शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Maruti नं हजारों गाड्या परत मागवल्या, बिघाडामुळं घेण्यात आला मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 21:12 IST

काही वाहनांच्या चाकांवर 'व्हील रिम साईजचे चुकीचे मार्किंग' करण्यात आली असेल तर, ती सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मारुती सुझुकी इंडियाने त्यांची 19731 Eeco वाहने परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. यांपैकी काही वाहनांच्या चाकांवर 'व्हील रिम साईजचे चुकीचे मार्किंग' करण्यात आली असेल तर, ती सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

19 जुलै 2021 ते 5 ऑक्टोबर 2021 दरम्यान तयार झालेल्या EECO च्या काही गाड्यांमध्ये, व्हील रिमचा आकार चुकीच्या पद्धतीने मार्क झाल्याचे मारुती सुझुकीला आढळून आले आहे. मात्र, यामुळे गाडीच्या कार्यक्षमतेवर अथवा सुरक्षिततेवर कसलाही परिणाम होत नाही.

गाड्यांच्या किमती वाढविण्याची घोषणा - मारुती सुझुकी इंडियाने कंपनीने म्हटले आहे की, इनपुट कॉस्ट वाढल्याने वाहनांच्या किमतीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे, याचा काही भार ग्राहकांवर टाकावा लागणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार या महिन्याच्या अखेरीस किंमती वाढवण्याचा प्लॅन आहे. किमतीतील वाढ वाहनाच्या मॉडेलवर अवलंबून असेल.

वर्षभरात चार वेळा वाढले भाव -मारुती सुझुकीने गेल्या एका वर्षात चार वेळा आपल्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. कमोडिटीच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे कंपनीने गेल्या वर्षभरात आपल्या वाहनांच्या किमती जवळपास 9 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.

खर्चात वाढ झाल्यामुळे मार्जिनवर परिणाम -कोणत्याही कार निर्मात्यासाठी इनपुट खर्च अत्यंत महत्त्वाचा असतो. कोणत्याही मूळ उपकरणाच्या निर्मात्यासाठी साहित्याचा खर्च हा एकूण खर्चाच्या 70 ते 75 टक्के असतो, परंतु मारुती सुझुकीसाठी तो 80.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यामुळे कंपनीच्या मार्जिनवरही मोठा परिणाम झाला आहे. यामुळेच मारुती सुझुकीला किंमत वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याचे म्हटले जात आहे. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुती