शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कार खरेदीचे स्वप्न महाग; किमतीत यंदा ५% वाढ; बीएस-६ नव्या नियमांमुळे वाढला खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 05:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कार खरेदी करण्याचे स्वप्न यंदा महागले आहे. १ एप्रिलपासून देशात नवीन उत्सर्जन नियम ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कार खरेदी करण्याचे स्वप्न यंदा महागले आहे. १ एप्रिलपासून देशात नवीन उत्सर्जन नियम बीएस-६ चा दुसरा टप्पा लागू झाला असून, बहुतांश सर्व कंपन्यांच्या कारच्या किमती ५ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. 

कंपन्यांकडून जानेवारी, मार्च-एप्रिल आणि मेमध्ये पुन्हा किमती वाढविण्यात आल्या. किया इंडिया, एमजी मोटार इंडिया यांनी मार्चमध्ये आणि मारुती सुझुकी व महिंद्रा अँड महिंद्राने एप्रिलमध्ये दुसऱ्यांदा किमती वाढविल्या. होंडाने एप्रिलमध्ये काही मॉडेलच्या, तर टाटा मोटर्सने मेमध्ये व्यावसायिक वाहनांच्या किमती ०.६ टक्के ते ५ टक्के वाढविल्या. बीएस-६ च्या दुसऱ्या टप्प्यातील नियमांचे पालन करण्यासाठी कंपन्यांना कारमध्ये अतिरिक्त उपकरणे लावावी लागत आहेत. त्याचा बोजा कंपन्या हळूहळू ग्राहकांवर टाकत आहेत.

जूनमध्ये सप्टेंबरनंतर आणखी वाढणार किमतीn जूनमध्ये आणि सप्टेंबरनंतर कारच्या किमती वाढू शकतात.  n ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमधील तज्ज्ञ विशाल दामले यांनी सांगितले की, बीएस-६ अंमलबजावणीसाठी कंपन्या हळूहळू किमती वाढवित आहेत. n ३ ते २० हजार रुपयांपर्यंत किमती वाढू शकतात. सप्टेंबरनंतर आणखी ०.५% ते २% वाढ होऊ शकते.अशा वाढल्या किमतीएमजी मोटर इंडिया     ३५-६० हजारमहिंद्रा अँड महिंद्रा     १५-५१ हजार किया इंडिया     ४०-५० हजारहोंडा     १०-५० हजारमारुती सुझुकी     ०८-१५ हजारटाटा मोटर्स     ०३-१५ हजार

टॅग्स :carकार