शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

500 ऐवजी 5000; ड्रायव्हिंगचे नियम मोडल्यास आता भरावा लागणार दुप्पट, चौपट किंवा दहापट दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 15:11 IST

रस्ते वाहतुकीसंदर्भातील मोटर वाहन(संशोधन) विधेयक 2019ला मंजुरी देण्यात आली आहे.

नवी दिल्लीः रस्ते वाहतुकीसंदर्भातील मोटर वाहन(संशोधन) विधेयक 2019ला मंजुरी देण्यात आली आहे. या विधेयकात रस्ते वाहतुकीचे नियम मोडल्यास कठोर दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. रस्त्यावर गाडी चालवताना थोडीशी चूक झाल्यास आपल्याला मोठा दंड भरावा लागणार आहे. बेदरकारपणे गाडी चालवणं किंवा हेल्मेटशिवाय गाडी चालवणं, सीट बेल्ट न बांधणं आणि दारूच्या नशेत गाडी चालवण्यासारख्या नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर दंड भरावा लागणार आहे. ही दंडाची रक्कम पाहून भल्याभल्यांची भंबेरी उडाल्याशिवाय राहणार नाही.दारू पिऊन गाडी चालवल्यास आतापर्यंत दोन हजार रुपयांचं दंड ठोठावला जात होता. आता त्यासाठी 10 हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्याकडून हजार रुपयांचा दंड वसूल केला जात होता, आता तो हजार रुपयांचा दंड 5 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. परवान्याशिवाय गाडी चालवल्यास आधी 500 रुपये दंड दिला जात होता. आता तोच दंड 5 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्याला 400 रुपये दंड ठोठावला जात होता. परंतु आता या प्रस्तावात तीच रक्कम एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच सीट बेल्ट न वापरल्यास मोठा भुर्दंड द्यावा लागणार आहे. सीट बेल्ट लावलेला नसल्यास आधी 100  रुपये दंड द्यावा लागत होता.

आता तोच दंड एक हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. गाडी चालवताना फोनवर बोलणंही आता महागात पडू शकते. गाडी चालवत असताना फोनवर बोलल्यास आधी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जात होता. तोच आता वाढवून 5 हजार रुपये करण्यात आला आहे. तसेच हिट अँड रन प्रकरणात जर कोणत्याही पीडितेचा मृत्यू झाल्यास आधी 25 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी लागत होती. परंतु आता तीच भरपाईची रक्कम दोन लाख रुपये करण्यात आली आहे. हिट अँड रन प्रकरणात आपल्या गाडीच्या अपघातात एखादी व्यक्ती जखमी झाल्यास 50 हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागणार आहे. 

टॅग्स :carकार