शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

टोयोटाच्या थेट विरोधात गेली टाटा! मंत्रालय कोणाची बाजू घेणार? हायब्रिड टॅक्सवरून धुमशान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 15:54 IST

इलेक्ट्रीक कारना मागणी मोठी असली तरी या कारच्या अनेक मर्यादा आहेत. यामुळे लोक आजही अन्य पर्यायांकडे वळत आहेत.

वाहन उद्योगामध्ये किती कडवी स्पर्धा सुरु आहे हे टाटा आणि टोयोटाच्या टॅक्स आकारणीच्या मागण्यांवरून दिसून येत आहे. टोयोटा आणि टाटा मधील सुरु झालेला वाद उद्या मोठी स्पर्धा सुरु होण्याची नांदी आहे. दोन्ही कंपन्यांना त्यांच्या त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीची भीती सतावत आहे, हे यावरून दिसून येत आहे. 

इलेक्ट्रीक कारना मागणी मोठी असली तरी या कारच्या अनेक मर्यादा आहेत. यामुळे लोक आजही अन्य पर्यायांकडे वळत आहेत. यापैकीच एक पर्याय म्हणजे हायब्रिड कारचा आहे. टोयोटाकडे हायब्रिड कारचे तंत्रज्ञान आहे. त्यांच्याकडे हायब्रिड वाहनेही आहेत. यावरील जीएसी कमी करण्याची मागणी टोयोटाने केली आहे. हायब्रिड कारच्या किंमती जास्त आहेत. यामुळे कर कमी केला तर त्यांचा खप वाढेल असा प्लॅन टोयोटाचा आहे. 

तर टाटाने हायब्रिड कारचा कर कमी केला तर त्याचा फटका इलेक्ट्रीक वाहनांना बसेल याची धास्ती घेत टोयोटाच्या मागणीला उघड विरोध केला आहे. टाटा मोटर्सने हायब्रिड कार या प्रदुषण करतात, इलेक्ट्रीक कारच्या तुलनेत ते जास्त आहे. यामुळे हायब्रिड कारचा कर कमी करू नये अशी भूमिका घेतली आहे. 

भारत इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे आणि त्यावर फक्त 5 टक्के कर लावला जात आहे. हायब्रीड कारवर 43 टक्क्यांपर्यंत कर लावला जातो. तर पेट्रोल कारवर 48 टक्के कर आकारला जातो. हायब्रिड कार गॅसोलीन कारपेक्षा कमी कार्बन उत्सर्जन करतात. भारताच्या व्यापार विभागाने गेल्या महिन्यात एका अंतर्गत नोटमध्ये टोयोटाच्या बाजूने असलेल्या हायब्रिड कारवरील कर तर्कसंगत करण्याचे सुचविले होते. 

टॅग्स :ToyotaटोयोटाTataटाटा