शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

भारत स्टेज 6 मानकांची पूर्तता न करणाऱ्या वाहनांची नोंदणी करू नये, नियम १ एप्रिलपासून लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 06:46 IST

भारत स्टेज ६ मानकांची पूर्तता न करणा-या वाहनांची १ एप्रिलपासून नोंदणी करू नये, असे आदेश परिवहन विभागाने सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन विभागांना (आरटीओ) दिले आहेत.

मुंबई : भारत स्टेज ६ मानकांची पूर्तता न करणा-या वाहनांची १ एप्रिलपासून नोंदणी करू नये, असे आदेश परिवहनविभागाने सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन विभागांना (आरटीओ) दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल, २०२० पासून भारत स्टेज ६ (बीएस ६) मानकांची पूर्तता न करणाºया वाहनांची नोंदणी करू नये, तसेच याबाबतची माहिती वितरक आणि संबंधितांना द्यावी, असेही या आदेशात नमूद आहे. देशात वाहनांचे प्रमाणदिवसेंदिवस वाढत असल्याने प्रदूषित शहरांच्या संख्येत भर पडली आहे.हवेतील कार्बन मोनाक्साइड, नायट्रोजन आॅक्साइडचे प्रमाण वाढल्याने श्वसनाचे विकार वाढत आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारने प्रदूषण रोखण्यासाठी बीएस - ४ वाहनांची नोंदणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण या वाहनांमधून धूर जास्त प्रमाणात सोडला जात असून त्यामुळे प्रदूषण वाढते. ही समस्या लक्षात घेता बीएस - ४ ऐवजी १ एप्रिलपासून प्रदूषण रोखणाºया बीएस - ६ मानांकनाची पूर्तता करावी लागेल. त्याशिवाय वाहनांची नोंदणी न करण्याचे आदेश परिवहन विभागाने आरटीओकार्यालयांना दिले आहेत.इमिशन स्टॅण्डर्ड म्हणजे काय?भारतात २००० साली वाहनांसाठी इमिशन स्टॅण्डर्ड ठरविण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या निकषांनुसार हवेचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी हे नियम ठरविण्यात आले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाने यासाठी काही स्टॅण्डर्डठरविले आहेत. बीएसचा संबंध इमिशन स्टॅण्डर्डशी आहे. बीएस म्हणजे भारत स्टेज. तुमची गाडी किती प्रदूषण करते, हे तपासले जाते. यामध्ये जो नंबर असतो, त्यावरून त्या वाहनामुळे किती प्रदूषण होण्याची शक्यता असते, याचा अंदाज येतो. त्यावरूनच बीएस ३, बीएस ४ आणि बीएस ६ हे स्टॅण्डर्ड ठरविले जातात.