शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आता नव्या कारमध्ये ड्रायव्हरसोबतच फ्रंट पॅसेंजर सीटसाठीही एअरबॅग अनिवार्य, म्हणून घेण्यात आला निर्णय  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 20:31 IST

Auto News: रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने आता आपल्या धोरणात बदल करताना कारमध्ये फ्रंट पॅसेंजरसाठीही एअरबॅग अनिवार्य केल्या आहेत.

नवी दिल्ली - आतापर्यंत भारतामध्ये कारनिर्मिती करताना केवळ ड्रायव्हरसिटवरच एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या होत्या. मात्र रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने आता आपल्या धोरणात बदल करताना कारमध्ये फ्रंट पॅसेंजरसाठीही एअरबॅग अनिवार्य केल्या आहेत. हा नवा नियम लागू करण्यासाठी सरकारने यापूर्वी १ एप्रिल २०२१ची तारीख निर्धारित करण्यात आली होती. मात्र आता ही मुदत २१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच २०२३च्या सुरुवातीपासून सर्व कारनिर्मात्या कंपन्यांना त्यांच्या नव्या कारमध्ये आता फ्रंट पॅसेंजर सीटवरसुद्धा एअरबॅग द्याव्या लागतील.  (The decision was taken to make airbags mandatory for the front passenger seat as well as the driver in the new car.)सरकारकडून नवे नियम बनवण्यात आल्यानंतर सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफ्रॅक्चर्सने हा नियम लागू करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत मागितली आहे. सरकारला हा नियम लागू करण्याची आवश्यकता का भासली आणि त्याचे काय फायदे होतील, हे आपण जाणून घेऊयात.

कार चालवतेवेळी ड्रायव्हरचा हात स्टेअरिंगवर असतो. त्यामुळे ड्रायव्हरची पकड मजबूत राहते. तर अॅक्सिडेंट होताना पॅसेंजर सीटवर बसलेल्या व्यक्तीकडे केवळ सीटबेल्टचाच आधार असतो. अॅक्सिडेंट होताना एअरबॅगमुळे ड्रायव्हरचा बचाव होतो. मात्र शेजारी बसलेल्या व्यक्तीचे डोके विंडशिल्डवर आपटू शकते. त्यामुळे गंभीर जखम होऊ शकते. अशा परिस्थितीत पुढे बसलेल्या प्रवाशासाठीही एअरबॅग अॅक्सिडेंट झाल्यास जीवरक्षक ठरू शकते.

वेगाने अॅक्सिडेंट झाल्यास पॅसेंजर सीटवर बसलेल्या व्यक्तीचे डोके जर डॅशबोर्ड किंवा कुठल्याही इतर भागावर आपटले तर गंभीर जखमेमुळे मृत्यू होऊ शकतो. कारचा डॅशबोर्ड हा मजबूत प्लॅस्टिक किंवा वुडन मटेरियपासून बनलेला असतो, त्यामुळे गंभीर दुखापत होऊ शकते. अशा परिस्थितीत पुढे बसलेल्या दोन्ही व्यक्तींसाठी एअरबॅग असणे अनिवार्य ठरते.   

टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योगcarकारroad transportरस्ते वाहतूक