शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

Tata Motors नं दिला झटका! १ मे पासून कारच्या किमती महाग, जाणून घ्या यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 12:45 IST

देशातील प्रमुख वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सनं आपल्या पेसेंजर व्हेइकल लाइन-अपमधील वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली-

देशातील प्रमुख वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सनं आपल्या पेसेंजर व्हेइकल लाइन-अपमधील वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. नुकतंच कंपनीनं आपल्या व्यावसायिक श्रेणीतील वाहनांच्या किमतीत वाढ केली होती. आता टाटा पंच, सफारी इत्यादींसारख्या कारच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीनं जारी केलेल्या पत्रकानुसार नवे दर १ मे २०२३ पासून लागू होणार आहेत. 

टाटा मोटर्सची कोणतीही कार खरेदी करण्याचा तुम्ही जर विचार करत असेल तर १ मेच्या आधीच वाहनांच्या किमती तपासून घ्या आणि लवकरात लवकर खरेदी करुन टाका. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार वाहनांच्या एक्स-शो रुम किमतीत जवळपास ०.६ टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे. कोणती कार किती महाग होईल याची सविस्तर माहिती अद्याप कंपनीनं जाहीर केलेली नाही. वेगवेगळ्या मॉडलवर वेगवेगळ्या पद्धतीनं वाढीव किमती ठरवल्या जाणार आहेत. 

किंमत वाढण्याचं कारण काय?टाटा मोटर्सच्या म्हणण्यानुसार नव्या रियल ड्रायव्हिंग इमिशन नॉर्म्स अंतर्गत वाहनांना अपडेट केल्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. याच कारणामुळे वाहनांच्या किमती वाढवल्या जात आहेत. १ एप्रिल २०२३ मध्ये देशात नव्या रियल ड्रायव्हिंग इमिशन नॉर्म्स म्हणजेच BS6 फेज-२ लागू करण्यात आलं आहे. या नियमाअंतर्गत वाहन निर्मात्या कंपन्यांना वास्तवातील परिस्थितींमध्ये उत्सर्जन मानकांची पूर्तता करण्याची आवश्यकता असते. यासाठी कंपन्यांना आपल्या वाहनांना अपडेट करावं लागणार आहे. 

वर्षभरात दोनेवळा किमतीत वाढटाटा मोटर्स कंपनीनं या वर्षभरात दोनवेळा वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे. याआधी कंपनीनं फेब्रुवारी महिन्यात आपल्या पेसेंजर वाहनांच्या किमतीत वाढ केली होती. त्यावेळी देखील कंपनीनं इनपुट कॉस्ट वाढल्याचं कारण देत जवळपास १.२ टक्क्यांनी वाढ केली होती. 

टॅग्स :Tataटाटा