विशेष करून महामार्गावर वेगाने जाणारे वाहन दुचाकीला टेललॅम्प नसल्यास धडक देऊ शकते. अशा प्रकारे झालेल्या अपघातांमध्ये साहजिकच दुचाकीस्वार व त्यावरील प्रवासी यांचे प्राण धोक्यात येऊ शकतात. त्याला धडक देणाऱ्या वाहनाचा आकार मोठा असेल तर त्याला त्याचे फार काही नुकसान सहनही करावे लागणार नाही. मात्र दुचाकीस्वारांनी आपले प्राण व सुरक्षितता ही जोपासलीच पाहिजे.त्यासाठी टेललॅम्प, साइड इंडिकेटर्स हे महत्त्वाचे असतात. अनेक दुचाकीस्वार हे हेडलॅम्प चालू आहे ना मग पुरे असा घातकी विचार करून आपले वाहन रस्त्यावर आणतात. वास्तविक गेल्या काही वर्षांमधील अपघात व ते होण्याच्या पद्धती यांचा विचार केल्यास मोटारसायकल, स्कूटर यांचे संकेत न मिळणे, त्यांच्या चालवण्यामधील त्रुटी यांचा समावेश आहे. अनेकदा एकापेक्षा जास्त व्यक्तींनाही नेतानाही अपघात झाले आहेत. हा सर्व विचार अतिशय गंभीरपणे करून प्रत्येक दुचाकी मालक व चालकाने आपली दुचाकी रात्री चालवताना आपल्या मोटारसायकलीचे हेडलॅम्पच नव्हे तर साइड इंडिकेटर्स, टेललॅम्प, ब्रेकलाइट हे चालू स्थितीत ठेवण्याची जबाबदारी घेतलीच पाहिजे. वाढत्या वाहनांची व वाहतुकीची पार्श्वभूमी तसेच वाहतूक नियमांचे पालन यासाठी सुजाण व सुरक्षित नागरिक म्हणूनही त्यांची ती जबाबदारीच नव्हे का?