मुंबई: राष्ट्रीय महामार्गांवर फास्टटॅग उद्यापासून बंधनकारक केले जाणार आहेत. त्रुटींमुळे डेडलाईन दोनवेळा वाढविण्यात आली होती. आज ही मुदत संपत आहे. अशावेळी जर फास्टटॅग नसेल तर चालकाला दुप्पट टोल आकारला जाणार आहे. पण जर फास्टटॅग स्कॅनच झाला नाही, तर वाहनचालकांसाठी खूशखबर आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) आज मोठी घोषणा केली आहे. डिसेंबरमध्ये फास्टटॅग अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, अनेक ठिकाणी फास्टटॅग स्कॅनच होत नव्हते. यामुळे टोलनाक्यांवरील यंत्रणा कुचकामी ठरल्याने वाहनचालकांना नेहमीच्या कॅश देण्यापेक्षा जास्तीचा वेळ थांबावे लागत होते. यामुळे फास्टटॅग असूनही मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. यामुळे एनएचएआयवर टीका होत होती. यामुळे 15 जानेवारीला फास्टटॅगची यंत्रणा कार्यरत करण्यात येणार होती.
दुप्पट टोल'दंड' वाचणार; FASTag आता भीम अॅपद्वारेही रिचार्ज करता येणार
मुंबई टोलनाक्यांवर जानेवारीपासून फास्टॅग
‘फास्टॅग’ म्हणजे काय?फास्टॅगचे एक डिजिटल स्टिकर प्रत्येक वाहनावर चिकटविण्यात येणार असून ते संबंधित वाहनधारकाचे बँक खाते किंवा इतर खात्यासोबत लिंक असणार आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करते. या प्रक्रियेमध्ये संबंधित वाहन टोल नाक्यावरून जाताना तेथील कॅमेऱ्यातील सेंसरमधून स्वयंचलित पद्धतीने वाहनधारकाच्या खात्यातून ही टोलची रक्कम कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना टोल भरण्यासाठी मोठ्या रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही.