शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

टोयोटाच्या थेट विरोधात गेली टाटा! मंत्रालय कोणाची बाजू घेणार? हायब्रिड टॅक्सवरून धुमशान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 15:54 IST

इलेक्ट्रीक कारना मागणी मोठी असली तरी या कारच्या अनेक मर्यादा आहेत. यामुळे लोक आजही अन्य पर्यायांकडे वळत आहेत.

वाहन उद्योगामध्ये किती कडवी स्पर्धा सुरु आहे हे टाटा आणि टोयोटाच्या टॅक्स आकारणीच्या मागण्यांवरून दिसून येत आहे. टोयोटा आणि टाटा मधील सुरु झालेला वाद उद्या मोठी स्पर्धा सुरु होण्याची नांदी आहे. दोन्ही कंपन्यांना त्यांच्या त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीची भीती सतावत आहे, हे यावरून दिसून येत आहे. 

इलेक्ट्रीक कारना मागणी मोठी असली तरी या कारच्या अनेक मर्यादा आहेत. यामुळे लोक आजही अन्य पर्यायांकडे वळत आहेत. यापैकीच एक पर्याय म्हणजे हायब्रिड कारचा आहे. टोयोटाकडे हायब्रिड कारचे तंत्रज्ञान आहे. त्यांच्याकडे हायब्रिड वाहनेही आहेत. यावरील जीएसी कमी करण्याची मागणी टोयोटाने केली आहे. हायब्रिड कारच्या किंमती जास्त आहेत. यामुळे कर कमी केला तर त्यांचा खप वाढेल असा प्लॅन टोयोटाचा आहे. 

तर टाटाने हायब्रिड कारचा कर कमी केला तर त्याचा फटका इलेक्ट्रीक वाहनांना बसेल याची धास्ती घेत टोयोटाच्या मागणीला उघड विरोध केला आहे. टाटा मोटर्सने हायब्रिड कार या प्रदुषण करतात, इलेक्ट्रीक कारच्या तुलनेत ते जास्त आहे. यामुळे हायब्रिड कारचा कर कमी करू नये अशी भूमिका घेतली आहे. 

भारत इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे आणि त्यावर फक्त 5 टक्के कर लावला जात आहे. हायब्रीड कारवर 43 टक्क्यांपर्यंत कर लावला जातो. तर पेट्रोल कारवर 48 टक्के कर आकारला जातो. हायब्रिड कार गॅसोलीन कारपेक्षा कमी कार्बन उत्सर्जन करतात. भारताच्या व्यापार विभागाने गेल्या महिन्यात एका अंतर्गत नोटमध्ये टोयोटाच्या बाजूने असलेल्या हायब्रिड कारवरील कर तर्कसंगत करण्याचे सुचविले होते. 

टॅग्स :ToyotaटोयोटाTataटाटा