शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

Tata ने लाँच केला पहिला CNG ट्रक; स्वस्त अन् जास्त प्रवासासोबतच अपघात रोखणारी 'फुल प्रूफ' यंत्रणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 19:57 IST

आंतरराष्ट्रीय स्तरावरील महागाईचं संकट, पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये होणारी वाढ आणि परिणामी सामान्यांच्या खिशावर पडणारा भार, या पार्श्वभूमीवर पर्यायी इंधनाचा विचार करणं ही काळाची गरज बनली आहे.

'देश का ट्रक' ही टॅगलाईन सार्थ ठरवणारी, कमर्शियल व्हेईकल उत्पादनातील सर्वात मोठी भारतीय कंपनी 'टाटा मोटर्स'नं आज सीएनजीवर चालणारा देशातील पहिला ट्रक लाँच केला आहे. 'अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम'ने (ADAS) हा ट्रक सुसज्ज आहे. म्हणजेच, ट्रकसमोर येणारा अडथळा ओळखणं, ड्रायव्हरला त्याबाबत सावध करणं, प्रसंगी ऑटोमॅटिक ब्रेक लागणं, टायर प्रेशरबाबत अपडेट्स देणं अशा अद्ययावत सुविधा या सीएनजी ट्रकमध्ये आहेत. त्याशिवाय, आपल्या प्रायमा, सिग्ना आणि अल्ट्रा ट्रकची रेंज टाटा मोटर्सनं नव्या फीचर्ससह लाँच केली आहे. महिंद्रा एक्सयुव्ही ७०० या एसयूव्हीमध्ये ADAS यंत्रणा आहे. ती आपल्या ट्रकमध्ये आणून 'टाटा'ने मोठीच झेप घेतलीय.

सीएनजीवर चालणारी छोटी व्यावसायिक वाहनं, हलकी व्यावसायिक वाहनं आणि सीएनजी बसेसचा 'टाटा'चा प्रयोग यशस्वी ठरला. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा वळवला 'मीडियम आणि हेवी कमर्शियल व्हेईकल' श्रेणीकडे. सीएनजीवर चालणारा ट्रक बनवण्याचं आव्हान त्यांनी समर्थपणे पेललं आहे. २८ टन आणि १९ टनचे सीएनजी ट्रक ते बाजारात घेऊन आलेत. अद्ययावत तंत्रज्ञान आणि आरामदायी सुविधांनी परिपूर्ण नवीन सिग्ना सीएनजी मॉडेलही बाजारात दाखल होणार आहे. 

सात नव्या दणदणीत ट्रक, टिपरच्या दिमाखदार लाँचिंगनंतर, टाटा मोटर्सच्या कमर्शियल व्हेईकल बिझनेस युनिटचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील महागाईचं संकट, पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये होणारी वाढ आणि परिणामी सामान्यांच्या खिशावर पडणारा भार, या पार्श्वभूमीवर पर्यायी इंधनाचा विचार करणं ही काळाची गरज बनली आहे. त्यातही, व्यावसायिक वाहनांमध्ये पर्यायी इंधनाचा वापर केल्यास, पैशाची बचत आणि पर्यावरण रक्षण ही दोन्ही उद्दिष्टं साध्य होऊ शकतात. म्हणूनच, 'सीएनजी ट्रक' हे महत्त्वाकांक्षी पाऊल टाटा मोटर्सनं उचललं आहे, असं त्यांनी नमूद केलं. पर्यायी इंधन, सुरक्षा आणि पायाभूत सुविधा या तीन मुद्द्यांना सर्वोच्च प्राधान्य देऊन नव्या ट्रक्सची रचना करण्यात आल्याचंही ते म्हणाले. 

सीएनजी ट्रकची किंमत अर्थातच डिझेल ट्रकपेक्षा जास्त असेल, पण खरेदीनंतर वाचणारा खर्च पाहता, साधारण १५ महिन्यांमध्ये ती रक्कम कव्हर होईल, असंही त्यांनी खात्रीपूर्वक सांगितलं.

ट्रक चालकासाठी प्रशस्त केबिन, त्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक तंत्रज्ञान, अत्याधुनिक फीचर्स यामुळे चालक अधिक काम करू शकेल, स्वाभाविकच जास्त अंतर कापलं जाईल आणि खर्च कमी होईल, असं गणितही गिरीश वाघ यांनी मांडलं. 

टॅग्स :Tataटाटा