शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

RTO चे कठोर नियम! ‘हे’ कागदपत्र अत्यावश्यक, नसेल तर भरावा लागेल १० हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 06:19 IST

शिक्षेची तरतूद कळल्यानंतर आता तुम्हीदेखील तुमच्या वाहनाची कागदपत्रे लगेच तपासून पाहा.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मोटारसायकल, कार किंवा स्कूटर चालकांकडे वैध पीयूसी प्रमाणपत्र (पोल्यूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट) नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. ज्या वाहन चालकांकडे हे सर्टिफिकेट नसेल त्यांच्याकडून १०हजार रुपयांचा दंड वसूल केला जाऊ शकतो. केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ नुसार प्रत्येक मोटार वाहन जे बीएस १, बीएस २, बीएस ३ आणि बीएस ४ इंजीनवर चालतं त्या प्रत्येक वाहनधारकाकडे पीयूसी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. 

याबाबत बोलताना परिवहन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, वैध पीयूसी प्रमाणपत्राशिवाय वाहन चालवणाऱ्या चालकास ६ महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास अथवा १० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, किंवा या दोन्ही शिक्षा भोगाव्या लागतील. त्याचबरोबर चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्सही तीन महिन्यांसाठी रद्द केले जाऊ शकते.

कुठे मिळेल पीयूसी?

-  शिक्षेची तरतूद कळल्यानंतर आता तुम्हीदेखील तुमच्या गाडीचे पीयूसी प्रमाणपत्र लगेच तपासून पाहाल.

- जर, तुमच्या गाडीचे पीयूसी प्रमाणपत्र नसेल, तर ते बनवण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. यासाठी तुम्हाला गाडी घेऊन तुमच्या जवळच्या पेट्रोल पंपावरील प्रदूषण तपासणी केंद्रात अर्थात पीयूसी सेंटरवर जावे लागेल.

- तिथे सेंटरवर उपस्थित कर्मचारी गाडीची तपासणी करतील. त्यानंतर पीयूसी प्रमाणपत्र तुम्हाला देतील. यासाठी फारसा वेळही लागत नाही. तसेच, अवघ्या ५० ते १०० रुपयांचा खर्च येतो.

पीयूसी सर्टिफिकेट म्हणजे काय?

वाहनांद्वारे होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांसाठी पीयूसी सर्टिफिकेट अनिवार्य करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र देण्यासाठी कोणतंही वाहन किती प्रदूषण करते, याची तपासणी केली जाते. त्यानुसार वाहनांची तपासणी करून पीयूसी सर्टिफिकेट दिलं जाते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस