शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Tata Motors नं दिला झटका! १ मे पासून कारच्या किमती महाग, जाणून घ्या यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 12:45 IST

देशातील प्रमुख वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सनं आपल्या पेसेंजर व्हेइकल लाइन-अपमधील वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली-

देशातील प्रमुख वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सनं आपल्या पेसेंजर व्हेइकल लाइन-अपमधील वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. नुकतंच कंपनीनं आपल्या व्यावसायिक श्रेणीतील वाहनांच्या किमतीत वाढ केली होती. आता टाटा पंच, सफारी इत्यादींसारख्या कारच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीनं जारी केलेल्या पत्रकानुसार नवे दर १ मे २०२३ पासून लागू होणार आहेत. 

टाटा मोटर्सची कोणतीही कार खरेदी करण्याचा तुम्ही जर विचार करत असेल तर १ मेच्या आधीच वाहनांच्या किमती तपासून घ्या आणि लवकरात लवकर खरेदी करुन टाका. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार वाहनांच्या एक्स-शो रुम किमतीत जवळपास ०.६ टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे. कोणती कार किती महाग होईल याची सविस्तर माहिती अद्याप कंपनीनं जाहीर केलेली नाही. वेगवेगळ्या मॉडलवर वेगवेगळ्या पद्धतीनं वाढीव किमती ठरवल्या जाणार आहेत. 

किंमत वाढण्याचं कारण काय?टाटा मोटर्सच्या म्हणण्यानुसार नव्या रियल ड्रायव्हिंग इमिशन नॉर्म्स अंतर्गत वाहनांना अपडेट केल्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. याच कारणामुळे वाहनांच्या किमती वाढवल्या जात आहेत. १ एप्रिल २०२३ मध्ये देशात नव्या रियल ड्रायव्हिंग इमिशन नॉर्म्स म्हणजेच BS6 फेज-२ लागू करण्यात आलं आहे. या नियमाअंतर्गत वाहन निर्मात्या कंपन्यांना वास्तवातील परिस्थितींमध्ये उत्सर्जन मानकांची पूर्तता करण्याची आवश्यकता असते. यासाठी कंपन्यांना आपल्या वाहनांना अपडेट करावं लागणार आहे. 

वर्षभरात दोनेवळा किमतीत वाढटाटा मोटर्स कंपनीनं या वर्षभरात दोनवेळा वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे. याआधी कंपनीनं फेब्रुवारी महिन्यात आपल्या पेसेंजर वाहनांच्या किमतीत वाढ केली होती. त्यावेळी देखील कंपनीनं इनपुट कॉस्ट वाढल्याचं कारण देत जवळपास १.२ टक्क्यांनी वाढ केली होती. 

टॅग्स :Tataटाटा